शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

तुळजापूरकडे जाणा-या भाविकांचा तलावात बुडून मृत्यू

By admin | Updated: October 15, 2016 20:21 IST

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरकडे पायी जात असताना अंघोळीसाठी तलावात उतरलेल्या दोघा भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.

ऑनलाइन लोकमततामलवाडी, दि. १५ -  कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरकडे पायी जात असताना अंघोळीसाठी तलावात उतरलेल्या दोघा भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी तुळजापूर-सोलापूर महामार्गावरील सांगवी-माळुंब्रा साठवण तलावात घडली. यावेळी तिघांना सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात ग्रामस्थ व पोलिसांना यश आले. 

रविवारी श्री तुळजाभवानी मातेचा पौर्णिमा उत्सव साजरा होत असून, यानिमित्त विविध ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने भाविक पायी तुळजापूरकडे दर्शनासाठी जात आहेत. गुरूवारात्री रात्रीपासूनच तुळजापूरकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे चित्र आहे. शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथून प्रदीप नागेश आलेकर, नागराज तिपण्णा जोडणकर, पप्पू विजयकुमार बंटी, राजू सुभाष शिरनूर व अन्य एकजण तुळजापूरच्या वाटेवर होते.

सकाळी सांगवी-माळुंब्रा साठवण तलावात हे पाचजण अंघोळीसाठी गेले होते. मात्र, त्यांना तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने काही वेळातच हे पाचहीजण बुडू लागले. यावेळी तेथे उपस्थित इतर काही भाविक व ग्रामस्थांनी यातील प्रदीप नागेश आलेकर, नागराज तिपण्णा जोडणकर व अन्य एकास पाण्याबाहेर काढले. मात्र, पप्पू विजयकुमार बंटी (वय २०) व राजू सुभाष शिरनूर (वय १९, रा. गुलबगा) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तब्बल दीड तास प्रयत्न केल्यानंतर या दोघांचे मृतदेह पाण्यात मिळून आले. ही घटना घडल्यानंतर भाविकांनी मोठ्या प्रमाणात तलावावर गर्दी केली होती. घटनेची माहिती कळताच सपोनि मिर्झा बेग, गोरोबा गाढवे, तानाजी माने, संजय जट्टे, राजाभाऊ ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून प्रेत शोधण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेची नोंद तामलवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.

बालाजी अमाईन्सच्या रुग्णवाहिकेची मदततलावात बुडालेल्या भाविकांच्या शोधकामी तामलवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी श्रीराम मायंदे, आनंद ताटे, प्रवीण बोंदर, होमगार्ड शेषेराव मडोळे, सुरतगाव येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश गुंड, तानाजी शिंदे, सुनिल सुरवसे, इसबाबी पंढरपूर यांनी दीडस तास पाण्यात प्रेताचा शोध घेतला. दरम्यान, वाढत्या गर्दीमुळे सरकारी रुग्णवाहिका तलावापर्यंत येवू शकत नव्हती. त्यामुळे पाण्यात सापडलेले प्रेत शवविच्छेदनासाठी प्रश्न निर्माण झाला होता. याच वेळी बालाजी अमाईन्स कारखान्याची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्या रुग्णवाहिकेत या दोन भाविकांचे शव विच्छेदनासाठी नेण्यात आले. 

पाच वर्षांपूर्वीची पुनरावृत्तीपाच वर्षापूर्वी याच तलावात तीन भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तशी घटना पुन्हा घडू नये म्हणून दरवर्षी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यंदाही तलावावर बंदोबस्त लावण्यात आला असून, भाविकांच्या माहितीसाठी सूचना फलकही लावण्यात आले आहेत. असे असतानाही पुन्हा पाच वर्षांपूर्वीच्याच घटनेची पुनरावृत्ती घडली.