शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
2
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
3
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
4
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
5
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
6
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
7
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
8
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
9
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
10
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
11
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
13
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
14
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
15
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
16
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
17
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
18
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
20
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...

कोरोना संकटात प्रत्येकाचे कार्य महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : मागील काही महिन्यांपासून आपण सर्वजण कोरोना संकटाशी सामना करत आहोत. या काळात प्रत्येकाने खारीचा वाटा उचलत काही ...

उस्मानाबाद : मागील काही महिन्यांपासून आपण सर्वजण कोरोना संकटाशी सामना करत आहोत. या काळात प्रत्येकाने खारीचा वाटा उचलत काही कार्य सुरू केले असून, याचा प्रशासनाला नक्की फायदा होईल, असा विश्वास अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांनी व्यक्त केला.

उस्मानाबाद येथील भारत विद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह ॲड. श्रीकृष्ण मसलेकर, डॉ. सागर पाटील, डॉ. आकाश पाठक, डॉ. सय्यद परवीन, तसेच केंद्रात सेवा देणारे डॉक्टर्स उपस्थित होते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपल्या जिल्ह्यात अपुऱ्या आरोग्य सुविधा असताना ही केवळ सर्वांच्या सहकार्यामुळे आपण त्यावर मात करू शकलो. आता दुसऱ्याला लाट वेळी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून उचललेल्या खारीच्या वाट्यामुळे सुविधांमध्ये वाढ झाली आहे. ज्या नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असताना घरात राहणे शक्य नाही त्यांच्यासाठी हा विलगीकरण कक्ष उपयुक्त ठरणार असून, जनकल्याण समितीने सुरू केलेल्या बालसंगोपन कक्षाचे ही काम महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी विद्या भारतीचे क्षेत्रीय पदाधिकारी शेषाद्री डांगे, ॲड. महेंद्र देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ. अभय शहापूरकर, भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक गायकवाड, आयुर्वेद व्यासपीठाचे वैद्य प्रशांत कोथळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. अजित नायगावकर, अमोल सूर्यवंशी, तेरणा इंजिनिअरिंगचे प्राचार्य माने आदी उपस्थित होते. आभार ॲड. सचिन सूर्यवंशी यांनी मानले.