शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

चार गावच्या पाणीपुरवठा याेजनेची वीज ताेडली, पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST

तेर -उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी, तडवळे व येडशी या चार गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तेरणा मध्यम प्रकल्पातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ...

तेर -उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी, तडवळे व येडशी या चार गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तेरणा मध्यम प्रकल्पातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साहाय्याने पाणीपुरवठा याेजना राबविण्यात आली आहे. कधी धरणात पाणी नसल्याने तर कधी तांत्रिक अडचणींमुळे ही याेजना बंद राहते. मात्र, यावेळी धरणात मुबलक असले तरी सुमारे १ काेटी ९६ लाख रूपये वीजबिल थकित असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

तेरणा मध्यम प्रकल्पातून चार गाव पाणीपुरवठा योजना २००९ राेजी कार्यान्वित करण्यात आली. सुरूवातीस काही वर्षे ही याेजना सुरळीत चालल्यानंतर संंबंधित चारही गावांतील नळधारकांनी थकित पाणीपट्टी व वीजबिल न भरल्याने २०१५ मध्ये पाणीपुरवठा बंद करण्यात आला हाेता. ही पाणीपुरवठा याेजना पुन्हा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पाणीपुरवठा पुनर्जीवन याेजनेच्या माध्यमातून सुमारे ३ काेटी ६३ लाख रूपये तरतूद २०१९ मध्ये केली. यानंतर ही याेजना कार्यान्वित झाली. दाेन-अडीच वर्ष सुरळीत पाणीपुरवठा झाल्यानंतर महावितरणची थकबाकी सुमारे १ काेटी ९६ लाखांवर जाऊन ठेपली आहे. ही थकबाकी न भरल्याने महावितरणने १७ जून राेजी वीजपुरवठा खंडित केला आहे. मागील दीड महिन्यापासून या याेजनेद्वारे पाणीपुरवठा बंद आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी रानाेमाळ भटकंती करावी लागत आहे.

चाैकट...

काेट्यवधींची थकबाकी...

चारगाव पाणीपुरवठा याेजनेच्या वीजबिलापाेटी एप्रिल २०२१ अखेर सुमारे १ काेटी ९६ लाख ६४ हजार ६३५ रूपये थकित आहेत. एवढेच नाही तर पाणीपट्टीचे ही सुमारे ९६ लाख ८७ हजार रूपये थकले आहेत. यात तेर गावातील नळ जाेडणी धारकांकडे ३८ लाख ७८ हजार, ढाेकी ३७ लाख ६१ हजार, तडवळा ग्रामस्थांकडे २० लाख ४७ हजार रूपये थकित आहेत.

साेलार प्रकल्पासाठी पुढाकार कधी?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारगाव पाणीपुरवठा याेजना काेणत्या कारणामुळे अडचणीत आली, याची माहिती मागितली हाेती. या माहितीच्या आधारे थकित वीजबिलांचे कारण समाेर आले हाेते. त्यामुळे त्यांनी साेलार प्रकल्पास मंजुरी दिली हाेती. या प्रकल्पाचा आराखडाही तयार झाला हाेता. परंतु, अद्याप टेंडर निघाले नाही. त्यामुळे नेतेमंडळी याबाबतीत पुढाकार घेणार तरी कधी? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

स्थायीच्या बैठकीतही चर्चा....

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही या पाणीपुरवठा याेजनेंतर्गत चर्चा झाली. ही याेजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करून घेण्याच्या अनुषंगाने अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी मुद्दा मांडला. त्यानुसार सखाेल चर्चा हाेऊन जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसाेबत बैठक घेण्याचे ठरले. त्यामुळे या बैठकीनंतर आता हस्तांतरणाचा विषय मार्गी लागू शकताे.