शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

शेतकरी हवालदिल, झेंडूची फुले बांधावर टाकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:53 IST

तामलवाडी - संपूर्ण देशभरात काेराेनाने थैमान घातले आहे. त्यामुळे लग्नसमारंभांना ब्रेक लागला आहे. धार्मिक स्थळेही कुलूपबंद आहेत. त्यामुळे फुलांना ...

तामलवाडी - संपूर्ण देशभरात काेराेनाने थैमान घातले आहे. त्यामुळे लग्नसमारंभांना ब्रेक लागला आहे. धार्मिक स्थळेही कुलूपबंद आहेत. त्यामुळे फुलांना मागणीच नाही. परिणामी वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या तामलवाडी येथील शेतकऱ्यांनी २२ हजार झाडांची फुले बांधावर ओतली.

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शेतकरी इंद्रजित घोटकर यांनी आपल्या शेतात झेंडूच्या फुलांची लागवड केली हाेती. फुलांच्या झाडांची वाढ चांगली व्हावी, यासाठी ‘ठिबक’च्या माध्यमातून पाणी देण्यात आले. त्यामुळे फूलशेती अक्षरश: बहरली आहे. यंदा या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी घाेटकर यांना हाेती. असे असतानाच काेराेनाची दुसरी लाट आली. पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्याची लाट अत्यंत तीव्र स्वरूपाची आहे. दिवसागणिक आठशे ते नऊशे रुग्ण आढळून येत आहेत. राज्याच्या अन्य भागांतही यापेक्षा वेगळे चित्र नाही. हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी लाॅकडाऊन केले. परिणामी सर्व बाजारपेठा बंद आहेत. साेबतच लग्नसाेहळे, धार्मिक स्थळेही बंदच आहेत. त्यामुळे बाजारपेठेत फुलांना उठाव नाही. परिणामी दर प्रचंड घसरल्याने उत्पादन खर्च साेडा, वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी घाेटकर यांनी सुमारे बारा हजार झाडांची फुले बांधावर टाकून दिली. या माध्यमातून लाखाेंचे नुकसान झाल्याने शेतकरी घाेटकर यांचे अर्थकारण काेलमडून पडले आहे. अशीच अवस्था परिसरातील अन्य शेतकऱ्यांचीही झाली आहे.

चाैकट...

अर्थकारण काेलमडले...

शेतकरी घाेटकर यांनी अर्धा एकर क्षेत्रावर झेंडू, शेवंती आदी फुलांच्या झाडांची लागवड केली हाेती. या झाडांची वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी, यासाठी ठिबक सिंचनचा वापर करण्यात आला. शेती मशागतीपासून ते फुले ताेडणीला येईपर्यंत लाखाेंचा खर्च झाला आहे. लाॅकडाऊन नसते तर या माध्यमातून दुप्पट उत्पन्न हाती पडले असते. परंतु, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने हे सर्वच गणित बिघडविले. विक्री हाेत असलेल्या फुलांच्या पैशातून वाहतूक खर्चही निघत नसल्याची खंत शेतकरी घाेटकर यांनी व्यक्त केली. अशा प्रकारामुळेच सुमारे २२ हजार झाडांची फुले बांधावर टाकली.