शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

‘डीपीसी’च्या नियतव्ययात ३५० काेटींपर्यंत वाढ करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST

उस्मानाबाद : जिल्हा वार्षिक नियाेजन आराखड्याच्या आनुषंगाने राज्याचे वित्त व नियाेजनमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे साेमवारी बैठक ...

उस्मानाबाद : जिल्हा वार्षिक नियाेजन आराखड्याच्या आनुषंगाने राज्याचे वित्त व नियाेजनमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे साेमवारी बैठक हाेत आहे. या पार्श्वभूमीवर ‘डीपीसी’च्या नियतव्ययामध्ये किमान ३५० काेटींपर्यंत वाढ करावी, अशी मागणी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या नीती आयाेगाने उस्मानाबादचा समावेश मागास जिल्ह्यांच्या यादीत केला आहे. मागासलेपणाचा हा शिक्का पुसण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा वार्षिक याेजनेच्या माध्यमातून भरीव आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या जलदगतीने आर्थिक विकासासाठी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, टेक्निकल टेक्सटाइल हब, नळदुर्ग ग्रामीण रुग्णालय, मराठवाडा वॉटर ग्रीड, तेरणा व तुळजाभवानी साखर कारखान्याकडील थकहमी, उस्मानाबादी शेळी व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा बनविणे याबाबी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात अंतर्भूत करणे आवश्यक आहे. केवळ आराखड्यात समावेश करून भागणार नाही, तर यासाठी भरीव आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. दि. १५फेब्रुवारी राेजी राज्याचे वित्त व नियाेजनमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबाद येथे बैठक हाेत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपराेक्त मागणी केली आहे.

चाैकट...

उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या मार्गामुळे उस्मानाबाद हे रेल्वे जंक्शनचे शहर होणार आहे. राज्य सरकारचा ५० टक्के वाटा उचलण्याच्या सहमतीने हा प्रकल्प २०१९ मध्ये मंजूर करण्यात आला. परंतु, राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी निधीची तरतूदच करण्यात आलेली नाही. तरीदेखील केंद्र सरकारने सुरुवातीला एक कोटी व अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद केली आहे. नगर-बीड-परळी व इतर तत्सम मार्गांच्या धर्तीवर याही मार्गासाठी तरतूद करावी, अशी आमदार पाटील यांची मागणी आहे.