शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

चोरीचा आळ येण्याच्या भीतीने विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 11:30 IST

महाविद्यालयाच्या वसतिगृहातच घेतला गळफास

ठळक मुद्देवाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या वसतिगृहातील घटना

वाशी (जि़ उस्मानाबाद) : पैसे चोरीचा आळ आपल्यावर येईल, या भीतीने क्षितिजा शंकर शिंदे (१७) या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी वाशी येथे उघडकीस आली आहे़ याप्रकरणी वाशी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

बार्शी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात मुलींचे निवासी वसतिगृह आहे. या वसतिगृहात ३६५ विद्यार्थिनी वास्तव्यास आहेत़ याच वसतिगृहात राहून ११ वी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असलेल्या क्षितिजा शंकर शिंदे (रा़ बावी, ता़ वाशी) या मुलीने ११ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास वसतिगृहातील खोली क्रमांक ४ मध्ये ओढणीच्या साहाय्याने छतास गळफास घेऊन आत्महत्या केली़ दरम्यान, तिच्या खोलीतील तीन मैत्रिणींचे पैसे चोरीस गेले होते़ त्याचा आळ आपल्यावर येईल, या भीतीने तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी नोंद केले आहे़  ही घटना प्राचार्यांनी तातडीने पोलिसांना कळवली़ पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली़ मुलीचे नातेवाईक आल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह मुलीच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सहायक निरीक्षक किशोर चोरगे करीत आहेत़रेक्टरचे लक्ष चुकवून केला आत्मघातक्षितिजाच्या खोलीत पैसे चोरीचा प्रकार घडल्यानंतर भेदरलेल्या क्षितिजाच्या काळजीपोटी प्राचार्या डॉ़ शारदा मोळवणे यांनी तिच्या नातेवाईकांना कळवून तिला रेक्टरसोबतच राहण्याची सूचना केली होती़ प्राचार्यांच्या सूचनेप्रमाणे रेक्टर यांनी तिला स्वत:च्या खोलीतच सोबत घेतले होते़ रात्रभर ती त्यांच्याजवळ होती़ रेक्टर सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास प्रात:विधीस गेल्यानंतर क्षितिजा शिंदे हिने तिची खोली गाठत आतून कडी लावून घेऊन ओढणीने गळफास घेतला़ दरम्यान, रेक्टरला आपल्या खोलीत क्षितिजा दिसून न आल्याने त्यांनी तिच्या खोलीकडे धाव घेतली असता, आतून प्रतिसाद मिळत नसल्याने खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. आतमध्ये क्षितिजाचा मृतदेह छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला़ 

महाविद्यालयात घडलेली घटना दुर्दैवी आहे़ यापुढे अशा प्रकारची कोणतीही घटना अथवा चुकीचे प्रकार घडणार नाहीत, यासाठी महाविद्यालय प्रशासन अधिक सुरक्षेची काळजी तत्परतेने घेत आहे़ -डॉ. शारदा मोळवणे, प्राचार्या