शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत २४५ कुटुंबाना आधार

By admin | Updated: November 10, 2014 01:17 IST

उस्मानाबाद : शेती व्यवसाय करताना नैसर्गिक आपत्तीमध्ये एखाद्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यास शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची तर हात

उस्मानाबाद : शेती व्यवसाय करताना नैसर्गिक आपत्तीमध्ये एखाद्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यास शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची तर हात, पाय निकामी झाल्यास पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात येते. मागील तीन वर्षात जिल्ह्यात अशा साडेतीनशे घटना घडल्या असून यातून २४५ कुटुंबियांना मदत देण्यात आली तर ७१ जणांचे प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले आहेत. याशिवाय २७ प्रस्ताव कंपनीकडे प्रलंबित आल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.शेती करताना एखाद्या घरातील कर्त्या व्यक्तिच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवून त्यांना अनेक अडचणीचा सामना करण्याची भीती असते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबास अर्थिक मदत मिळावी म्हणून शासनाने शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेती व्यवसाय करताना वीज पडणे, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना कायमचे अपंगत्व येते अशा कुटुंबांना मदत देण्यात येते. मागील तीन वर्षात जिल्ह्यात अपघाताच्या ३५१ घटना घडल्या आहेत. सन २०११-१२ मध्ये १३० विविध घटना घडल्या आहेत. यात उस्मानाबाद तालुक्यातून ३४, तुळजापूर २०, उमरगा १४, लोहारा ०४, भूम १५, परंडा ०९, कळंब २३ तर वाशी तालुक्यातून ११ घटना घडल्या असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. १३० प्रस्ताव कृषी विभागाच्या वतीने विमा कंपनीकडे दाखल करण्यात आले होते. यातील १०४ प्रस्तावांना विमा कंपनीने मंजूर देऊन संबधितांना रक्कम वाटप केली तर २५ जणांचे प्रस्ताव अमान्य , एक प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबित आहे. २०१२-१३ मध्ये १५८ घटना घडल्या होत्या. यातील १०३ प्रस्ताव मंजूर तर ३८ नामंजूर तर ९ दावे कंपनीकडे प्रलंबित आहेत. यातील पाच दावे बंद करण्यात आले असून, ग्राहक मंचात तीन प्रकरणे दाखल आहेत. २०१३-१४ मध्ये शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत ६३ घटना घडल्या होत्या. यातील ३८ प्रस्तावांना मंजूर करून शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली तर आठ दावे नामंजूर करण्यात आले आहे तर १७ दावे विमा कंपनीकडे प्रलंबित असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. तीन वर्षात जिल्ह्यात साडेतीनशे घटना घडल्या असून यातून २४५ कुटुंबियांना मदत देण्यात आली तर ७१ जणांचे प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले तर २७ प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत. तसेच प्रस्ताव निकाली काढण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने कागदपत्रांची पुर्तता केल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)