शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनाे, थेट कृषी सहायकांकडे द्या मागणी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : खरीप-२०२० मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीने सोयाबीनचे प्रचंड नुकसान होऊनदेखील ८० टक्के शेतकरी हक्काच्या पीक विम्यापासून वंचित आहेत. राज्य ...

उस्मानाबाद : खरीप-२०२० मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीने सोयाबीनचे प्रचंड नुकसान होऊनदेखील ८० टक्के शेतकरी हक्काच्या पीक विम्यापासून वंचित आहेत. राज्य सरकारने नुकसान झाल्याचे मान्य करीत अनुदान दिले; परंतु विमा भरपाईबाबाबत मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रयत्न करूनदेखील उर्वरित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. आता न्यायालयीन लढाईचा एक भाग म्हणून अनुदान मिळालेल्या, परंतु विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या परिसराच्या कृषी सहायकांकडे मागणी अर्ज देण्याचे आवाहन भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

पिकांच्या नुकसानीच्या अनुषंगाने २०१९ मध्ये फडणवीस सरकारने जशी सरसकट नुकसान भरपाई दिली, त्याप्रमाणे सरसकट नुकसानभरपाई दिली जाईल, अशी चर्चा असल्याने शेतकऱ्यांनी तेव्हा नुकसानभरपाईचा वेगळा अर्ज केला नव्हता. परंतु, शासकीय यंत्रणेला नुकसान झाल्याचे कळविले होते. एवढेच नाही तर प्रत्येक गावात जाऊन शासकीय यंत्रणेने नुकसानीची पाहणीदेखील केली होती. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदान देण्यात आले, याचा अर्थ या सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. हे राज्य सरकारने मान्य केले आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची प्रक्रिया राज्य सरकारच्या कृषी आयुक्तांच्या माध्यमातून होते. निविदा काढून विमा कंपनी ठरविणे व करार करण्याची जबाबदारी ही कृषी आयुक्तांची आहे. म्हणजे पीक विम्याच्या प्रक्रियेत राज्य सरकारची जबाबदारी सुनिश्चित आहे. असे असतानाही शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठीचा लेखी अर्ज ७२ तासांत दिला नसल्याचे कारण देत विमा नाकारला. त्यामुळे नुकसान हाेऊनही सुमारे ३ लाख ८१ हजार ५८४ शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी शासनाची आहे. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊनही २०१९ प्रमाणे आजवर भरपाई मिळू शकली नाही. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

आता न्यायालयीन लढाई...

राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही आजवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे पीक विम्याप्रश्नी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनुदान मिळालेल्या, परंतु नुकसानभरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या भागातील कृषी सहायकांकडे मागणी अर्ज सादर करावेत. त्याची रीतसर पाेहोच घ्यावी, असे आवाहन भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.