शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान, पोटविकार वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:43 IST

उस्मानाबाद : अनेक जण कामाहून घरी आल्यानंतर टीव्हीसमोर काहीतरी खात बसतात. तसेच मोबाईल पाहत जेवण करीत असतात. मात्र, ही ...

उस्मानाबाद : अनेक जण कामाहून घरी आल्यानंतर टीव्हीसमोर काहीतरी खात बसतात. तसेच मोबाईल पाहत जेवण करीत असतात. मात्र, ही सवय आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे समोर येत असून, जेवताना एकाग्रता नसल्याने पोटाचे विकार वाढण्याची भीती पोटविकार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना काळात अनेक व्यक्ती घरातच बसून आहेत. अनेकांचे बाहेर फिरणे तसेच व्यायाम बंद झाला आहे. घरातच बसून असल्याने विरंगुळा म्हणून ज्येष्ठासह लहान मुले, प्रौढ व्यक्ती तासनतास टीव्हीसमोर किंवा मोबाईलमध्ये व्यस्त असतात. अनेकांना जेवणाची भ्रांत राहत नाही. टीव्हीसमोर बसूनच किंवा हातात मोबाईल घेऊन जेवण करीत असतात. मात्र, सतत टीव्ही, मोबाईलमध्ये लक्ष घालून जेवण्यामुळे मनाची एकाग्रता राहत नसल्याने पचनक्रिया सुरळीत होत नाही. परिणामी, पोटाचे विकार जडत आहेत. सध्या अनेक रुग्ण हे अपचन होत असल्याने रुग्णालयात उपचारास येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी शांतपणे जेवण करणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पोटविकाराची कारणे...

टीव्ही पाहत जेवण करणे, मोबाईल मध्ये लक्ष घालून जेवण, फास्टफूडचे सेवन करणे, उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे, शिळे अन्न खाणे, अशुद्ध पाणी पिणे, व्यसन, अस्वच्छता, पुरेशी झोप नसणे आदी पोटविकाराची कारणे आहेत.

पोटविकार टाळायची असतील तर...

वेळेवर जेवण करणे,

सकस आहार घेणे,

जेवणात एकाग्रता ठेवणे,

उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे टाळणे,

प्रतिक्रिया...

वारंवार टीव्हीसमोर बसून जेवण करणे आरोग्यावर परिणाम करणारे आहे. जेवताना मन एकाग्र असणे गरजेचे असते. मात्र, टीव्ही पाहत असल्यामुळे जेवणाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पाचनक्रिया बिघडते. त्यामुळे अन्य समस्याही उद्भवू लागतात.

डॉ. एन.बी. गोसावी, पोटविकार तज्ज्ञ

बाहेरचे खाणे, उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे, तसेच दूषित पाण्यामुळे पोटविकाराच्या समस्या उद्भवत असतात. टीव्हीसमोर जेवत बसल्याने एकाग्रता कमी होते. वय व तब्येतीनुसार शरीरास पोषण तत्त्व मिळत नाहीत. त्यामुळे पोटाचे आजार वाढतात. अपचन, ॲसिडीटी असा त्रास असणारे रुग्ण उपचारास येत आहेत.

डॉ. अशिष काळे, पोटविकार तज्ज्ञ

मुले जेवत नाहीत म्हणून टीव्ही

शाळा बंद असल्यामुळे मुले घरातच आहेत. घरातही टीव्ही समोर बसून असतात. टीव्ही पाहिल्याशिवाय मुले जेवणच करीत नसल्याने टीव्ही लावावी लागते.

नौशादबी शेख, गृहिणी

कोरोनामुळे सर्वच बंद हाते. त्यामुळे मुलांना घराबाहेर घेऊन जाणे धोक्याचे होते. मुले घरात मोबाईल व टीव्ही पाहत बसत आहेत. त्यामुळे त्यांचे जेवणाकडे दुर्लक्ष होत आहे. जेवतानाही टीव्ही व मोबाईलमध्येच लक्ष असते.

सुवर्णा बनसाडे, गृहिणी

मागील दीड वर्षापासून कोरोनाचे लॉकडाऊन व अनलॉकच असते. त्यामुळे नागरिकांना घरातच बसावे लागते. विरंगुळा म्हणून कुटुंबातील सदस्य मोबाईल व टीव्हीत पाहत आहेत. जेवतानाही टीव्ही पाहत जेवत करीत असतात.

रेश्मा ऐडके, गृहिणी