शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. शहरी तसेच ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात लसीकरण ...

उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. शहरी तसेच ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. लस घेतल्यानंतर रुग्णांना अर्धा तास निगराणीखाली राहणे आवश्यक असते. मात्र, काही नागरिक लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई करीत असतात. लस घेतल्यानंतर चक्कर येणे, रिॲक्शन होऊ शकते. त्यामुळे घरी जाण्याची घाई महागात पडू शकते.

गतवर्षी मार्च महिन्यापासून देशभरात कोरोनाने हाहाकार घातला होता. आजार नवीन असल्याने प्रारंभी यावर प्रभावी औषध, तसेच लसदेखील उपलब्ध नव्हती. उपलब्ध साधनसामग्रीवरच डाॅक्टर्स व आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोनाशी लढा देत होते. शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाने एक वर्षाच्या आता कोरोना प्रतिबंधात्मक लस तयारही झाली. त्यामुळे या आजाराच्या विरोधात लढण्यास काहीअंशी दिलासा मिळाला आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. मागील सहा महिन्यांत ग्रामीण, तसेच शहरी भागातही लसीकरण मोहिमेस नागरिकांडून प्रतिसाद मिळत आहे. लस घेतल्यानंतर नागरिकांना चक्कर येण्याची शक्यता असते. तसेच काहींना रिॲक्शन किंवा ॲलर्जीचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे लस घेतल्यानंतर नागरिकांना अर्धा तास केंद्रावर बसणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेकजण तातडीने केंद्राबाहेर पडतात; पण असे करणे धोक्याचे ठरू शकते असे डॉक्टरांनी सांगितले.

आतापर्यंत झालेले लसीकरण

एकूण लसीकरण - ३०७८३४

पहिला डोस - २५१७७८

दुसरा डोस - ५६०५६

एकूण लसीकरण केंद्र - २४९

३०ते ४० वयोगटांसाठी केंद्र - १०

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?

लस घेतल्यानंतर चक्कर येण्याची शक्यता असते. तसेच काहीजणांना ॲलर्जीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर अर्धा तास निगराणीखाली ठेवले जाते. या ठिकाणी एक डॉक्टर, परिचारिका व अन्य तीन कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज असतो.

त्यामुळे रुग्णांवर तत्काळ उपचार करता येतात.

लस हेच औषध

कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस प्रभावी भरत असल्याने. नागरिक लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सध्या लस हेच औषध ठरत आहे.

कोट...

लस घेतल्यानंतर केंद्रावर अर्धा तास लस घेतलेल्या व्यक्तीस निगराणीखाली राहणे गरजेचे असते. लस घेतल्यानंतर तत्काळ बाहेर पडल्यानंतर चक्कर येणे, ॲलर्जीचा त्रास जाणवू लागण्याची शक्यता असते. अद्याप जिल्ह्यात असे प्रकार घडले नाहीत. नागरिकांनी लसीकरणानंतर अर्धा तास केंद्रावरच थांबावे.

डॉ. कुलदीप मिटकरी, लसीकरण अधिकारी