शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
3
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
4
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
5
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
8
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
9
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
10
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
11
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
12
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
13
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
14
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
15
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
16
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
17
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
18
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
19
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
20
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:31 IST

तुळजापूर : तुळजापूर मंडळातील तुळजापूर, काक्रंबा, काक्रंबा वाडी, सिंदफळ, अमृतवाडी, शिराढोण, ढेकरी, अपसिंगा, कामठा, कात्री, बोरी, तडवळा, मोडाॆ, हंगरगा ...

तुळजापूर : तुळजापूर मंडळातील तुळजापूर, काक्रंबा, काक्रंबा वाडी, सिंदफळ, अमृतवाडी, शिराढोण, ढेकरी, अपसिंगा, कामठा, कात्री, बोरी, तडवळा, मोडाॆ, हंगरगा (तुळ), आदी १४ गावांतील खरिपातील ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली असली तरी अर्धा पावसाळा संपत आला असतानाही या परिसरात एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी, नाले कोरडेच असून, या भागातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

यावर्षी तुळजापूर मंडळात सर्वाधिक ९ हजार ७०७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा झाला. याशिवाय, ३३८ हेक्टरवर उडीद, २४० हेक्टर मूग, २१२ हेक्टर मक्याची पेरणी करण्यात आली आहे. या भागात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून नगदी पीक म्हणून सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या वर्षी रोहिणी नक्षत्रातील पावसाने शेवटच्या टप्प्यात मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य नक्षत्रात अधूनमधून झालेल्या पावसामुळे कशीबशी पिके तग धरून राहिली. मात्र, गेल्या पंधरवड्यात पाऊस गायब झाल्याने कोवळी पिके माना टाकू लागली होती. हलक्या रानावरील पिके तर चक्क जळून गेल्याने शेतकऱ्यांनी ती उपटून जनावरांना टाकली. मागच्या दोन दिवसांत झालेल्या रिमझिम पावसाने पिकांना जीवदान मिळाले खरे; मात्र उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आलेला आहे. दरम्यान, सरसकट पिकांचे पंचनामे करून पीक विमा देण्यात यावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

सध्या सोशल मीडियावर २५ टक्के विमा कंपनी भरपाई मिळणार, अशी पोस्ट फिरते आहे. मात्र, शंभर टक्के नुकसान झाले तर ४५ हजार रुपये हेक्टरी विमा भरपाई मिळते. त्यानुसार २५ टक्क्यांप्रमाणे ११ हजार २०० रुपये मिळणार असतील तर ही शेतकऱ्यांची थट्टाच म्हणावी लागेल.

- आबासाहेब कापसे, सिंदफळ.

गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात पन्नास टक्के घट होणार आहे. मध्यंतरी पाऊस गायब झाल्याने सोयाबीनच्या झाडांना शेंग कमी लागल्यात. त्यातही बहुतांश शेंगांमध्ये बी भरलेले नसल्याने उतार कमी मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

- रणजित नंन्नवरे, हंगरगा (तुळ).

मी दोन बॅग उडीद पेरला होता. मात्र, त्याच्या फूल धारणेच्या व फळधारणेच्या काळात पाऊस झाला नसल्याने उडीद करपून गेला. त्यामुळे काढून बांधावर फेकून दिला. त्यामुळे विमा कंपनीने शंभर टक्के भरपाई देणे गरजेचे आहे.

- बळी सुरवसे, मोर्डा

280821\img-20210814-wa0112.jpg

काक्रंबा परिसरातील जळून जात असलेली सोयाबीनची पिके