शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
3
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
6
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
7
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
8
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
9
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
10
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
11
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
12
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
13
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
14
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
15
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
16
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
17
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
18
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
19
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
20
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!

शैक्षणिक वर्षे संपले तरी साडेआठ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : आर्थिक अडचणींमुळे दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, याकरिता शासनाच्यावतीने मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शैक्षणिक ...

उस्मानाबाद : आर्थिक अडचणींमुळे दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, याकरिता शासनाच्यावतीने मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शैक्षणिक वर्ष संपले तरी प्रशासकीय पातळीवर आर्थिक तरतूद न झाल्याने अद्यापही साडेआठ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत.

केंद्र व राज्यातील विविध अभ्यासक्रमांना शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती,भटक्या विमुक्त जमाती आणि एसबीसी विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती व मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क दिले जाते. सामाजिक न्याय विभागाकडून मिळणारी शिष्यवृत्ती यंदा शैक्षणिक वर्ष संपत आली, तरी मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मागील काही वर्षांपासून शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरच शिष्यवृत्ती मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी आवश्यक असताना, शिष्यवृत्ती मिळत नाही. त्याच दरम्यान यंदा परीक्षा संपल्या तरी, अद्याप साडेआठ हजार विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर असून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. मागील वर्षी राज्यातील बहुतांश महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण पार पडले.या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना नवीन संगणक लॅपटॉप व मोबाईल उधार उसनवारीवर खरेदी करावा लागला. तसेच इंटरनेट डाटा रिचार्जसाठी प्रत्येक महिन्याला पैसे खर्च झाले. या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क सुद्धा भरलेले आहे. मागील वर्षीच्या परीक्षा होऊन निकालाची प्रक्रिया पूर्ण होत आहे. तरी अजून या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. कित्येक विद्यार्थी समाजकल्याण विभाग कार्यालयात खेटे मारत आहेत. बजेट नसल्याने शासनाकडून शिष्यवृत्ती वर्ग हाेत नसल्याचे सांगण्यात येत आहे. अनुसूचित जाती, नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी ९ कोटी ११ लाख रुपये व एसबीसी व भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांसाठी ८ कोटी ५५ लाख रुपयांची आवश्यकता भासणार आहे.

पॉईंटर...

मागील वर्षात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातीत ४ हजार ४४५ विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाकडून मंजूर झाले होते. मार्च २०२१ पर्यंत ६५० जणांना पहिला हप्ता तर १ हजार ६७३ विद्यार्थ्यांना पहिला व दुसरा हप्ता असे एकूण २ कोटी ६७ लाख ६६ हजार १७३ रुपये वर्ग करण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ९ कोटी ११ लाख ८८ हजार रुपयांचा निधी आवश्यक आहे.

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात एसबीसी व भटक्या विमुक्त जमातीतील ७ हजार १०४ विद्यार्थ्यांचे अर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले होते. मार्च २०२१ पर्यंत ३ हजार ३६१ विद्यार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. या विद्यार्थ्यांच्या खात्यावर १ कोटी ९२ लाख ७३ हजार ५६७ रुपये वर्ग झाले. दुसरा हप्ता व उर्वरित विद्यार्थ्यांना ८ कोटी ५५ लाख २० हजार ९५७ रुपये निधीची आवश्यकता आहे.

कोट...

महाविद्यालयांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी करून ते वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आले आहेत. मार्च महिन्यापर्यंत अनुसूचित जाती, नवबौध्द घटकातील विद्यार्थी व एसबीसी, भटके विमुक्त जमातीच्या ५ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे रक्कम वर्ग झाली आहे. वरिष्ठ स्तरावरून विद्यार्थ्यांच्या खात्यावरच रक्कम जमा होत असते.

बी. जी. अरवत, सहायक समाजकल्याण आयुक्त