शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीचे सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांनाही चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:24 IST

भूम : दिवसागणिक पेट्राेलच्या दरामध्ये झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांवरही हाेऊ लागला आहे. वाहतूक ...

भूम : दिवसागणिक पेट्राेलच्या दरामध्ये झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांवरही हाेऊ लागला आहे. वाहतूक खर्च वाढल्याने वस्तूंचे दरही वधारले आहेत. परिणामी सामान्य व्यक्तींच्या खिशाला अधिकची झळ बसू लागली आहे. एवढेच नाही तर शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनाही जास्तीचे पैसे माेजावे लागत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळते.

काेराेनाच्या संकटामुळे एकीकडे लाेक बेजार झाले आहेत. अर्थकारण पूर्ण काेलमडून पडले आहे. अशा अवस्थेत सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी पाऊले सरकारने उचलणे गरजेचे आहे. परंतु , तूर्तास तसे हाेताना दिसत नाही. उलट इंधन दरवाढीच्या माध्यमातून आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांसाेबतच सर्वसामान्यांना जास्तीच्या आर्थिक खाईत लाेटण्याचे काम हाेताना दिसत आहे. साधारणपणे पंधरा ते वीस दिवसांपूर्वी शंभराच्या आत असलेल्या पेट्रोलने केव्हाच शंभरी पार केली. आजघडीला एका लीटर पेट्राेलसाठी ग्राहकांना १०१ रूपये ४४ पैसे माेजावे लागत आहेत. डिझेलचे दरही काही स्थिर नाहीत. पेट्राेलच्या मागाेमाग डिझेलही महाग हाेत चालले आहे. याचा फटका केवळ वाहनधारकांनाच बसत आहे, हे म्हणणे वरवरचे ठरेल. व्यापारी आपल्या दुकानातील साहित्य बाहेरच्या राज्यातून वा मुंबई, पुणे यासारख्या माेठ्या बाजारपेठेतून खरेदी करतात. अशा व्यापाऱ्यांना इंधन दरवाढीची झळ बसू लागली आहे. वाहतूक खर्चात सध्या माेठी वाढ झाली आहे. दरम्यान, हा वाहतूक खर्च व्यापारी ग्राहकांकडून वसूल करतात. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत सर्वच वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाली आहे. परिणामी ग्राहकांना आता जास्तीचे पैसे माेजावे लागत आहेत. इंधन दरवाढ अशीच सुरू राहिल्यास वाहनधारकांना आपली वाहने गेटच्या बाहेर काढणे अशक्य हाेईल. त्यामुळे केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी इंधन दरवाढ कमी करू,अशा वल्गना करणारे सरकार सत्तेवर आल्यानंतर मात्र कुठल्याही स्वरूपाची ठाेस पाऊले उचलताना दिसत नाही, हे विशेष.

चाैकट...

शेतीची मशागतही महागली...

साधारपणे ६ महिन्यांपूर्वी डिझेलचा दर कमी हाेता. तेव्हा ट्रॅक्टरधारक नांगरणीसाठी एकरी तेराशे ते चाैदाशे रूपये घेत हाेते. परंतु, डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ हाेऊ लागल्यानंतर नांगरणीचा दर प्रति एकर १ हजार ७०० रूपये एवढा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचेही अर्थकारण बिघडले आहे.

काेट...

पूर्वी दाेनशे रुपयांचे पेट्राेल गाडीत भरल्यानंतर चार-पाच दिवस निघत हाेते. परंतु, मागील काही दिवसांत पेट्राेलने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे सध्या दाेनशे रुपयांचे पेट्राेल भरल्यानंतर दाेन ते तीनच दिवस पुरते. एकूणच आमची निम्मी कमाई इंधनावर खर्च हाेऊ लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यात लक्ष घालून महागाई नियंत्रणात आणावी.

-साेमनाथ टकले, भूम.

केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना, विद्यमान प्रधानमंत्री इंधन दरवाढीला सरकारचे धाेरण जबाबदार असल्याचे सांगत हाेते. सत्तेत येताच दरवाढ कमी करू, अशी वल्गनाही ते करीत हाेते. परंतु, सध्या इंधनाच्या दराने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य बेजार झाले आहेत. सर्वसामान्यांची ५० टक्के कमाई इंधनावर खर्च हाेत आहे. असे असतानाही केंद्रातील सरकार चकार शब्द काढायला तयार नाही. तसेच इंधन दरवाढ कमी करण्याचे नाव घेत नाही.

-गणेश शाळू, जिल्हा सरचिटणीस, युवक काँग्रेस

एकीकडे सरकार शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढवावे, असे सांगत आहे. यंत्रे घेण्यासाठी थाेडे बहुत अनुदान दिले जात आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळले आहेत. असे असतानाच दुसरीकडे इंधनाचे दर प्रचंड वाढविले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करणे अवघड हाेऊन बसले आहे. इंधन दरवाढ कमी करण्याच्या अनुषंगाने ठाेस उपाययाेजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

-तानाजी पाटील, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना.