शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींनी लोकसंख्येच्या तिप्पट झाडे लावावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी लोकसंख्येच्या तीनपट झाडे लावण्याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ...

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी लोकसंख्येच्या तीनपट झाडे लावण्याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिले.

वृक्षारोपणाचे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने तालुक्याशी समन्वय ठेवता यावा, या दृष्टीने डॉ. फड यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, कुंभार, डॉ. तुबाकले, तालुका संपर्क अधिकारी कार्यकारी अभियंता (बांधकाम) भोसले, जिल्हा जलसंधारण अधिकारी जोशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी निपाणीकर, कृषी विकास अधिकारी डॉ. चिमणशेटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आघाव, कार्यकारी अभियंता देवकर आदी उपस्थित होते.

डॉ. फड म्हणाले, सद्य:स्थितीत उद्भवलेल्या कोविड परिस्थितीने रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनच्या माध्यमातून वृक्षांची महती पुन्हा प्रकर्षाने जाणवून दिलेली आहे. या सर्व बाबी विचारात घेता मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीने गावच्या लोकसंख्येच्या किमान तीनपट झाडे लावून ती जगविण्याची जबाबदारी घ्यावी. यामध्ये घन वन लागवड, गाव तेथे देवराई, रस्ता दुतर्फा लागवड, सार्वजनिक विहिरीच्या भोवती लागवड, स्मृती वन, शेताच्या बांधावर लागवड, शेतामध्ये लागवड, नदी नाले यांच्या काठावर लागवड, औषधी वनस्पतींची वने आदी प्रकारे लागवड करून उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबतही डॉ. फड यांनी निर्देश दिले.