शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

वसुली मोहिमेमुळे शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:33 IST

काक्रंबा : सध्या महावितरणकडून थकीत वीज बिलाची जोरादार वसुली सुरू करण्यात आली असून, मार्चनंतर कनेक्शन कट करण्यात येणार असल्याचे ...

काक्रंबा : सध्या महावितरणकडून थकीत वीज बिलाची जोरादार वसुली सुरू करण्यात आली असून, मार्चनंतर कनेक्शन कट करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगितले जात आहे. दरम्यान, महाविरतणने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनेबाबत सार्वजनिक ठिकाणी फलक लावून जनजागृतीही केली जात आहे.

सध्या गहू, मका, कांदा, उन्हाळी भुईमूग, ऊस, भाजीपाला पिकासह आंबा, द्राक्षे, चिकू, पेरू, डाळिंब आदी बागांना पाण्याची नितांत गरज आहे. असे असतानाच महावितरणकडून ही वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. घरगुती वीज वापर करणाऱ्या थकित ग्राहकांची यादी ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर लावण्यात आली असून, सध्या लाईनमन घरोघर जाऊन वीज बिल भरण्यासंबंधी आवाहन करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांना सवलतीच्या योजनेचा लाभ दिला जात आहे. परंतु, मार्चएन्डमुळे शेतकरी इतरही कर्जे नवे-जुने करण्याच्या धावपळीत असून, त्यातच वीज बिलाची वसुलीही सुरू झाल्याने शेतकऱ्यांत चिंता व्यक्त होत आहे.

कोट........

आमच्याकडे पन्नास ते साठ हजार बिल थकीत आहे. मात्र, गेले वर्षभर कोरोनामुळे शेत मालाला चांगली बाजारपेठ मिळत नाही. तसेच पिकवलेल्या धान्याला भावही मिळत नाही. त्यातच यावर्षीच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जमिनीच वाहून गेल्या. त्यामुळे वीज बिलात सवलत मिळण्याची गरज आहे.

- पद्मराज गडदे, शेतकरी काक्रंबा

वीजबिल भरलेच पाहिजे. यात दुमत नाही. मात्र, महावितरणकडून चोवीस तासांपैकी आठ तासच शेतीसाठी वीज मिळते. यातही अनेकदा रोहित्र बंद झाल्यास किंवा कुठे बिघाड झाल्यास व्यत्यय येतो. यामुळे सलग आठ तास वीज उपलब्ध होत नाही.

- संजय सोनटक्के, शेतकरी काक्रंबा

सध्या थकीत वीज बिलाची वसुली सुरू करण्यात आली आहे. घरगुती ग्राहकांना घरोघरी जाऊन बिल भरणा करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. शिवाय, शेतकऱ्यांसाठी महा कृषी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ५० ते ६० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन महावितरणला सहकार्य करावे.

- शिरीष कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता, उपकेंद्र, तुळजापूर

गावातील प्रवेशद्वारावर अशी फ्लेक्स लावून महावितरणकडून जनजागृती करण्यात येत आहे.