शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तेरणासाठी जिल्हा बँकेचे न्यायालयात हमीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : तेरणा सहकारी साखर कारखाना दीर्घ मुदतीने भाडेतत्वावर देण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे नाहकरत प्रमाणपत्र गरजेचे आहे. ते ...

उस्मानाबाद : तेरणा सहकारी साखर कारखाना दीर्घ मुदतीने भाडेतत्वावर देण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे नाहकरत प्रमाणपत्र गरजेचे आहे. ते मिळवण्यासाठी जिल्हा बँकेने आता औरंगाबाद खंडपीठात हमीपत्र सादर केल्याची माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. दरम्यान, यावर शुक्रवारी होणार्या सुनावणीकडे सभासदांच्या नजरा लागल्या आहेत.

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम थकीत असल्याने तेरणा कारखाना सील केलेला आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या संमतीशिवाय कारखाना दीर्घ मुदतीने भाडेतत्वावर चालविण्यास देण्याची निविदा काढता येत नाही. मात्र, यावेळी ऊस क्षेत्र वाढलेले असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्याशी संपर्क साधून यातून मार्ग काढण्याची विनंती केली होती. तसेच भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती. कारखाने भाडे तत्वावर दिल्यानंतर येणाऱ्या अनामत ठेवीतून प्रथम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे देणे देण्याच्या अटीवर कारखाना भाडे तत्वावर देण्याच्या प्रस्तावास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने सहमती द्यावी अशी विनंती केली. हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असल्याने जिल्हा बँक व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय यांच्यात परस्पर सहमतीने तडजोडीचे मुद्दे दाखल करुन सर्व न्यायालयीन बाबींची पुर्तता करण्याचे ठरले व तसा हमीपत्रासह प्रस्ताव भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना तत्कालीन जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिल्या होत्या.

याअनुषंगाने जिल्हा बँकेकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यास सकारात्मक प्रतिसाद देत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने तीन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करू, असे सुस्पष्ट प्रतिज्ञापत्र देण्याचे सूचित केले होते. त्यानुसार उच्च न्यायालयात बँकेमार्फत हमी पत्र दाखल करण्यात आले असून, २३ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाकडून शेतकरी सभासदांच्या हिताचा निर्णय होईल, अशी अपेक्षा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.