शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:31 IST

तुळजापूर : तुळजापूर मंडळातील तुळजापूर, काक्रंबा, काक्रंबा वाडी, सिंदफळ, अमृतवाडी, शिराढोण, ढेकरी, अपसिंगा, कामठा, कात्री, बोरी, तडवळा, मोडाॆ, हंगरगा ...

तुळजापूर : तुळजापूर मंडळातील तुळजापूर, काक्रंबा, काक्रंबा वाडी, सिंदफळ, अमृतवाडी, शिराढोण, ढेकरी, अपसिंगा, कामठा, कात्री, बोरी, तडवळा, मोडाॆ, हंगरगा (तुळ), आदी १४ गावांतील खरिपातील ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली असली तरी अर्धा पावसाळा संपत आला असतानाही या परिसरात एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी, नाले कोरडेच असून, या भागातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

यावर्षी तुळजापूर मंडळात सर्वाधिक ९ हजार ७०७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा झाला. याशिवाय, ३३८ हेक्टरवर उडीद, २४० हेक्टर मूग, २१२ हेक्टर मक्याची पेरणी करण्यात आली आहे. या भागात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून नगदी पीक म्हणून सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या वर्षी रोहिणी नक्षत्रातील पावसाने शेवटच्या टप्प्यात मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य नक्षत्रात अधूनमधून झालेल्या पावसामुळे कशीबशी पिके तग धरून राहिली. मात्र, गेल्या पंधरवड्यात पाऊस गायब झाल्याने कोवळी पिके माना टाकू लागली होती. हलक्या रानावरील पिके तर चक्क जळून गेल्याने शेतकऱ्यांनी ती उपटून जनावरांना टाकली. मागच्या दोन दिवसांत झालेल्या रिमझिम पावसाने पिकांना जीवदान मिळाले खरे; मात्र उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आलेला आहे. दरम्यान, सरसकट पिकांचे पंचनामे करून पीक विमा देण्यात यावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

सध्या सोशल मीडियावर २५ टक्के विमा कंपनी भरपाई मिळणार, अशी पोस्ट फिरते आहे. मात्र, शंभर टक्के नुकसान झाले तर ४५ हजार रुपये हेक्टरी विमा भरपाई मिळते. त्यानुसार २५ टक्क्यांप्रमाणे ११ हजार २०० रुपये मिळणार असतील तर ही शेतकऱ्यांची थट्टाच म्हणावी लागेल.

- आबासाहेब कापसे, सिंदफळ.

गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनात पन्नास टक्के घट होणार आहे. मध्यंतरी पाऊस गायब झाल्याने सोयाबीनच्या झाडांना शेंग कमी लागल्यात. त्यातही बहुतांश शेंगांमध्ये बी भरलेले नसल्याने उतार कमी मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

- रणजित नंन्नवरे, हंगरगा (तुळ).

मी दोन बॅग उडीद पेरला होता. मात्र, त्याच्या फूल धारणेच्या व फळधारणेच्या काळात पाऊस झाला नसल्याने उडीद करपून गेला. त्यामुळे काढून बांधावर फेकून दिला. त्यामुळे विमा कंपनीने शंभर टक्के भरपाई देणे गरजेचे आहे.

- बळी सुरवसे, मोर्डा

280821\img-20210814-wa0112.jpg

काक्रंबा परिसरातील जळून जात असलेली सोयाबीनची पिके