शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

ग्रामसेविकेने घेतली ८ हजारांची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST

उस्मानाबाद तालुक्यातील धारुर ग्रामपंचायत हद्दीत शेती असलेल्या एका शेतकऱ्यास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेमधून विहीर मंजूर झाली होती. या ...

उस्मानाबाद तालुक्यातील धारुर ग्रामपंचायत हद्दीत शेती असलेल्या एका शेतकऱ्यास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेमधून विहीर मंजूर झाली होती. या विहिरीचे कामही पूर्ण झाले आहे. याअनुषंगाने संबंधित शेतकऱ्याच्या मुलाने ग्रामसेविका अमरजा मुकुंद शेखदार (४२) यांच्याकडे कुशल कामाचा २६ हजार ६६७ रुपयांचा धनादेश व यापूर्वीची शिल्लक रक्कम काढून देण्याची मागणी केली होती. मात्र, हे बिल काढून देण्यासाठी अमरजा शेखदार यांनी तक्रारदाराकडे ११ हजार रुपयांची मागणी केली. तडजोड अंती १० हजार रुपये स्वीकारण्यास शेखदार यांनी मान्य केले. दरम्यान, तक्रारदाराने यासंदर्भात उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी लाचेच्या मागणीची खात्री करुन घेतली. यानंतर सापळा रचून मंगळवारी सायंकाळी तक्रारदारास ग्रामसेविकेकडे पाठवून दिले. तक्रारदाराने येथे लाचेच्या रकमेपैकी ८ हजार रुपये शेखदार यांच्याकडे देऊ केले. ही रक्कम स्वीकारताच उपाधीक्षक संपते यांच्यासह सापळ्यात सहभागी असलेले कर्मचारी दिनकर उगलमुगले, पांडुरंग डंबरे, अर्जुन मारकड, मधुकर जाधव, विष्णू बेळे, करडे यांनी आरोपीस रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरा आरोपी अमरजा शेखदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.