शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

खाद्य तेलाची दरवाढ सुरूच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:23 IST

लोहारा : रोजच्या जीवनातील खाद्य तेलाच्या भावात दिवाळीपासून सातत्याने वाढ हाेत चालली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट काेलमडताना पहावयास मिळत ...

लोहारा : रोजच्या जीवनातील खाद्य तेलाच्या भावात दिवाळीपासून सातत्याने वाढ हाेत चालली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट काेलमडताना पहावयास मिळत आहे. काेराेनामुळे अनेकांचे राेजगार गेले आहेत. असे लाेक सध्या आपापल्या गावी परतले आहेत. येथे मिळेल ते काम करून आपली उपजिवीका चालवित आहेत. असे असतानाच दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंसह अन्य साहित्यांचे दर वाढत चाल्याने आर्थिक अडचणींमध्ये भर पडू लागली आहे. एकीडके पेट्राेल तसेच डिझेलच्या दरात दिवसागणिक वाढ हाेत आहे. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ हाेत आहे. परिणामी जीवनावश्यक वस्तूंसाेबतच इतर साहित्याचे दर वाढू लागले आहेत.१ डिसेंबरपासून गॅस सिलींडरच्या दरात शंभर ते सव्वाशे रुपयांची वाढ झाली आहे. हीच संधी साधत उपवितरक प्रतिसिलींडर दिडशे ते दोनशे रुपये घेत आहेत. यामुळे ‘आपली चूलच बरी’, म्हणण्याची वेळ ग्रामीण भागातील महिलांवर आली आहे. गॅस सिलींडरसाेबतच खाद्य तेलाचे दरही सातत्याने वाएत आहेत. दिवाळी-दसर्यानंतर तरी दर कमी हाेतील, असे अपेक्षित हाेते. परंतु, तुर्तास तसे हाेताना दिसत नाही.

चाैकट...

दसरा दिवाळीपूर्वी सोयाबीनचे १ लिटर तेल ९५ रुपयांना मिळत होते. ते दिवाळीत ९८ रुपयांला झाले. दिवाळी झाल्यावर भाव कमी होतील अशी, अशा व्यापाऱ्यासह ग्राहकांना होती. परंतु, दिवसागणिक वाढ हाेत चालली आहे. सध्या तेलास प्रतिकिलाे ११५ ते १२० रुपये माेजावे लागत आहे. दिवाळीपूर्वी सूर्यफुलाच्या एक किलाे तेलासाठी ११० रुपये, दिवाळीमध्ये ११५ तर सध्या १३० ते १३५ रूपये लागत आहेत. पामतेलाचा दर ८५ वरून १०५ ते ११० रुपये, शेंगदाणा तेलासाठी आता ११० ऐवजी १३५ रूपये लागत आहेत.

सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या किमती कमी अधिक आहेत. परंतु, जवळपास सर्रास ग्राहकांची पामतेल व सोयाबीन तेलाची मागणी अधिक असते. दिवाळीपासून दररोजच भाववाढ होत असल्याने याचा परिणाम विक्रीवर झाला आहे. आजवर एवढी भाव वाढ कधीच झाली नव्हती.

-शिवा स्वामी, किराणा दुकानदार,लोहारा.

दिवाळीत खाद्यतेलाचे भाव वाढले हाेते. ही वाढ आजही कायमच आहे. याचा फटका सर्वसामानय ग्राहकांना माेठ्या प्रमाणात बसत आहे. काटकसर करून खर्च भागवावा लागत आहे.

-वर्षा चौधरी, गृहिणी, लाेहारा.

सरकारने खाद्य तेल आयात करावे

अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले. परिणामी, विविध खाद्यतेलाचे भाव वाढले. खाद्य तेलाचे भाव वाढल्याचा परिणाम इतर वस्तूंच्या भाववाढीवर होणार आहे. हॉटेल, उपाहारगृहातील विविध खाद्यपदार्थ पदार्थ बनविण्यासाठी तेल वापरण्यात येते. त्यामुळे या सर्वच वस्तूंचे भाव वाढण्याची शक्‍यता आहे. केंद्र सरकारने खाद्य तेल आयात केले तरच तेलाच्या भाववाढीला आळा बसू शकतो.

-सचिन सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते, लाेहारा