शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

नऊपैकी आठ बंधारे दरवाजाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:29 IST

बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर शेत शिवारातील मुख्य ओढ्यावर नऊ कोल्हापुरी बंधारे तर आठ सिमेंट बंधारे आहेत. ओढ्यावर ...

बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर शेत शिवारातील मुख्य ओढ्यावर नऊ कोल्हापुरी बंधारे तर आठ सिमेंट बंधारे आहेत. ओढ्यावर नाला सरळीकरण, खोलीकरण देखील झाले. परंतु, सद्य:स्थितीत नऊपैकी आठ कोल्हापुरी बंधारे दरवाजेविना असून, तर तीन-चार सिमेंट बंधाऱ्यांचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सलग मागील दोन वर्ष चांगला पाऊस होऊनही पावसाचे पाणी आले तसे वाहून गेले. त्यामुळे आता ऊस कसा जगवायचा, असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांसमोर आहे.

दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजने अंतर्गत तसेच रोटरी क्लब व भारतीय जैन संघटना यांच्या मार्फत बलसूर येथील या ओढ्यावर नाला सरळीकरण व खोलीकरण करण्यात आले आहे. यामध्ये पाणी थांबल्यास परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींना तसेच कुपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होऊन अडीचशे ते तीनशे हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन शेतशिवारातील पाण्याचे स्त्रोत बारमाही सुरू राहणार आहे. परंतु, मागील तीन-चार वर्षात एखादाही दमदार पाऊस झाला नव्हता. पावसाळ्यात केवळ रिमझिम, पिकांना मुबलक असा पाऊस पडत गेल्याने जमिनीतील पाणीपातळी खालावली होती. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले होते. परिणामी शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. शिवाय, पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करावी लागत होती. दरम्यान, सलग मागील दोन वर्ष परतीच्या झालेल्या दमदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी जमिनीतील पाणीपातळीत वाढ झाली. तसेच पिण्याच्या पाण्याचा ही प्रश्न सुटला. यामुळे आपली शेती बारमाही ओलिताखाली राहील, या अपेक्षेने परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. परंतु, बलसूर शिवारातील नऊपैकी आठ कोल्हापुरी बंधाऱ्यांना दारेच बसविण्यात आली नसून, यातील अनेक दारे गायबदेखील झाली आहेत. शिवाय, ओढ्यावर आठ सिमेंट बांधापैकी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन-चार सिमेंट बांधाच्या बाजूची माती वाहून गेली असल्याने सर्व पाणी वाहून गेले. परिणामी परिसरातील सिंचन विहिरी, कूपनलिका यांची पाणी पातळी घटली असून, मृगापर्यंत ऊस कसा जगवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

दारे असती तर आज येथे पाणी थांबून परिसरातील २५० ते ३०० हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला असता. परंतु, शासनाकडून पाणी अडवण्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही केवळ दारे बसविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने मोठा पाऊस होऊनही ही पाणी न थांबता वाहून गेले. त्यामुळे बंधाऱ्यावर झालेला खर्च पाण्यात गेल्याच्या प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.

कोट......

येथील कोल्हापुरी बंधाऱ्याला सात ते आठ वर्षांपासून दारे नाहीत. त्यामुळे पाणी थांबत नाही. शेतकऱ्यांकडून पाठपुरावा करूनही याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही. त्यामुळे हे बंधारे केवळ शोभेची वस्तू बनून राहिले आहेत.

- ज्ञानेश्वर नागराळे, शेतकरी, बलसूर

ओढा खोलीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पाणी थांबल्यास परिसरातील सिंचन विहिरी, कूपनलिका यांचे पाणी कायम टिकून राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, अतिवृष्टीने सिमेंट बांध फुटले तर कोल्हापुरी बंधाऱ्यांना दारेच नसल्याने पाणी थांबले नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत परिसरातील पाणी पातळी खालावली आहे.

- गंगाराम चिवरे, शेतकरी, बलसूर

प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी सिमेंट बंधाऱ्याची दुरुस्ती व कोल्हापुरी बंधाऱ्याची दारे बसवावीत. तसे झाले तरच भविष्यात परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

- राम वाकडे, शेतकरी, बलसूर