शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने बेफिकिरी साेडण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:26 IST

लोहारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता प्रत्येक व्यक्तीने कंबर कसली पाहिजे. तन-मन-धनाने आपले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी खंबीरपणे लढले ...

लोहारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता प्रत्येक व्यक्तीने कंबर कसली पाहिजे. तन-मन-धनाने आपले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी खंबीरपणे लढले पाहिजे. बेफिकीरपणा आणि बिनधास्तपणाला मुरड घातल्यास कोरोनावर नकीच मात करता येईल, असे प्रतिपादन स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले आहे.

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून नागरिकांत याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी ग्रामपंचायत, स्पर्श ग्रामीण रुग्णालय व निवासी अपंग शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.सदस्या शीतल पाटील व राहुल पाटील यांच्या पुढाकाराने कोरोना जनजागृती रूट मार्च काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कठारे, जि.प.सदस्या शीतल पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, सरपंच यशवंत कासार, ग्रामसेवक डी. आय. गोरे, निवासी अपंग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे, केंद्र प्रमुख एम. जी. वाघमोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक मस्के आदी उपस्थित होते.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी गावात चालू असलेल्या माझे गाव माझे कुटुंब अभियानांतर्गत सर्वेक्षणाचा आढावा घेऊन सर्व पर्यवेक्षकांनी वेळोवेळी रुग्णांची तपासणी करावी व लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ताबडतोब दवाखान्यात तपासणीसाठी पाठवावे. त्याचबरोबर त्यांनी सर्वांशी संवाद साधून लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व जे नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाही करावी, असे सांगितले.

अफवांना बळी न पडता सर्व कामे बाजूला ठेऊन सर्वांनी आधी कोरोना लस घ्यावी, असे आवाहन जि.प.सदस्य शीतल पाटील यांनी केली.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कठारे यांनी आपल्या गावात कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची काळजी घेऊन गाव कोरोना मुक्त समित्या बळकट कराव्यात तसेच लस घेतल्यानंतर तीन महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण होऊ शकतो. हा संभाव्य धोका ओळखून रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, असे अवाहन केले. गावातील प्रमुख रस्त्यावर रूट मार्च काढण्यात आला.