शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सात शिक्षकांच्या नियुक्तीवरून संशयकल्लाेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:30 IST

साधारपणे सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेकडे इतर जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने ३९ शिक्षक रूजू हाेण्यासाठी आले हाेते. रूजू करून घेण्यापूर्वी उपलब्ध ...

साधारपणे सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेकडे इतर जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने ३९ शिक्षक रूजू हाेण्यासाठी आले हाेते. रूजू करून घेण्यापूर्वी उपलब्ध जागा, कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी ११ शिक्षक असे निघाले की, ज्यांच्यासाठी जागा रिक्त नव्हत्या. मात्र पाेर्टलवर जागा रिक्त असल्याचे शिक्षण विभागाने कळविले हाेते. हे प्रकरण चाैकशीच्या फेर्यात सापडल्यानंतर शिक्षणमधील दाेघांविरूद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली हाेती. यानंतर चाैघांना परत पाठिवले. मात्र, उर्वरित ७ जण परत गेले नाहीत. दरम्यान, हे सात शिक्षक वगळता उर्वरित २८ जणांना शाळेवर नियुक्ती देणे गरजेचे असताना, त्यांनाही ताटकळत ठेवले. या अनुषंगाने एक-दीड महिन्यांपूर्वी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांच्याकडे जिल्हा परिषदेने मार्गदर्शन मागविले. हे करताना उपराेक्त कारवाईचा संदर्भही दिला गेला नाही. त्यामुळे शासनानेही संबंधितांना सामावून घ्यावे, असे मार्गदर्शन दिले. हे पत्र सायंकाळी साडेसात वाजता मिळताच शिक्षण विभागाने दुसर्याच दिशी समुपदेशन ठेवले. या सर्व घडामाेडींवर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते महेंद्र धुरगुडे यांनी प्रश्नचिन्ह लावले आहे. शासनाचे स्पष्ट निर्देश असताना मार्गदर्श मागण्याची गरज काय हाेती? मार्गदर्शन मागविताना निलंबनाच्या कारवाईचा संदर्भ का दिला गेला नाही? अशी विचारणा करीत ग्रामविकास मंत्र्यांनाच अंधारात ठेवल्याचा आराेप केला आहे. यासबंधित सर्व कागदपत्रे त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठिवली आहेत.

चाैकट..

संचमान्यता नव्हती, तर रिक्त पदे कळविली का?

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेपूर्वी शासनाने स्वतंत्र आदेश काढून ज्या जिल्हा परिषदेची संचमान्यता पूर्ण आहे, त्यांनीच जागा कळवाव्यात, असे सांगितले हाेते. आपल्या जिल्हा परिषदेची संचमान्यता आता झाली आहे. असे असतानाही रिक्त जागांची माहिती कळिवली कशी? असा सवाल धुरगुडे यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर संबंधित प्रवर्गाच्या जागा अनुक्रमे १८ व ८ अतिरिक्त आहेत. असे असतानाही प्रत्येकी पाच रिक्त काेणी दाखविल्या? याचीही चाैकशी हाेणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सहा महिन्यांच्या वेतनाचे काय?

आंतरजिल्हा बदलीने आलेल्यांपैकी २८ शिक्षक नियुक्तीसाठी पात्र हाेते. असे असतानाही त्यांना पाच ते सहा महिने नियुक्ती दिली नाही. हे सर्व शिक्षक बसून हाेते. पात्र असतानाही त्यांना वेळेत रूजू करून न घेण्यामागचे कारण काय? असा सवाल करीत संबंधित शिक्षकांचे वेतन जबाबदार अधिकार्यांच्या वेतनातून द्यावे, अशी मागणी महेंद्र धुरगुडे यांनी केली आहे.