शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. शहरी तसेच ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात लसीकरण ...

उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. शहरी तसेच ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. लस घेतल्यानंतर रुग्णांना अर्धा तास निगराणीखाली राहणे आवश्यक असते. मात्र, काही नागरिक लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई करीत असतात. लस घेतल्यानंतर चक्कर येणे, रिॲक्शन होऊ शकते. त्यामुळे घरी जाण्याची घाई महागात पडू शकते.

गतवर्षी मार्च महिन्यापासून देशभरात कोरोनाने हाहाकार घातला होता. आजार नवीन असल्याने प्रारंभी यावर प्रभावी औषध, तसेच लसदेखील उपलब्ध नव्हती. उपलब्ध साधनसामग्रीवरच डाॅक्टर्स व आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोनाशी लढा देत होते. शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाने एक वर्षाच्या आता कोरोना प्रतिबंधात्मक लस तयारही झाली. त्यामुळे या आजाराच्या विरोधात लढण्यास काहीअंशी दिलासा मिळाला आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. मागील सहा महिन्यांत ग्रामीण, तसेच शहरी भागातही लसीकरण मोहिमेस नागरिकांडून प्रतिसाद मिळत आहे. लस घेतल्यानंतर नागरिकांना चक्कर येण्याची शक्यता असते. तसेच काहींना रिॲक्शन किंवा ॲलर्जीचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे लस घेतल्यानंतर नागरिकांना अर्धा तास केंद्रावर बसणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेकजण तातडीने केंद्राबाहेर पडतात; पण असे करणे धोक्याचे ठरू शकते असे डॉक्टरांनी सांगितले.

आतापर्यंत झालेले लसीकरण

एकूण लसीकरण - ३०७८३४

पहिला डोस - २५१७७८

दुसरा डोस - ५६०५६

एकूण लसीकरण केंद्र - २४९

३०ते ४० वयोगटांसाठी केंद्र - १०

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?

लस घेतल्यानंतर चक्कर येण्याची शक्यता असते. तसेच काहीजणांना ॲलर्जीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर अर्धा तास निगराणीखाली ठेवले जाते. या ठिकाणी एक डॉक्टर, परिचारिका व अन्य तीन कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज असतो.

त्यामुळे रुग्णांवर तत्काळ उपचार करता येतात.

लस हेच औषध

कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस प्रभावी भरत असल्याने. नागरिक लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सध्या लस हेच औषध ठरत आहे.

कोट...

लस घेतल्यानंतर केंद्रावर अर्धा तास लस घेतलेल्या व्यक्तीस निगराणीखाली राहणे गरजेचे असते. लस घेतल्यानंतर तत्काळ बाहेर पडल्यानंतर चक्कर येणे, ॲलर्जीचा त्रास जाणवू लागण्याची शक्यता असते. अद्याप जिल्ह्यात असे प्रकार घडले नाहीत. नागरिकांनी लसीकरणानंतर अर्धा तास केंद्रावरच थांबावे.

डॉ. कुलदीप मिटकरी, लसीकरण अधिकारी