शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या वादात शेतरस्ता अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:33 IST

मुरुम : उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील छटीकव्वा ते जुना अचलेर या रस्त्यावर अगोदरच काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असून त्यातच ...

मुरुम : उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील छटीकव्वा ते जुना अचलेर या रस्त्यावर अगोदरच काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असून त्यातच आता सरपंच व काही शेतकऱ्यांनी मुरमाचे ढिगारे टाकून हा रस्ता गेल्या सहा दिवसांपासून अचानक बंद केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

केसरजवळगा येथील छटीकव्वा ते जुना अचलेर या रस्त्याचा प्रश्न सध्या भूमिअभिलेक व तहसील कार्यालयात प्रलंबित आहे. मोजणी करुनच शेतरस्ता करावा, अशी काही शेतकऱ्यांची मागणी आहे. मोजणीचे पैसे कोण भरणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनानेच यावर तोडगा काढून शेतरस्त्याचा प्रलंबित प्रश्न सोडवावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सदर रस्ता पिंढ्यान्‌पिढ्या असून, उत्तरेकडील शेतकऱ्यांनी पावसाचे पाणी ओढ्याला जाण्यासाठी चर मारुन पंधरा फुटी रस्ता सोडला आहे. उत्तरेकडील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी यात गेल्या आहेत. याच रस्त्यावरुन दक्षिणेकडील शेतकरीही ये-जा करतात. ओढ्याजवळील शेतकऱ्यांनी या रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे. ओढ्याच्या पलिकडे आलूर शिवारातील शेतकऱ्यांची शेती असून, तेथील काही शेतकऱ्यांनीही शेतरस्त्यावर अतिक्रमण केले आहे. गेल्या अनेक वर्षापासूनच रस्ता खुला करुन शेतरस्ता करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जात आहे. मागील वर्षी या शेतरस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता. मातीकामही सुरु झाले होते. मात्र, दोन्ही शेतकऱ्यांच्या सहमतीसाठी हे काम रखडले. मोजणीकरुनच शेतरस्ता पूर्ण करावा, अशी उत्तरेकडील शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी सुरुवातीला अतिक्रमण काढाणे आवश्यक आहे. तर दक्षिणेकडील शेतकऱ्यांची आहे त्या रस्त्यावरच शेतरस्ता करण्याची मागणी आहे. याच वादात हे काम रखडले आहे.

प्रतिक्रिया........

छटीकव्वा ते जुना अचलेर रस्ता या रस्त्यावरील अतिक्रमण काढूनच आलूरच्या सीमेपर्यंत शेतरस्ता पूर्ण करणे गरजेचे आहे........ सरपंच बलभीम पटवारी यांनी शासनाची परवानगी नसतानाही अतिक्रमण न काढताच आहे त्या रस्त्यावर मुरमाचे ढिगारे टाकून रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. वास्तविक भूमिअभिलेख व तहसील कार्यालयात रस्त्याचा हा प्रश्न प्रलंबित आहे.

- अय्युब इनामदार, शेतकरी, उत्तर बाजू

डिसेंबर २०२० मध्ये उमरगा तहसीलदारांकडे रस्ता खुला करुन शेतरस्ता करावा अशी मागणी केली आहे........ मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करून भूमिअभिलेख कार्यालकडे मोजणीसाठी तहसीलदारांना पत्र पाठवल्याचे कळविले. परंतु, याचा निकाल येण्यापूर्वीच शेतरस्त्याचे काम सुरु करुन वाद निर्माण झाल्याने सध्या शेतरस्त्याचे काम बंद झाले आहे.

- महादेव परिट, शेतकरी, दक्षीण बाजू

छटीकव्वा ते जुना अचलेर या पाणंद शेत रस्त्याचे काम व्हावे यासाठी शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून मागणी करीत होते. एका बाजुचे शेतकरी आहे त्या रस्त्यावर शेतरस्त्याची मागणी करीत असून, दुसऱ्या बाजुच्या शेतकऱ्यांनी मोजणीनंतर शेतरस्ता करावा, अशी मागणी आहे. हा वाद मिटविण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. परंतु, याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे सहा दिवसांपूर्वी गावातील काही ज्येष्ठ मंडळींसह शेतरस्त्याची पाहणी करुन दोन्ही बाजुच्या शेतकऱ्यांच्या सहमतीनंतर शेतकऱ्यांनीच शेतरस्त्यावर मुरम टाकला. हे काम नियमानुसारच केले जाईल.

- बलभीम पटवारी, सरपंच