शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चार गावच्या पाणीपुरवठा याेजनेची वीज ताेडली, पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST

तेर -उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी, तडवळे व येडशी या चार गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तेरणा मध्यम प्रकल्पातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ...

तेर -उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी, तडवळे व येडशी या चार गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तेरणा मध्यम प्रकल्पातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साहाय्याने पाणीपुरवठा याेजना राबविण्यात आली आहे. कधी धरणात पाणी नसल्याने तर कधी तांत्रिक अडचणींमुळे ही याेजना बंद राहते. मात्र, यावेळी धरणात मुबलक असले तरी सुमारे १ काेटी ९६ लाख रूपये वीजबिल थकित असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

तेरणा मध्यम प्रकल्पातून चार गाव पाणीपुरवठा योजना २००९ राेजी कार्यान्वित करण्यात आली. सुरूवातीस काही वर्षे ही याेजना सुरळीत चालल्यानंतर संंबंधित चारही गावांतील नळधारकांनी थकित पाणीपट्टी व वीजबिल न भरल्याने २०१५ मध्ये पाणीपुरवठा बंद करण्यात आला हाेता. ही पाणीपुरवठा याेजना पुन्हा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पाणीपुरवठा पुनर्जीवन याेजनेच्या माध्यमातून सुमारे ३ काेटी ६३ लाख रूपये तरतूद २०१९ मध्ये केली. यानंतर ही याेजना कार्यान्वित झाली. दाेन-अडीच वर्ष सुरळीत पाणीपुरवठा झाल्यानंतर महावितरणची थकबाकी सुमारे १ काेटी ९६ लाखांवर जाऊन ठेपली आहे. ही थकबाकी न भरल्याने महावितरणने १७ जून राेजी वीजपुरवठा खंडित केला आहे. मागील दीड महिन्यापासून या याेजनेद्वारे पाणीपुरवठा बंद आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी रानाेमाळ भटकंती करावी लागत आहे.

चाैकट...

काेट्यवधींची थकबाकी...

चारगाव पाणीपुरवठा याेजनेच्या वीजबिलापाेटी एप्रिल २०२१ अखेर सुमारे १ काेटी ९६ लाख ६४ हजार ६३५ रूपये थकित आहेत. एवढेच नाही तर पाणीपट्टीचे ही सुमारे ९६ लाख ८७ हजार रूपये थकले आहेत. यात तेर गावातील नळ जाेडणी धारकांकडे ३८ लाख ७८ हजार, ढाेकी ३७ लाख ६१ हजार, तडवळा ग्रामस्थांकडे २० लाख ४७ हजार रूपये थकित आहेत.

साेलार प्रकल्पासाठी पुढाकार कधी?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारगाव पाणीपुरवठा याेजना काेणत्या कारणामुळे अडचणीत आली, याची माहिती मागितली हाेती. या माहितीच्या आधारे थकित वीजबिलांचे कारण समाेर आले हाेते. त्यामुळे त्यांनी साेलार प्रकल्पास मंजुरी दिली हाेती. या प्रकल्पाचा आराखडाही तयार झाला हाेता. परंतु, अद्याप टेंडर निघाले नाही. त्यामुळे नेतेमंडळी याबाबतीत पुढाकार घेणार तरी कधी? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

स्थायीच्या बैठकीतही चर्चा....

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही या पाणीपुरवठा याेजनेंतर्गत चर्चा झाली. ही याेजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करून घेण्याच्या अनुषंगाने अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी मुद्दा मांडला. त्यानुसार सखाेल चर्चा हाेऊन जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसाेबत बैठक घेण्याचे ठरले. त्यामुळे या बैठकीनंतर आता हस्तांतरणाचा विषय मार्गी लागू शकताे.