शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामातही बँकांचा हात आखडताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:57 IST

उस्मानाबाद : शेतकऱ्यांना शेतकामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्ह्यातील सरकारी, खासगी बँकांना रब्बी हंगामात ६८१ कोटी ...

उस्मानाबाद : शेतकऱ्यांना शेतकामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्ह्यातील सरकारी, खासगी बँकांना रब्बी हंगामात ६८१ कोटी ६८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील २७ हजार १९५ शेतकऱ्यांना २५९ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

जिल्ह्यात दोन वर्षाआड पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असतो. यंदा मान्सूनमध्ये चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपात शंभर टक्के क्षेत्रावर पेरा केला. मात्र, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात बहुतांश भागात अतिवृष्टी झाल्याने काढणीस आलेली पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावरच होती. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्ह्यातील सरकारी, खासगी बँकांना रब्बी हंगामात ६८१ कोटी ६८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट घालून दिले होते. २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, जिल्हा मध्यवर्ती बँक, खासगी बँकांकडून २७ हजार शेतकऱ्यांना २५९ कोटी ११ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी ४० टक्के इतकी आहे.

चौकट..

आयडीबीआय बँक आघाडीवर

रब्बी हंगामात कर्जवाटपात स्टेट बँक ऑफ इंडिया आघाडीवर आहे. या बँकेस १७३ कोटी दहा लाखांचे उद्दिष्ट होते. या बँकेने १३ हजार १४२ शेतकऱ्यांना १३९ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी ८१ टक्के आहे. त्याखालोखाल आयडीबीआय बँक आघाडीवर असून, या बँकेस १७ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ६७९ शेतकऱ्यांना १२ कोटी ४५ लाखांचे कर्जवाटप केले असून, कर्जवाटपाची टक्केवारी ७० इतकी आहे.

खरिपापेक्षा रब्बीत संथगती

खरीप हंगामात जिल्ह्यातील सरकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच खासगी बँकांना १५९० कोटी ५५ लाख रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले होते. खरिपात एक लाख २५ हजार ८४९ शेतकऱ्यांना ९१४ कोटी २० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. याची टक्केवारी ५७ इतकी आहे, तर रब्बी हंगामात ६८१ कोटी ६८ लाखांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र फेब्रुवारीअखेरपर्यंत बँकांनी २७ हजार १९५ शेतकऱ्यांना २५९ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. याची टक्केवारी ४० एवढी आहे. खरिपापेक्षा रब्बी हंगामात कर्जवाटप संथगतीनेच होत असल्याचे आकडेवारी दिसून येते.