शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

रब्बी हंगामातही बँकांचा हात आखडताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:57 IST

उस्मानाबाद : शेतकऱ्यांना शेतकामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्ह्यातील सरकारी, खासगी बँकांना रब्बी हंगामात ६८१ कोटी ...

उस्मानाबाद : शेतकऱ्यांना शेतकामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्ह्यातील सरकारी, खासगी बँकांना रब्बी हंगामात ६८१ कोटी ६८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील २७ हजार १९५ शेतकऱ्यांना २५९ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

जिल्ह्यात दोन वर्षाआड पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असतो. यंदा मान्सूनमध्ये चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपात शंभर टक्के क्षेत्रावर पेरा केला. मात्र, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात बहुतांश भागात अतिवृष्टी झाल्याने काढणीस आलेली पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावरच होती. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्ह्यातील सरकारी, खासगी बँकांना रब्बी हंगामात ६८१ कोटी ६८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट घालून दिले होते. २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, जिल्हा मध्यवर्ती बँक, खासगी बँकांकडून २७ हजार शेतकऱ्यांना २५९ कोटी ११ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी ४० टक्के इतकी आहे.

चौकट..

आयडीबीआय बँक आघाडीवर

रब्बी हंगामात कर्जवाटपात स्टेट बँक ऑफ इंडिया आघाडीवर आहे. या बँकेस १७३ कोटी दहा लाखांचे उद्दिष्ट होते. या बँकेने १३ हजार १४२ शेतकऱ्यांना १३९ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी ८१ टक्के आहे. त्याखालोखाल आयडीबीआय बँक आघाडीवर असून, या बँकेस १७ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ६७९ शेतकऱ्यांना १२ कोटी ४५ लाखांचे कर्जवाटप केले असून, कर्जवाटपाची टक्केवारी ७० इतकी आहे.

खरिपापेक्षा रब्बीत संथगती

खरीप हंगामात जिल्ह्यातील सरकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच खासगी बँकांना १५९० कोटी ५५ लाख रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले होते. खरिपात एक लाख २५ हजार ८४९ शेतकऱ्यांना ९१४ कोटी २० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. याची टक्केवारी ५७ इतकी आहे, तर रब्बी हंगामात ६८१ कोटी ६८ लाखांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र फेब्रुवारीअखेरपर्यंत बँकांनी २७ हजार १९५ शेतकऱ्यांना २५९ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. याची टक्केवारी ४० एवढी आहे. खरिपापेक्षा रब्बी हंगामात कर्जवाटप संथगतीनेच होत असल्याचे आकडेवारी दिसून येते.