शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बियाणांसाठी पावणेसतरा हजार अर्ज, सव्वादोन हजारांनाच लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान २०२०-२१ अंतर्गत अनुदानित बियाणांसाठी पावणेसतरा हजार शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते. यापैकी केवळ सव्वादोन ...

उस्मानाबाद : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान २०२०-२१ अंतर्गत अनुदानित बियाणांसाठी पावणेसतरा हजार शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते. यापैकी केवळ सव्वादोन हजार शेतकऱ्यांना लॉटरी लागली असून, उर्वरित शेतकऱ्यांना आता बाजारभावानुसार बियाणे खरेदी करावे लागणार आहे.

शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकांतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतील सोयाबीन, तूर, मूग, उडीद इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार असून, यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अंतिम मुदतीपर्यंत १६ हजार ७४४ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी २ हजार ३०६ शेतकऱ्यांनाच लाॅटरी लागली आहे. या शेतकऱ्यांना १७७१.४० क्विंटल बियाणे वितरित करण्यात येणार आहे, तर उर्वरित शेतकऱ्यांना आता बाजारभावानुसार बियाणे खरेदी करावे लागणार आहे.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांचे सोडतीत नाव आले आहे, त्यांना मोबाईलवर शासनाकडून मेसेज देण्यात येणार असल्याची माहिती कळविण्यात आली आहे. लवकरच तालुकास्तरावरून या शेतकऱ्यांना बियाणे वाटपाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी तयारीही पूर्ण झाली आहे.

महागडे बियाणे कसे परवडणार?

सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा

सोयाबीन बियाणांसाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केली होती. मात्र, लॉटरीत नाव आलेले नाही. बियाणांचे भाव प्रतिदिन वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ मिळणे गरजेचे आहे.

- विशाल जमाले, शेतकरी, कसबे तडवळे

महागाईने कळस गाठला

महाडीबीटी पोर्टलवर सोयाबीन बियाणांसाठी नोंदणी केली होती. मात्र, सोडतीत नाव आलेले नाही. गतवर्षीपेक्षा यंदा सोयाबीन बियाणे महागले आहे. ३० किलोची बॅग तीन ते साडेतीन हजार रुपयांना मिळत आहे. महागाईने कळस गाठला असून, शासनाने बियाणांचे दर नियंत्रणात ठेवावेत.

- सुधीर लाकाळ, शेतकरी, पळसप

योजना समजून सांगणे गरजेचे

शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र, त्यांची म्हणावी तशी जनजागृती होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी योजनांपासून वंचित राहत आहेत. बियाणांसाठी अर्ज केला होता, मात्र, सोडतीत नाव आलेले नाही.

- गोविंद लोमटे, शेतकरी, कावळेवाडी,

कोणत्या तालुक्यात किती अर्ज...

उस्मानाबाद ५६३

तुळजापूर ४४९

उमरगा २८४

लोहारा १६४

भूम १९४

परंडा १७

वाशी २४९

कळंब ३८६

अनुदानित बियाणांसाठी आलेले अर्ज : १६७४४

लॉटरी किती जणांना : २३०६