शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:33 IST

तामलवाडी : मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने बागांना पाणीटंचाईचा फटका बसू नये, यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी ...

तामलवाडी : मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने बागांना पाणीटंचाईचा फटका बसू नये, यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी यासाठी द्राक्ष झाडाच्या बुंध्याला ओलावा टिकून राहण्यासाठी सोयाबीनचे भुस्कट, उसाचे पाचट द्राक्षाचा झाडाभोवताली लावून मलचिंग करण्यात येत आहे.

तामलवाडी भागात द्राक्षबागेचे क्षेत्र दुप्पटीने वाढत चालले आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बागायदार शेतकऱ्यांनी माळरानावर पिकविलेली द्राक्ष परदेशात विक्रीसाठी जात आहेत. ठिबक सिंचनाचा वापर करून कमी पाण्यावर फळबागा घेण्याकडे कल वाढला आहे. दरम्यान, मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमान ३५ अंशांवर गेले आहे. त्यामुळे द्राक्ष तोडणीनंतर झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीला भेगा पडून द्राक्षवेलीला धोका पोहोचू शकतो. हा धोका ओळखून बुडाजवळ जमिनीची धूप थांबविण्यासाठी झाडाशेजारी सोयाबीनचे भुसकट, उसाचे पाचट अंथरुण झाडाला दिलेल्या पाण्याचा ओलावा टिकून राहण्यासाठी मलचिंग केले जात आहे. त्यासाठीचा खर्च वाढला असला, तरी बागा जगविण्यासाठी हा खर्च करणे गरजेचे असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

चौकट

पाचटाला आला भाव

उसतोडणीनंतर फडात राहणारे शिल्लक पाचट पूर्वी शेतकरी जाळून टाकत. मात्र, द्राक्षबागेचे वाढलेले क्षेत्र पाहता, बागायतदार ते पाचट ऊसउत्पादक शेतकऱ्यांकडून मशीनद्वारे गाठी बांधून घेत आहेत. एका पाचटाच्या गाठीसाठी २० रुपये मोजावे असून, वाहतूक, बागेत अंथरणे, यासाठी १० रुपये खर्च असा एकूण एका पाचटाच्या गाठीसाठी ३० रुपये खर्च येतो. त्यामुळे एकरी वर्षभरासाठी ३ लाख रुपये खर्च करावा लागत आहे

कोट...........

काटी मंडळ कृषी कार्यालयांतर्गत २२ गावांतून २५० शेतकऱ्यांनी द्राक्षे निर्यात करण्यासाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे. त्यापैकी ६० द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष निर्यात प्रमाणपत्र कृषी कार्यालयाकडून वितरित करण्यात आले आहे. आतापर्यंत ६०० टन द्राक्ष निर्यात झाले असून, मार्च महिन्यात द्राक्ष परदेशात निर्यात होण्यास गती येईल.

- आनंद पाटील, मंडळ कृषी अधिकारी, काटी, ता.तुळजापूर

देशभरात झालेल्या इंधन दरवाढीचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसू लागला आहे. द्राक्षबागेत फवारणीसाठी वापरण्यात येणारी फवारणी यंत्र, ट्रॅक्टर, तसेच माल वाहतुकीसाठी लागणाऱ्या वाहनांना इंधनाची गरज भासते. बाजारात द्राक्षाला मिळणारा भाव अन्‌ उत्पादनांसाठी होणारा खर्च पाहता, इंधनाची दरवाढ द्राक्ष बागायतदारांना अडचणीची ठरली आहे.

- राजाभाऊ मोटे, शेतकरी, गोंधळवाडी