शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. शहरी तसेच ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात लसीकरण ...

उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. शहरी तसेच ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. लस घेतल्यानंतर रुग्णांना अर्धा तास निगराणीखाली राहणे आवश्यक असते. मात्र, काही नागरिक लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई करीत असतात. लस घेतल्यानंतर चक्कर येणे, रिॲक्शन होऊ शकते. त्यामुळे घरी जाण्याची घाई महागात पडू शकते.

गतवर्षी मार्च महिन्यापासून देशभरात कोरोनाने हाहाकार घातला होता. आजार नवीन असल्याने प्रारंभी यावर प्रभावी औषध, तसेच लसदेखील उपलब्ध नव्हती. उपलब्ध साधनसामग्रीवरच डाॅक्टर्स व आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोनाशी लढा देत होते. शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाने एक वर्षाच्या आता कोरोना प्रतिबंधात्मक लस तयारही झाली. त्यामुळे या आजाराच्या विरोधात लढण्यास काहीअंशी दिलासा मिळाला आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. मागील सहा महिन्यांत ग्रामीण, तसेच शहरी भागातही लसीकरण मोहिमेस नागरिकांडून प्रतिसाद मिळत आहे. लस घेतल्यानंतर नागरिकांना चक्कर येण्याची शक्यता असते. तसेच काहींना रिॲक्शन किंवा ॲलर्जीचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे लस घेतल्यानंतर नागरिकांना अर्धा तास केंद्रावर बसणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेकजण तातडीने केंद्राबाहेर पडतात; पण असे करणे धोक्याचे ठरू शकते असे डॉक्टरांनी सांगितले.

आतापर्यंत झालेले लसीकरण

एकूण लसीकरण - ३०७८३४

पहिला डोस - २५१७७८

दुसरा डोस - ५६०५६

एकूण लसीकरण केंद्र - २४९

३०ते ४० वयोगटांसाठी केंद्र - १०

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?

लस घेतल्यानंतर चक्कर येण्याची शक्यता असते. तसेच काहीजणांना ॲलर्जीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर अर्धा तास निगराणीखाली ठेवले जाते. या ठिकाणी एक डॉक्टर, परिचारिका व अन्य तीन कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज असतो.

त्यामुळे रुग्णांवर तत्काळ उपचार करता येतात.

लस हेच औषध

कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस प्रभावी भरत असल्याने. नागरिक लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सध्या लस हेच औषध ठरत आहे.

कोट...

लस घेतल्यानंतर केंद्रावर अर्धा तास लस घेतलेल्या व्यक्तीस निगराणीखाली राहणे गरजेचे असते. लस घेतल्यानंतर तत्काळ बाहेर पडल्यानंतर चक्कर येणे, ॲलर्जीचा त्रास जाणवू लागण्याची शक्यता असते. अद्याप जिल्ह्यात असे प्रकार घडले नाहीत. नागरिकांनी लसीकरणानंतर अर्धा तास केंद्रावरच थांबावे.

डॉ. कुलदीप मिटकरी, लसीकरण अधिकारी