शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

जिल्ह्यातील चार मंडळांत अतिवृष्टी, वीज पडून दाेन जनावरे ठार, पिकांचे अताेनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:35 IST

उस्मानाबाद -जिल्ह्यात गुरुवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. उस्मानाबादसह कळंब आणि उमरगा या तालुक्यांतील जवळपास पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. परिणामी ...

उस्मानाबाद -जिल्ह्यात गुरुवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. उस्मानाबादसह कळंब आणि उमरगा या तालुक्यांतील जवळपास पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. परिणामी पावसामुळे कळंब-ढाेकी राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प हाेती. तसेच वीज पडून दाेन म्हशी दगावल्या असून, अनेक भागांतील साेयाबीनसारखे नगदी पीक पाण्याखाली गेले आहे.

दाेन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री जिल्ह्यात पुन्हा सर्वदूर पाऊस झाला. अनेक भागांत शुक्रवारी पहाटेपर्यंत पावसाचा जाेर कायम हाेता. जवळपास पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. उस्मानाबाद तालुक्यातील ढाेकी मंडळात ८५ मिमी, तेर ७३.३ मिमी, कळंब तालुक्यातील शिराढाेणमध्ये ७१.८ मिमी, उमरगा तालुक्यातील उमरगा मंडळामध्ये ७०.८ मिमी आणि मुळज मंडळामध्ये ६६.३ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या साेयाबीन पिकाचे अताेनात नुकसान झाले आहे. कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथील निर्माणाधीन पुलाच्या पर्यायी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने कळंब ते ढोकी या राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पाणी आल्याने आवाड शिरपुरा गावचा संपर्क तुटला हाेता. सातेफळ तसेच डिकसळ येथे वीज पडून प्रत्येकी एक अशा दाेन म्हशी दगावल्या. दरम्यान, मांजरा प्रकल्पाचे सहा दरवाजे यापूर्वीच ०.५० मीटरने उचलण्यात आले हाेते. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या धाे-धाे पावसामुळे पाण्याची आवक वाढली. परिणामी शुक्रवारी सकाळच्या सुमारास संबंधित सहा दरवाजे आणखी २.७५ मीटर उचलण्यात आले. त्यामुळे मांजरा नदीतील पाण्याचा विसर्ग वाढल्याने हे पाणी नदीकाठच्या शेतशिवरात घुसले. परिणामी साेयाबीनसह अन्य पिके पाण्याखाली गेली. वाढता जलस्तर लक्षात घेतला, पाेलीस पाटलांना अलर्ट राहण्याबाबत आदेशित केले. तसेच सर्व तलाठ्यांनाही सज्जाच्या ठिकाणी पाचारण केले हाेते. माेहा येथे एकाच्या घराची भिंत काेसळली. सुदैवाने या घटनेत काेणतीही जीवितहानी झाली नाही. तुळजापूर तालुक्यातील सांगवी-माळुंब्रा हा तलावही ओव्हरफ्लाे झाला. त्यामुळे सांगवी गावानजीकचा पूल पाण्याखाली गेल्याने गुरुवारी रात्री अकरा वाजल्यापासून गावाचा संपर्क तुटला हाेता. साेबतच उमरगा, उस्मानाबादेतही जाेरदार पाऊस झाला. उस्मानाबाद शहरातून वाहणारी भाेगावती नदी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिली. या पावसामुळे लहान-माेठे प्रकल्प तुडुंब भरले असले तरी शेतकऱ्यांच्या हाताताेंडाशी आलेला घास मात्र पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याची गरज व्यक्त हाेत आहे.