शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
4
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
5
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
6
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
7
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
8
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
9
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
10
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
11
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
12
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
13
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
14
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
15
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
16
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
17
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
18
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
19
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
20
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?

भुयारी मार्गासाठी घातले गडकरींना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST

उमरगा : उमरगा-लोहारा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे मागील सहा वर्षांपासून कासवगतीने चालू असून, तेही निकृष्ट होत आहे, शिवाय ...

उमरगा : उमरगा-लोहारा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे मागील सहा वर्षांपासून कासवगतीने चालू असून, तेही निकृष्ट होत आहे, शिवाय महामार्गालगत असलेल्या गावांना भुयारी मार्ग, उड्डाणपुलाची सोय नसल्याने, महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. अनेक उड्डाणपूल अपूर्ण असताना, कंत्राटदाराने सक्तीने टोलवसुलीही सुरू केली असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांच्यासह शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली.

यावेळी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उस्मानाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार, माजी आ.राहुल मोटे, आ.कैलास पाटील, ॲड.अभय चालुक्य, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, दीपक जवळगे यांची उपस्थिती होती.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने उमरगा व लोहारा तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून, तेही निकृष्ट होत आहे. महामार्गालगत असलेल्या बलसूर मोड, डाळिंब, रामपूर, जकेकूर, दाबका, दस्तापूर या गावांतील नागरिकांच्या सुरक्षितेसाठी भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलाची सोय करण्यात आलेली नाही. महामार्गावरून वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण नसल्याने रस्ता ओलांडताना यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. आता चौपदरीकरण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढू शकते, असे या निवेदनात म्हटले आहे.

बलसूर मोड येथून बलसूर, समूद्राळ, सास्तूर आदी गावांना जाणारा हा मुख्य रस्ता आहे, तसेच बलसूर-लोहारा मार्गावर दोन साखर कारखाने आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र, बलसूर मोड येथे भुयारी मार्गाची सोय नसल्याने, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात चार वेळेस रस्ता रोको, धरणे आंदोलन करण्यात आले, परंतु महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमार्फत फक्त आश्वासने देण्यात आली आणि निकृष्ट स्वरूपाचे काम रेटून नेण्यात आले. यामुळे महामार्गावर मोठमोठे खड्डे पडत असून, अनेक ठिकाणी रस्ता खचून खड्डे निर्माण होत आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिल्याचे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत फोनवरून सूचना दिल्याचे. प्रा.बिराजदार यांनी सांगितले.