शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ग्रामपंचायतींना निवडणूक पावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:22 IST

कळंब : आगामी ग्रामपंचायत निवडणूक दस्तुरखुद्द ग्रामपंचायतींनाच चांगली ‘पावली’ असून, उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक असणाऱ्या ‘बेबाकी’ प्रमाणपत्रासाठी तालुक्यातील ...

कळंब : आगामी ग्रामपंचायत निवडणूक दस्तुरखुद्द ग्रामपंचायतींनाच चांगली ‘पावली’ असून, उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक असणाऱ्या ‘बेबाकी’ प्रमाणपत्रासाठी तालुक्यातील संभाव्य उमेदवारांनी आपल्याकडील बाकी जमा केली असल्याने तब्बल ४० लाख रुपयांच्या आसपास रकमेची ग्रामपंचायतीच्या तिजोरीत भर पडली आहे.

तालुक्यातील निवडणूक पात्र ५९ गावांतील ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राबवला जात आहे. यामुळे गावगाड्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकूण १८८ प्रभागांतील ४९५ जागांसाठी तगडे उमेदवार उभे करण्यासाठी सुरू असलेली पॅनलप्रमुखांची धडपड अंतिम टप्प्यात आली आहे.

यासाठी गावपातळीवर कुठे महाविकास आघाडी, तर कुठे समविचारांची मोट बांधून पॅनल तयार करण्यात आला आहे. कुठे दुरंगी तर, कुठे बहुरंगी लढती होत आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवारी अंतिम तिथी होती. या अखेरच्या दिवसांपर्यंत ४९५ जागांसाठी विक्रमी अशा १ हजार ३५५ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

सदर उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना विविध कागदपत्रांसह स्थानिक ग्रामपंचायतीचे कोणतेही देणे नसल्याचे ‘बेबाकी’ प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत दाखल करणे बंधनकारक होते. यामुळे एरव्ही ग्रा.पं.च्या ‘डिमांड रजिस्टर’मध्ये थकबाकी असलेला देय कर भरणा करण्याकडे कानाडोळा करणारे संभाव्य उमेदवार आपले खाते बेबाक करण्यावर भर देत होते.

यामुळे ग्रा.पं.च्या किमान त्या उमेदवारासंदर्भात तरी वसुली होत असल्याने सचिव असलेली ग्रामसेवक मंडळी समाधान व्यक्त करत होती.

तालुक्यात मागच्या पाच दिवसांत बहुतांश उमेदवारांनी आपल्या खिशात हात घालत ग्रा.पं.च्या देय रकमा चुकत्या केल्या आहेत. यातून बुधवारी दुपारपर्यंत मोठी ‘वसुली’ झाल्याने ग्रामपंचायतीच्या तिजोरीत भर पडली आहे.

चौकट...

प्रमाणपत्रासाठी ठाण

४० ग्रा.पं., ३० लाखांची वसुली

बुधवारी दुपारपर्यंत विविध गावांच्या ग्रा.पं.मध्ये बेबाकी प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवार व त्यांचे पुढारी ठाण मांडून बसले होते. यातून दुपारपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार तालुक्यातील ४० ग्रामपंचायत कार्यालयांत उमेदवारांनी तब्बल ३० लाख रुपयांचा भरणा केला होता. उर्वरित १९ ग्रामपंचायतींचा आकडा गृहीत धरला, तर ही जमा चाळीस लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

उमेदवार हवाय ना, मग तुम्हीच बाकी भरा

बेबाकी प्रमाणपत्रासाठी दखलपात्र वसुली झाल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक खुद्द ग्रा.पं.नाच पावली आहे. असे असले तरी अनेक गावांत उमेदवारांनी ‘तुम्हाला उमेदवार हवाय ना, तर माझी बाकी तुम्हीच भरा’, असा कावा केल्याने पुढाऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागली आहे.

या आहेत टॉप फाइव्ह ग्रा.पं.

घरपट्टी, गाळा भाडे, भाडेकरार जागा आकारणी, दिवाबत्ती कर, आरोग्य कर, विशेष पाणीपट्टी, सामान्य पाणीपट्टी, अशा विविध देय रकमांचा भरणा संभाव्य उमेदवारांनी ग्रामपंचायतीकडे केला आहे. यातून ईटकूर ग्रामपंचायतीकडे सर्वाधिक २ लाख ९९ हजारांची वसुली झाली आहे. याशिवाय मंगरूळ २ लाख ६५ हजार, शेलगाव एक लाख ५५ हजार, येरमाळा १ लाख ४६ हजार, तर नायगाव १ लाख २४ हजार रुपये, असा ग्रा.पं.च्या तिजोरीत भरणा झाला आहे.