शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:33 IST

तामलवाडी : मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने बागांना पाणीटंचाईचा फटका बसू नये, यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी ...

तामलवाडी : मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने बागांना पाणीटंचाईचा फटका बसू नये, यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी यासाठी द्राक्ष झाडाच्या बुंध्याला ओलावा टिकून राहण्यासाठी सोयाबीनचे भुस्कट, उसाचे पाचट द्राक्षाचा झाडाभोवताली लावून मलचिंग करण्यात येत आहे.

तामलवाडी भागात द्राक्षबागेचे क्षेत्र दुप्पटीने वाढत चालले आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बागायदार शेतकऱ्यांनी माळरानावर पिकविलेली द्राक्ष परदेशात विक्रीसाठी जात आहेत. ठिबक सिंचनाचा वापर करून कमी पाण्यावर फळबागा घेण्याकडे कल वाढला आहे. दरम्यान, मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमान ३५ अंशांवर गेले आहे. त्यामुळे द्राक्ष तोडणीनंतर झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीला भेगा पडून द्राक्षवेलीला धोका पोहोचू शकतो. हा धोका ओळखून बुडाजवळ जमिनीची धूप थांबविण्यासाठी झाडाशेजारी सोयाबीनचे भुसकट, उसाचे पाचट अंथरुण झाडाला दिलेल्या पाण्याचा ओलावा टिकून राहण्यासाठी मलचिंग केले जात आहे. त्यासाठीचा खर्च वाढला असला, तरी बागा जगविण्यासाठी हा खर्च करणे गरजेचे असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

चौकट

पाचटाला आला भाव

उसतोडणीनंतर फडात राहणारे शिल्लक पाचट पूर्वी शेतकरी जाळून टाकत. मात्र, द्राक्षबागेचे वाढलेले क्षेत्र पाहता, बागायतदार ते पाचट ऊसउत्पादक शेतकऱ्यांकडून मशीनद्वारे गाठी बांधून घेत आहेत. एका पाचटाच्या गाठीसाठी २० रुपये मोजावे असून, वाहतूक, बागेत अंथरणे, यासाठी १० रुपये खर्च असा एकूण एका पाचटाच्या गाठीसाठी ३० रुपये खर्च येतो. त्यामुळे एकरी वर्षभरासाठी ३ लाख रुपये खर्च करावा लागत आहे

कोट...........

काटी मंडळ कृषी कार्यालयांतर्गत २२ गावांतून २५० शेतकऱ्यांनी द्राक्षे निर्यात करण्यासाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे. त्यापैकी ६० द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष निर्यात प्रमाणपत्र कृषी कार्यालयाकडून वितरित करण्यात आले आहे. आतापर्यंत ६०० टन द्राक्ष निर्यात झाले असून, मार्च महिन्यात द्राक्ष परदेशात निर्यात होण्यास गती येईल.

- आनंद पाटील, मंडळ कृषी अधिकारी, काटी, ता.तुळजापूर

देशभरात झालेल्या इंधन दरवाढीचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसू लागला आहे. द्राक्षबागेत फवारणीसाठी वापरण्यात येणारी फवारणी यंत्र, ट्रॅक्टर, तसेच माल वाहतुकीसाठी लागणाऱ्या वाहनांना इंधनाची गरज भासते. बाजारात द्राक्षाला मिळणारा भाव अन्‌ उत्पादनांसाठी होणारा खर्च पाहता, इंधनाची दरवाढ द्राक्ष बागायतदारांना अडचणीची ठरली आहे.

- राजाभाऊ मोटे, शेतकरी, गोंधळवाडी