शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

एमपीएससी परीक्षा देण्यालाही आता ६-९ संधींचे बंधन, विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्याच्या संधींची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, आयोगाने प्रत्येकाला समान संधी द्यावी, ...

उस्मानाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्याच्या संधींची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, आयोगाने प्रत्येकाला समान संधी द्यावी, असे मत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलून दाखविली.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएसीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना संधीचे बंधन घालून देण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६ वेळेस परीक्षा देता येणार असून, इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ९ वेळेस ही परीक्षा देता येणार आहे. अनुसूचित जाती-जमातींमधील उमेदवारांना कमाल मर्यादेचा नियम लागू नाही. उस्मानाबाद जिल्ह्यात या निर्णयाचे अनेक विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे, तर काही विद्यार्थ्यांनी निर्णय योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांसंदर्भात जाहीर केलेल्या वेळापत्रकाचेच काटेकोर पालन करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

अशाप्रकारे होईल संधींची गणना

एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

समान संधी गरजेची

परीक्षा देण्यासाठी बंधने नसल्याने अनेक विद्यार्थी परिपूर्ण तयारी न करताही परीक्षा देत होते. आता संधी निश्चित केल्या आहेत. हा निर्णय योग्य आहे. मात्र, प्रवर्गनिहाय संधी निश्चित करणे योग्य नाही. प्रत्येकाला समान संधी देणे गरजेचे आहे.

दीपाली शिंत्रे, स्पर्धा परीक्षा उमेदवार

समानता डावलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यूपीएसीच्या धर्तीवर घेतलेला निर्णय योग्य आहे; परंतु सर्वांना समान संधी असणे गरजेचे आहे. राज्यघटनेप्रमाणे संधीची समानता येथे डावलण्यात आली आहे. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार अभ्यास करीत असतो. त्यामुळे प्रत्येकाला समान संधी हवी.

मारुती माने, स्पर्धा परीक्षा उमेदवार

निर्णयाचे स्वागत

यूपीएससी परीक्षेच्या धर्तीवर हा निर्णय घेतला आहे. वाढती स्पर्धा पाहता अशी बंधने असणे आवश्यक आहेत. शासनाने दरवर्षी परीक्षा घेणे गरजेचे आहे. राज्यघटनेनुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या वाढीव संधी देखील योग्य आहेत. या निर्णयाचे स्वागतच आहे.

अक्षय पाचपिंडे, स्पर्धा परीक्षा उमेदवार

विद्यार्थ्यांचे नुकसान होणार

संधीमुळे पार्टटाइम जाॅब करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यांना मोजक्याच संधींत तयारी करावी लागेल, आधी त्यांना भरपूर संधी असल्यामुळे त्यांच्यावर दबाव राहत नव्हता. आता संधी कमी होणार असल्याने दबाव वाढेल.

विशाल राऊत, स्पर्धा परीक्षा उमेदवार