शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार मंडळांत अतिवृष्टी, वीज पडून दाेन जनावरे ठार, पिकांचे अताेनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:35 IST

उस्मानाबाद -जिल्ह्यात गुरुवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. उस्मानाबादसह कळंब आणि उमरगा या तालुक्यांतील जवळपास पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. परिणामी ...

उस्मानाबाद -जिल्ह्यात गुरुवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. उस्मानाबादसह कळंब आणि उमरगा या तालुक्यांतील जवळपास पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. परिणामी पावसामुळे कळंब-ढाेकी राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प हाेती. तसेच वीज पडून दाेन म्हशी दगावल्या असून, अनेक भागांतील साेयाबीनसारखे नगदी पीक पाण्याखाली गेले आहे.

दाेन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री जिल्ह्यात पुन्हा सर्वदूर पाऊस झाला. अनेक भागांत शुक्रवारी पहाटेपर्यंत पावसाचा जाेर कायम हाेता. जवळपास पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. उस्मानाबाद तालुक्यातील ढाेकी मंडळात ८५ मिमी, तेर ७३.३ मिमी, कळंब तालुक्यातील शिराढाेणमध्ये ७१.८ मिमी, उमरगा तालुक्यातील उमरगा मंडळामध्ये ७०.८ मिमी आणि मुळज मंडळामध्ये ६६.३ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या साेयाबीन पिकाचे अताेनात नुकसान झाले आहे. कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथील निर्माणाधीन पुलाच्या पर्यायी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने कळंब ते ढोकी या राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पाणी आल्याने आवाड शिरपुरा गावचा संपर्क तुटला हाेता. सातेफळ तसेच डिकसळ येथे वीज पडून प्रत्येकी एक अशा दाेन म्हशी दगावल्या. दरम्यान, मांजरा प्रकल्पाचे सहा दरवाजे यापूर्वीच ०.५० मीटरने उचलण्यात आले हाेते. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या धाे-धाे पावसामुळे पाण्याची आवक वाढली. परिणामी शुक्रवारी सकाळच्या सुमारास संबंधित सहा दरवाजे आणखी २.७५ मीटर उचलण्यात आले. त्यामुळे मांजरा नदीतील पाण्याचा विसर्ग वाढल्याने हे पाणी नदीकाठच्या शेतशिवरात घुसले. परिणामी साेयाबीनसह अन्य पिके पाण्याखाली गेली. वाढता जलस्तर लक्षात घेतला, पाेलीस पाटलांना अलर्ट राहण्याबाबत आदेशित केले. तसेच सर्व तलाठ्यांनाही सज्जाच्या ठिकाणी पाचारण केले हाेते. माेहा येथे एकाच्या घराची भिंत काेसळली. सुदैवाने या घटनेत काेणतीही जीवितहानी झाली नाही. तुळजापूर तालुक्यातील सांगवी-माळुंब्रा हा तलावही ओव्हरफ्लाे झाला. त्यामुळे सांगवी गावानजीकचा पूल पाण्याखाली गेल्याने गुरुवारी रात्री अकरा वाजल्यापासून गावाचा संपर्क तुटला हाेता. साेबतच उमरगा, उस्मानाबादेतही जाेरदार पाऊस झाला. उस्मानाबाद शहरातून वाहणारी भाेगावती नदी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिली. या पावसामुळे लहान-माेठे प्रकल्प तुडुंब भरले असले तरी शेतकऱ्यांच्या हाताताेंडाशी आलेला घास मात्र पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याची गरज व्यक्त हाेत आहे.