शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

जिल्ह्यातील चार मंडळांत अतिवृष्टी, वीज पडून दाेन जनावरे ठार, पिकांचे अताेनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:35 IST

उस्मानाबाद -जिल्ह्यात गुरुवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. उस्मानाबादसह कळंब आणि उमरगा या तालुक्यांतील जवळपास पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. परिणामी ...

उस्मानाबाद -जिल्ह्यात गुरुवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. उस्मानाबादसह कळंब आणि उमरगा या तालुक्यांतील जवळपास पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. परिणामी पावसामुळे कळंब-ढाेकी राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प हाेती. तसेच वीज पडून दाेन म्हशी दगावल्या असून, अनेक भागांतील साेयाबीनसारखे नगदी पीक पाण्याखाली गेले आहे.

दाेन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री जिल्ह्यात पुन्हा सर्वदूर पाऊस झाला. अनेक भागांत शुक्रवारी पहाटेपर्यंत पावसाचा जाेर कायम हाेता. जवळपास पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. उस्मानाबाद तालुक्यातील ढाेकी मंडळात ८५ मिमी, तेर ७३.३ मिमी, कळंब तालुक्यातील शिराढाेणमध्ये ७१.८ मिमी, उमरगा तालुक्यातील उमरगा मंडळामध्ये ७०.८ मिमी आणि मुळज मंडळामध्ये ६६.३ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या साेयाबीन पिकाचे अताेनात नुकसान झाले आहे. कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथील निर्माणाधीन पुलाच्या पर्यायी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने कळंब ते ढोकी या राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पाणी आल्याने आवाड शिरपुरा गावचा संपर्क तुटला हाेता. सातेफळ तसेच डिकसळ येथे वीज पडून प्रत्येकी एक अशा दाेन म्हशी दगावल्या. दरम्यान, मांजरा प्रकल्पाचे सहा दरवाजे यापूर्वीच ०.५० मीटरने उचलण्यात आले हाेते. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या धाे-धाे पावसामुळे पाण्याची आवक वाढली. परिणामी शुक्रवारी सकाळच्या सुमारास संबंधित सहा दरवाजे आणखी २.७५ मीटर उचलण्यात आले. त्यामुळे मांजरा नदीतील पाण्याचा विसर्ग वाढल्याने हे पाणी नदीकाठच्या शेतशिवरात घुसले. परिणामी साेयाबीनसह अन्य पिके पाण्याखाली गेली. वाढता जलस्तर लक्षात घेतला, पाेलीस पाटलांना अलर्ट राहण्याबाबत आदेशित केले. तसेच सर्व तलाठ्यांनाही सज्जाच्या ठिकाणी पाचारण केले हाेते. माेहा येथे एकाच्या घराची भिंत काेसळली. सुदैवाने या घटनेत काेणतीही जीवितहानी झाली नाही. तुळजापूर तालुक्यातील सांगवी-माळुंब्रा हा तलावही ओव्हरफ्लाे झाला. त्यामुळे सांगवी गावानजीकचा पूल पाण्याखाली गेल्याने गुरुवारी रात्री अकरा वाजल्यापासून गावाचा संपर्क तुटला हाेता. साेबतच उमरगा, उस्मानाबादेतही जाेरदार पाऊस झाला. उस्मानाबाद शहरातून वाहणारी भाेगावती नदी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिली. या पावसामुळे लहान-माेठे प्रकल्प तुडुंब भरले असले तरी शेतकऱ्यांच्या हाताताेंडाशी आलेला घास मात्र पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याची गरज व्यक्त हाेत आहे.