शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत २४५ कुटुंबाना आधार

By admin | Updated: November 10, 2014 01:17 IST

उस्मानाबाद : शेती व्यवसाय करताना नैसर्गिक आपत्तीमध्ये एखाद्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यास शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची तर हात

उस्मानाबाद : शेती व्यवसाय करताना नैसर्गिक आपत्तीमध्ये एखाद्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यास शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची तर हात, पाय निकामी झाल्यास पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात येते. मागील तीन वर्षात जिल्ह्यात अशा साडेतीनशे घटना घडल्या असून यातून २४५ कुटुंबियांना मदत देण्यात आली तर ७१ जणांचे प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले आहेत. याशिवाय २७ प्रस्ताव कंपनीकडे प्रलंबित आल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.शेती करताना एखाद्या घरातील कर्त्या व्यक्तिच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवून त्यांना अनेक अडचणीचा सामना करण्याची भीती असते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबास अर्थिक मदत मिळावी म्हणून शासनाने शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेती व्यवसाय करताना वीज पडणे, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना कायमचे अपंगत्व येते अशा कुटुंबांना मदत देण्यात येते. मागील तीन वर्षात जिल्ह्यात अपघाताच्या ३५१ घटना घडल्या आहेत. सन २०११-१२ मध्ये १३० विविध घटना घडल्या आहेत. यात उस्मानाबाद तालुक्यातून ३४, तुळजापूर २०, उमरगा १४, लोहारा ०४, भूम १५, परंडा ०९, कळंब २३ तर वाशी तालुक्यातून ११ घटना घडल्या असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. १३० प्रस्ताव कृषी विभागाच्या वतीने विमा कंपनीकडे दाखल करण्यात आले होते. यातील १०४ प्रस्तावांना विमा कंपनीने मंजूर देऊन संबधितांना रक्कम वाटप केली तर २५ जणांचे प्रस्ताव अमान्य , एक प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबित आहे. २०१२-१३ मध्ये १५८ घटना घडल्या होत्या. यातील १०३ प्रस्ताव मंजूर तर ३८ नामंजूर तर ९ दावे कंपनीकडे प्रलंबित आहेत. यातील पाच दावे बंद करण्यात आले असून, ग्राहक मंचात तीन प्रकरणे दाखल आहेत. २०१३-१४ मध्ये शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत ६३ घटना घडल्या होत्या. यातील ३८ प्रस्तावांना मंजूर करून शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली तर आठ दावे नामंजूर करण्यात आले आहे तर १७ दावे विमा कंपनीकडे प्रलंबित असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. तीन वर्षात जिल्ह्यात साडेतीनशे घटना घडल्या असून यातून २४५ कुटुंबियांना मदत देण्यात आली तर ७१ जणांचे प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले तर २७ प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत. तसेच प्रस्ताव निकाली काढण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने कागदपत्रांची पुर्तता केल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)