शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात विद्यार्थ्यांविना ५० टक्के गुरुजींचीच भरतेय शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : जिल्हा तिसऱ्या स्टेपमध्ये हाेता. त्यामुळे काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आलेले नाही. त्यामुळे ...

उस्मानाबाद : जिल्हा तिसऱ्या स्टेपमध्ये हाेता. त्यामुळे काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आलेले नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी शाळांवरील गुरुजींची उपस्थिती पन्नास टक्केच राहील, असे जिल्हा प्रशासनाकडून नमूद करण्यात आले हाेते. या पत्राला अनुसरूनच शिक्षण विभागानेही पत्र काढले हाेते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच शाळेतील गुरुजींची उपस्थिती पन्नास टक्केच आहे. परिणामी अन्य जिल्ह्यांप्रमाणे वेळेवरून उडालेल्या गाेंधळाला थारा मिळू शकला नाही.

राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. काही जिल्ह्यांत शिक्षकांच्या उपस्थितीबाबत दाेन पत्रके निघाली. शिक्षण संचालकांनी ५० टक्के उपस्थितीचे फर्मान साेडले, तर जिल्हा परिषदांनी ५० टक्के उपस्थितीचे पत्र काढले. या दाेन पत्रांमुळे शिक्षकांमध्ये पुरता गाेंधळ उडाला. शाळेवर नेमक्या किती टक्के शिक्षकांनी उपस्थित राहायचे, असा प्रश्न शिक्षक एक दुसऱ्याला विचारत हाेते. दरम्यान, उस्मानाबादेत काेराेना रुग्णसंख्या अपेक्षित प्रमाणात कमी झालेली नव्हती. त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या पहिल्याऐवजी थेट तिसऱ्या टप्प्यात उस्मानाबादचा समावेश झाला. परिणामी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध प्रशासनाला उठविता आले नाहीत. निर्बंध काहीअंशी शिथिल करण्यात आले. या आदेशातच जिल्हा प्रशासनाने शाळांतील शिक्षकांची उपस्थिती पन्नास टक्के निश्चित केली हाेती. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने पत्र काढले हाेते. दरम्यान, दाेन पत्रांवरून राज्यभरात गाेंधळ उडाल्यानंतर शासनाने ५० टक्के उपस्थिती निश्चित केली. यानंतर उस्मानाबाद जिल्हा परिषदेनेही दुसरे पत्र काढले. त्यामुळे अन्य जिल्ह्यांप्रमाणे उस्मानाबादेत शिक्षक उपस्थितीच्या प्रमाणावरून गाेंधळ उडाला नाही.

चाैकट...

शिक्षण विभागाने शाळा सुरू हाेण्यापूर्वी पत्र काढले हाेते. ते पत्रही ५० टक्के उपस्थितीच्या अनुषंगाने हाेते. शासनाने स्वतंत्र पत्र काढून ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य केली. त्यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीवरून आपल्याकडे गाेंधळ उडण्याचा प्रश्नच आला नाही. आपल्याकडील सर्व शाळांतून सध्या विद्यार्थ्यांना ॲप तसेच ऑनलाइन पद्धतीने ज्ञानदान करण्यात येत आहे.

-गजानन सुसर, शिक्षणाधिकारी.

दाेन्ही पत्रके ५० टक्के उपस्थितीचीच...

काेराेनाचा संसर्ग फारसा ओसरला नसल्याने शिक्षण विभागाने शाळा सुरू हाेण्यापूर्वीच पत्र काढून शाळेवर शिक्षकांची ५० टक्केच उपस्थिती निश्चित केली हाेती. राज्यातील काही जिल्ह्यांत मात्र शिक्षण संचालकांनी ५० टक्के उपस्थिती तर जिल्हा परिषदांनी तब्बल १०० टक्के उपस्थित राहण्याचे फर्मान गुरुजींना काढले हाेते. त्यामुळे गाेंधळाचे वातावरण निर्माण झाले हाेते. शासनाच्या पत्रकानंतर हा गाेंधळ निवळला. मात्र, उस्मानाबादेत दाेन्ही पत्रे ५० टक्के उपस्थितीची असल्याने अन्य जिल्ह्यांप्रमाणे गाेंधळ उडाला नाही.

रिकामे बाकडे अन् गुरुजींची हजेरी

१५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. परंतु, काेराेनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास मनाई आहे. मात्र, ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक केली आहे. संबंधित शिक्षकांनी शाळेवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने ज्ञानदान करण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा किलबिल ऐकावयास येत नाही. सध्या केवळ रिकामे बाकडे आणि शिक्षकांची हजेरी एवढेच चित्र पहावयास मिळत आहे.

शिक्षक

१३,९७८

शिक्षकेतर कर्मचारी

१७००

जिल्ह्यातील शाळा

१५३३

जिल्हा परिषद शाळा

१०८३

अनुदानित शाळा

३९०

विनाअनुदानित शाळा

१३

स्वंयअर्थसहाय्यित शाळा

८०