शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारमुळेच ओबीसीसह मराठा समाजाचे आरक्षण गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST

उस्मानाबाद -केंद्र सरकारने १०२ वी घटना दुरुस्ती करून ओबीसी समाजासह मराठ्यांचेही आरक्षण संपविल्याचा घणाघात शंकरराव बाेरकर यांनी केला. भाजपाने ...

उस्मानाबाद -केंद्र सरकारने १०२ वी घटना दुरुस्ती करून ओबीसी समाजासह मराठ्यांचेही आरक्षण संपविल्याचा घणाघात शंकरराव बाेरकर यांनी केला. भाजपाने आरक्षण मिळवून न दिल्यास आगामी निवडणुकीत हा समाज त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

उस्मानाबादेत २४ जुलै राेजी ओबीसी आरक्षण बचाव जागर मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. मंचावर आ. राजेश राठोड, बाळासाहेब सानप, राजाभाऊ मुंडे, नवनाथ पडळकर, रामराव वडकुते, प्रा. सुशीलाताई मोराळे, शिवानंद कथले, धनंजय ओंबासे, सुखदेव भालेकर, खलिफा कुरेशी, रंगनाथ दुधाळ, लक्ष्मण माने, धनंजय राऊत, रवी कोरे, पांडुरंग लाटे, सोमनाथ गुरव, बाबा मुजावर, इम्तिहान बागवान, डॉ. नवनाथ दुधाळ, शरद कोळी, सोमनाथ काशीद, अरुण खरमाटे, प्रकाश राठोड, बबनराव तायवाडे, राजेंद्र राख, बाळासाहेब पांचाळ, अक्षय ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

बोरकर म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात ओबीसी समाजाची जनगणना करण्याचा आयोगाने अहवाल दिला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनीदेखील ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे आश्वासन दिले होते. तर तत्कालीन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली १६ खासदारांच्या समितीने ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, असा अहवाल दिला होता. मात्र याची अंमलबजावणी केली नसून त्या सर्व अहवालास केराची टोपली दाखवली आहे. भाजपची मंडळी अतिशय बुद्धिमान व हुशार असून ती दिलेल्या शब्दाला प्रमाण मानणारी आहे. मग ओबीसी आरक्षणाचा शब्द गेला कुठे? असा परखड सवालही त्यांनी भाजपाला केला. ओबीसी घटकांतील बारा बलुतेदाराप्रमाणेच भाजपाने सर्वात जास्त नुकसान मराठा समाजाचेही केले आहे. त्यांना नोकरी, धंदा नाही. मग त्यांनी करायचे काय, असा सवाल करीत केंद्रातील भाजपा सरकारने आरक्षण पूर्ववत करावे. अन्यथा २०२४ च्या निवडणुकीत समाजबांधव त्यांना जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशाराही दिला. यावेळी प्रा. सुशीलाताई माेराळे यांनीही मत मांडले. १९३१ साली इंग्रजांनी ओबीसींची जनगणना केली नसती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये ३४० कलम घातले नसते तर ओबीसींना अजिबातच आरक्षण मिळाले नसते. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांचे डोंगराएवढे ओबीसी समाजावर उपकार आहेत. तसेच ७ ऑगस्ट १९९० ला तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यामुळे प्रचंड मोठी क्रांती झाली आहे. ओबीसी समाजाची बाजू घेणाऱ्या नेतेमंडळींना भाजपच्या मंडळींनी तुरुंगात डांबण्याचे काम केले आहे. ओबीसींना खरा न्याय देण्याचे शेवटचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. १५ ऑगस्टला गावागावात ओबीसी आरक्षण संदर्भात मेळावे घेऊन ग्रामसभा, नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत ठराव पारित करून सरकारवर दबाव तंत्राचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी डाॅ. नवनाथ दुधाळ, सुखदेव भालेकर, शरद कोळी, राजेंद्र राख, बालाजी शिंदे रामराव वडकुते, दादासाहेब मुंडे आदींनी आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष शिवानंद कथले यांनी तर सूत्रसंचालन पांडुरंग लाटे यांनी व उपस्थितांचे आभार डॉ. नवनाथ पडळकर यांनी मानले. या जागर मेळाव्यास जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.