शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

बालाघाटच्या डोंगरातील चार तलाव ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:36 IST

कळंब : मागच्या आठवडाभरात येरमाळा भागात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे येडेश्वरी डोंगररांगाच्या निसर्गरम्य भागात स्थिरावलेल्या चोराखळी साठवण तलावासह ...

कळंब : मागच्या आठवडाभरात येरमाळा भागात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे येडेश्वरी डोंगररांगाच्या निसर्गरम्य भागात स्थिरावलेल्या चोराखळी साठवण तलावासह अन्य तीन तलाव ओसंडून वाहत आहेत.

कळंब तालुक्यातील येरमाळा भागातून बालाघाटाच्या डोंगररांगा गेल्या आहेत. या भागाला येडेश्वरी डोंगर असेही संबोधले जाते. याच भागात चोराखळी, मलकापूर, येरमाळा व येडेश्वरी हे पाटबंधारे विभागाचे चार साठवण तलाव बांधण्यात आलेले आहेत. चारही तलाव निसर्गरम्य अशा बालाघाटाच्या डोंगररांगेत आहेत. अशा या परिसरात सप्टेंबर महिन्यात दखलपात्र पाऊस झाला. यामुळे पाण्याची झालेली चांगली आवक पाटबंधारे प्रकल्पाच्या झोळीत पाण्याची भर घालणारी ठरली आहे. यातही सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचा जोर अधिक वाढला. यामुळे आजच्या स्थितीत चोराखळी, मलकापूर व येरमाळा येथील येडेश्वरी, येरमाळा हे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

चौकट...

६.८८० दलघमी साठा...

चोराखळी साठवण तलावाची साठवण क्षमता ३.४३४ दलघमी असून, २४ सप्टेंबरला तो ओव्हरफ्लो झाला आहे. याशिवाय १.४०९ दलघमी क्षमतेचा येरमाळा, १.०९२ क्षमतेचा येडेश्वरी, तर ०.९४५ दलघमी क्षमतेचा मलकापूर तलाव ओसंडून वाहत आहेत.

तब्बल ३४० मिमी पावसाची नोंद...

सप्टेंबर महिन्यात महावेधने घेतलेल्या पावसाच्या नोंदीनुसार, येरमाळा येथे तब्बल ३४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यातील आजवरचा हा विक्रमी पाऊस आहे.

पूल गेला वाहून

चोराखळी येथे अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतशिवारात पाणीच पाणी झाले आहे. याचाच फटका गावाजवळच्या स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्यावरील पुलास बसला आहे. हा पूल वाहून गेला आहे. याशिवाय येथील एका पाझर तलावाची धोकादायक स्थिती झाली आहे. याची आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पाहणी करून संबधित विभागाला सूचना दिल्या आहेत.

संजीतपूरच्या पुलावर तिसऱ्या दिवशीही पाणी

तालुक्यातील संजीतपूर शिवारातील रस्ते, शेतवाटा पाण्यात पोहत आहेत. अतिवृष्टीमुळे ही स्थिती ओढवली आहे. गावाला जोडणाऱ्या संजीतपूर, सापनाई, येरमाळा या रस्त्यावरील पुलावरून तीन दिवसांपासून पाणी वाहत आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. गावातील शेत शिवारातही अशीच स्थिती असल्याचे समाधान बाराते यांनी सांगितले.

पावसाने सप्टेंबरची सरासरी ओलांडली

तालुक्यात सप्टेंबर महिन्यात १९७ मिलिमीटर सरासरी पाऊस पडत असतो. आजच्या स्थितीत तालुक्यात २३१ मिमी पाऊस झाला आहे. यात शनिवारी तालुक्यातील कळंब २४, इटकूर येथे १७.८,येरमाळा २१.३,मोहा २९.८,शिराढोण २३.८ व गोविंदपूर येथे २६.३ मिलिमीटर असा पाऊस झाला आहे.