शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
3
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
4
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
5
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
6
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
7
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
8
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
9
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
10
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
11
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
12
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
13
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
14
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
15
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
16
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
17
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
18
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
19
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
20
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!

बालेकिल्ल्यात वाढली काँग्रेसची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:22 IST

लोहारा : शहरातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष, पंचायत समितीचे दोन माजी ...

लोहारा : शहरातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष, पंचायत समितीचे दोन माजी सदस्य व ग्रामपंचायतच्या एका माजी सदस्यासह सहा जणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे बाल्लेकिल्यातच काँग्रेसच्या पडझडीत वाढ असल्याचे चित्र आहे.

लोहारा शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळाला. यामुळे गावस्तरावरील गटातटाचे राजकारण राजकीय पक्षावर आले. शहरात प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणुका झाल्या. यात शिवसेनेला यश मिळाले. यामुळे सेनेची सत्ता स्थापन होणार हे स्पष्ट असताना काँग्रेसने सेनेतील एक व अपक्ष नगरसेवकाच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या. मात्र, त्यात यश आले नाही. शेवटी सेनेने राष्ट्रवादीला सोबत घेत सत्ता स्थापन केली. अडीच वर्षांत बऱ्याच राजकीय हालचाली झाल्या. कालांतराने सेनेच्या नगरसेवकाचा एक गट काँग्रेसच्या सोबत आला आणि काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन करीत सेनेला सत्तेबाहेर ठेवले. या सत्ता स्थापनेनंतर वर्षातच अंतर्गत हेवेदावे वाढले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिले. त्यातच नगरपंचायतमध्ये काँग्रेस अडीच वर्षे सत्तेत असताना पक्षाच्या नगरसेवकांची कामे होत नसल्याचा आरोप काँग्रेसच्याच काही नगरसेवकांतून करण्यात येत होता. शहरात पक्षाचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात असताना गट-तट होते आणि आजही आहेत.

दरम्यान, शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागाण्णा वकील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यापाठोपाठ युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश माळी, पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक रोडगे, हिप्परगा (रवा) गटातील पं. स. चे माजी सदस्य इंद्रजित लोमटे व लोहारा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्रीशैल स्वामी, राजेंद्र माळी, अमोल माळी या सहा जणांनी घरगुती कारण पुढे करीत आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडे दिले. यामुळे काँग्रेसच्या बाल्लेकिल्यातच काँग्रेसची पडझड वाढल्याचे दिसत आहे. आता राजीनामा दिलेले हे सहा जण कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.