शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामातही बँकांचा हात आखडताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:57 IST

उस्मानाबाद : शेतकऱ्यांना शेतकामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्ह्यातील सरकारी, खासगी बँकांना रब्बी हंगामात ६८१ कोटी ...

उस्मानाबाद : शेतकऱ्यांना शेतकामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्ह्यातील सरकारी, खासगी बँकांना रब्बी हंगामात ६८१ कोटी ६८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील २७ हजार १९५ शेतकऱ्यांना २५९ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

जिल्ह्यात दोन वर्षाआड पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असतो. यंदा मान्सूनमध्ये चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपात शंभर टक्के क्षेत्रावर पेरा केला. मात्र, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात बहुतांश भागात अतिवृष्टी झाल्याने काढणीस आलेली पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावरच होती. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्ह्यातील सरकारी, खासगी बँकांना रब्बी हंगामात ६८१ कोटी ६८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट घालून दिले होते. २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, जिल्हा मध्यवर्ती बँक, खासगी बँकांकडून २७ हजार शेतकऱ्यांना २५९ कोटी ११ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी ४० टक्के इतकी आहे.

चौकट..

आयडीबीआय बँक आघाडीवर

रब्बी हंगामात कर्जवाटपात स्टेट बँक ऑफ इंडिया आघाडीवर आहे. या बँकेस १७३ कोटी दहा लाखांचे उद्दिष्ट होते. या बँकेने १३ हजार १४२ शेतकऱ्यांना १३९ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी ८१ टक्के आहे. त्याखालोखाल आयडीबीआय बँक आघाडीवर असून, या बँकेस १७ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ६७९ शेतकऱ्यांना १२ कोटी ४५ लाखांचे कर्जवाटप केले असून, कर्जवाटपाची टक्केवारी ७० इतकी आहे.

खरिपापेक्षा रब्बीत संथगती

खरीप हंगामात जिल्ह्यातील सरकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच खासगी बँकांना १५९० कोटी ५५ लाख रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले होते. खरिपात एक लाख २५ हजार ८४९ शेतकऱ्यांना ९१४ कोटी २० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. याची टक्केवारी ५७ इतकी आहे, तर रब्बी हंगामात ६८१ कोटी ६८ लाखांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र फेब्रुवारीअखेरपर्यंत बँकांनी २७ हजार १९५ शेतकऱ्यांना २५९ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. याची टक्केवारी ४० एवढी आहे. खरिपापेक्षा रब्बी हंगामात कर्जवाटप संथगतीनेच होत असल्याचे आकडेवारी दिसून येते.