शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारमुळेच ओबीसीसह मराठा समाजाचे आरक्षण गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST

उस्मानाबाद -केंद्र सरकारने १०२ वी घटना दुरुस्ती करून ओबीसी समाजासह मराठ्यांचेही आरक्षण संपविल्याचा घणाघात शंकरराव बाेरकर यांनी केला. भाजपाने ...

उस्मानाबाद -केंद्र सरकारने १०२ वी घटना दुरुस्ती करून ओबीसी समाजासह मराठ्यांचेही आरक्षण संपविल्याचा घणाघात शंकरराव बाेरकर यांनी केला. भाजपाने आरक्षण मिळवून न दिल्यास आगामी निवडणुकीत हा समाज त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

उस्मानाबादेत २४ जुलै राेजी ओबीसी आरक्षण बचाव जागर मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. मंचावर आ. राजेश राठोड, बाळासाहेब सानप, राजाभाऊ मुंडे, नवनाथ पडळकर, रामराव वडकुते, प्रा. सुशीलाताई मोराळे, शिवानंद कथले, धनंजय ओंबासे, सुखदेव भालेकर, खलिफा कुरेशी, रंगनाथ दुधाळ, लक्ष्मण माने, धनंजय राऊत, रवी कोरे, पांडुरंग लाटे, सोमनाथ गुरव, बाबा मुजावर, इम्तिहान बागवान, डॉ. नवनाथ दुधाळ, शरद कोळी, सोमनाथ काशीद, अरुण खरमाटे, प्रकाश राठोड, बबनराव तायवाडे, राजेंद्र राख, बाळासाहेब पांचाळ, अक्षय ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

बोरकर म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात ओबीसी समाजाची जनगणना करण्याचा आयोगाने अहवाल दिला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनीदेखील ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे आश्वासन दिले होते. तर तत्कालीन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली १६ खासदारांच्या समितीने ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, असा अहवाल दिला होता. मात्र याची अंमलबजावणी केली नसून त्या सर्व अहवालास केराची टोपली दाखवली आहे. भाजपची मंडळी अतिशय बुद्धिमान व हुशार असून ती दिलेल्या शब्दाला प्रमाण मानणारी आहे. मग ओबीसी आरक्षणाचा शब्द गेला कुठे? असा परखड सवालही त्यांनी भाजपाला केला. ओबीसी घटकांतील बारा बलुतेदाराप्रमाणेच भाजपाने सर्वात जास्त नुकसान मराठा समाजाचेही केले आहे. त्यांना नोकरी, धंदा नाही. मग त्यांनी करायचे काय, असा सवाल करीत केंद्रातील भाजपा सरकारने आरक्षण पूर्ववत करावे. अन्यथा २०२४ च्या निवडणुकीत समाजबांधव त्यांना जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशाराही दिला. यावेळी प्रा. सुशीलाताई माेराळे यांनीही मत मांडले. १९३१ साली इंग्रजांनी ओबीसींची जनगणना केली नसती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये ३४० कलम घातले नसते तर ओबीसींना अजिबातच आरक्षण मिळाले नसते. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांचे डोंगराएवढे ओबीसी समाजावर उपकार आहेत. तसेच ७ ऑगस्ट १९९० ला तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यामुळे प्रचंड मोठी क्रांती झाली आहे. ओबीसी समाजाची बाजू घेणाऱ्या नेतेमंडळींना भाजपच्या मंडळींनी तुरुंगात डांबण्याचे काम केले आहे. ओबीसींना खरा न्याय देण्याचे शेवटचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. १५ ऑगस्टला गावागावात ओबीसी आरक्षण संदर्भात मेळावे घेऊन ग्रामसभा, नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत ठराव पारित करून सरकारवर दबाव तंत्राचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी डाॅ. नवनाथ दुधाळ, सुखदेव भालेकर, शरद कोळी, राजेंद्र राख, बालाजी शिंदे रामराव वडकुते, दादासाहेब मुंडे आदींनी आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष शिवानंद कथले यांनी तर सूत्रसंचालन पांडुरंग लाटे यांनी व उपस्थितांचे आभार डॉ. नवनाथ पडळकर यांनी मानले. या जागर मेळाव्यास जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.