शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

जिल्ह्यातील २०० गावांत कचरा संकलन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:39 IST

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन : प्रत्येक कुटुंबास देणार दोन डस्टबिन उस्मानाबाद : स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात दोन टप्प्यात ...

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन : प्रत्येक कुटुंबास देणार दोन डस्टबिन

उस्मानाबाद : स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात दोन टप्प्यात २०० गावांत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून गावांत कचरा संकलन केंद्र, घंटागाडी, प्रत्येक घरी दोन कचराकुंड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे ६२ ते ६३ कोटींची तरतूद आहेत.

आजही अनेक गावांत सांडपाण्याची व्यवस्था नसते. पाणी रस्त्यावरून वाहते. मोक्याच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग नजरेस पडतात. हे चित्र बदलण्यासाठी जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची पारदर्शक अंमलबजावणी व्हावी याकरिता १६ संस्था नियुक्त केल्या आहेत. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील २०० गावांची निवड करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ५५ तर दुसऱ्या १४५ गावात कामे केली जाणार आहेत. प्रकल्पाच्या माध्यमातून ६२ ते ६३ कोटींची तरतूद केली आहे. सदरील निधीतून प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबासाठी दोन कचराकुंड्या पुरविण्यात येतील. डोअर तू डोअर कचरा संकलनासाठी एक बॅटरीवर चालणारी घंटागाडी, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचू नये यासाठी सार्वजनिक कचराकुंडी, प्रत्येक घरासाठी शोषखड्डा तसेच वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये ही उभारण्यात येणार आहेत. एवढेच नाही तर प्रत्येक गावात कचरा संकलन केंद्रही उभारले जाणार आहे.

चौकट... प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्र... २०० गावांत कचरा संकलन केंद्र सुरू केली जाणार आहेत. या केंद्रात संकलित होणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण केले जाईल. यातून निघणारा प्लास्टिक कचरा एकत्रित करून तालुक्याच्या ठिकाणी सुरू करण्यात येणाऱ्या प्लास्टिक कचरा प्रोसेसिंग युनिटला पाठविला जाईल. अशा एका युनिटवर १६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असे युनिट असेल.

...तर पीव्हीसी पाईप गटार ५ हजार व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात सांडपाणी व्यवस्थापनासाठी पीव्हीसी पाईप गटार योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अशा गावातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.

कोट.... जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील ५५ गावांची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. लवकरच कामे सुरू होतील. हा प्रकल्प राबविण्यासाठी १६ संस्थांची निवड केली आहे.

-अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकरी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.