शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

भुयारी मार्गासाठी घातले गडकरींना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST

उमरगा : उमरगा-लोहारा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे मागील सहा वर्षांपासून कासवगतीने चालू असून, तेही निकृष्ट होत आहे, शिवाय ...

उमरगा : उमरगा-लोहारा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे मागील सहा वर्षांपासून कासवगतीने चालू असून, तेही निकृष्ट होत आहे, शिवाय महामार्गालगत असलेल्या गावांना भुयारी मार्ग, उड्डाणपुलाची सोय नसल्याने, महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. अनेक उड्डाणपूल अपूर्ण असताना, कंत्राटदाराने सक्तीने टोलवसुलीही सुरू केली असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांच्यासह शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली.

यावेळी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उस्मानाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार, माजी आ.राहुल मोटे, आ.कैलास पाटील, ॲड.अभय चालुक्य, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, दीपक जवळगे यांची उपस्थिती होती.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने उमरगा व लोहारा तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून, तेही निकृष्ट होत आहे. महामार्गालगत असलेल्या बलसूर मोड, डाळिंब, रामपूर, जकेकूर, दाबका, दस्तापूर या गावांतील नागरिकांच्या सुरक्षितेसाठी भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलाची सोय करण्यात आलेली नाही. महामार्गावरून वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण नसल्याने रस्ता ओलांडताना यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. आता चौपदरीकरण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढू शकते, असे या निवेदनात म्हटले आहे.

बलसूर मोड येथून बलसूर, समूद्राळ, सास्तूर आदी गावांना जाणारा हा मुख्य रस्ता आहे, तसेच बलसूर-लोहारा मार्गावर दोन साखर कारखाने आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र, बलसूर मोड येथे भुयारी मार्गाची सोय नसल्याने, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात चार वेळेस रस्ता रोको, धरणे आंदोलन करण्यात आले, परंतु महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमार्फत फक्त आश्वासने देण्यात आली आणि निकृष्ट स्वरूपाचे काम रेटून नेण्यात आले. यामुळे महामार्गावर मोठमोठे खड्डे पडत असून, अनेक ठिकाणी रस्ता खचून खड्डे निर्माण होत आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिल्याचे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत फोनवरून सूचना दिल्याचे. प्रा.बिराजदार यांनी सांगितले.