शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

‘ग्रामीण’मध्ये विदारक चित्र, ना काॅन्टॅक्ट ट्रेसिंग, ना काेराेना कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:30 IST

उस्मानाबाद - काेराेनाच्या पहिल्या लाटेत शहरी तसेच ग्रामीण भागातही अत्यंत चांगल्या पद्धतीने खबरदारी घेतली जात हाेती. एखादा रुग्ण आढळून ...

उस्मानाबाद - काेराेनाच्या पहिल्या लाटेत शहरी तसेच ग्रामीण भागातही अत्यंत चांगल्या पद्धतीने खबरदारी घेतली जात हाेती. एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तीचा शाेध घेणे, काेराेना टेस्ट करणे, हाेम क्वारंटाईनचा शिक्का मारणे, हाॅटस्पाॅटमधून आलेल्यांना शाळात क्वारंटाईन करणे, डाेअर-टू-डाेअर जाऊन ऑक्सिजन, तापमानाच्या नाेंदी ठेवल्या जात हाेत्या. त्यामुळे काेराेनाचा संसर्ग आटाेक्यात आला हाेता. परंतु, सध्या ग्रामीण भागात असे काहीच हाेताना दिसत नाही. एखादा रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यानंतर शेजार्याला दाेन ते तीन दिवसानंतर माहीत हाेते. हे असेच सुरू राहिल्यास शहरापेक्षाही प्रचंड गतीने काेराेना वाढेल, अशी भीती जाणकार व्यक्त करू लागले आहेत.

काेराेची पहिली लाट आल्यानंतर जिल्हाबंदी करण्यात आली. त्यामुळे हाॅटस्पाॅटमधून आलेल्या लाेकांना सुरुवातीचे पंधरा दिवस त्या-त्या गावातील शाळेत ठेवले जात हाेते. गावात एखादा रुग्ण आढळून आल्यास त्याच्या संपर्कातील व्यक्तीचा शाेध घेऊन त्यास काेराेना चाचणी करण्यास गावचे तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, काेतवाल, पाेलीस पाटील व सरपंच यांचा चमू भाग पाडत असे. एवढेच नाही तर संबंधित परिसर सील करून गल्लीबंदी केली जात असे. यानंतर आशा कार्यकर्ती, आराेग्यसेविका डाेअर टू डाेअर जाऊन लाेकांचा ताप तसेच ऑक्सिजनची तपासणी करीत हाेत्या. त्यामुळे थाेडीबहुत लक्षण दिसली तरी तातडीने तपासणी करून घेण्यास सांगितले जात असे. मात्र, सध्या ग्रामीण भागात हे चित्र अपवादानेही पाहावयास मिळत नाही. एखाद्या गल्लीतील रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या शेजाऱ्यांना दाेन-दाेन दिवस माहीत हाेत नाही. त्यामुळे त्याच्या संपर्कात काेण आले? कितीजण आले? त्यांना काही त्रास सुरू झाला आहे का? अशा स्वरूपाची विचारपूस करणारी यंत्रणा सध्या गावपातळीवर कार्यरत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे रूग्णांच्या संपर्कात आलेली मंडळीही बिनदिक्कतपणे कुटुंबात, गावात वावरताना दिसत आहे.

चाैकट...

आशा, आराेग्य कर्मचाऱ्यांचीच धावपळ...

सध्या ग्रामीण भागात मानधन तत्त्वावर असलेल्या आशा कार्यकर्ती व आराेग्य केंद्र, उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचीच धावाधाव सुरू असताना दिसत आहे. महसूल, जिल्हा परिषदेेने गावपातळीवरील आपल्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून ‘आराेग्य’ला साथ देण्याबाबत आदेशित करायला हवे. परंतु, तसेही अद्याप झालेले नाही. अनेक गावांतील कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नाहीत. त्यामुळे गावात काय चाललेय? याचीही त्यांना खबर नाही. असे प्रकार आता समाेर येऊ लागले आहेत. काही गावांत लेखी तक्रारी झाल्या आहेत.

काेराेना कक्षांचाही नाही पत्ता...

पहिल्या लाटेत गावपातळीवर २४ तास काेराेना कक्ष कार्यरत हाेते. त्यामुळे गावात एकही रुग्ण आढळला तरी संपूर्ण यंत्रणा कामाला लागत हाेती. एवढेच नाही तर हाॅटस्पाॅटमधून आलेल्या लाेकांवरही नजर ठेवली जात असे. टेस्ट केल्याशिवाय त्यांना माेकळीक दिली जात नसे. परंतु, सध्या हे अपवादानेही ताेताना दिसत नाही, हेही कारण रुग्णसंख्या वाढीस पूरक ठरू लागले आहे.

गावामध्ये काेणाचा वाॅच?

गावामध्ये एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर ग्रामसेवक, तलाठी, कृषी साहाय्यक, पाेलीस पाटील, काेतवाल, शिक्षक, आदी प्रमुख अधिकाऱ्यांनी पुढे येऊन उपायाेजना राबविणे गरजेचे आहे. पहिल्या लाटेत तसे हाेत हाेते. परंतु, सध्या गावात काेणाचा वाॅच आहे? हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून पंचायत समित्यांकडे तक्रारी हाेऊ लागल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

काॅन्टॅक्ट ट्रेसिंग नाहीच...

सध्या गावात एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर त्यास उपचारासाठी ॲडमिट करून घेतले जाते. यानंतर काॅन्टॅक्ट ट्रेसिंग हाेणे गरजेचे आहे. परंतु, तूर्तास तसे हाेताना दिसत नाही. ‘‘मी अमुक व्यक्तीच्या संपर्कात आलाे आहे. माझीही चाचणी करा’’, असे म्हणत चाचणी सेंटरवर गेल्यानंतर संपर्कातील व्यक्ती समाेर येत आहेत. हे अत्यंत धाेकादायक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने याबाबतीतही पावले उचलणे गरजेचे आहे.

काेट...

पहिल्या लाटेप्रमाणेच आताही उपाययाेजना करणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार नुकतेच पत्र काढले आहे. गावपातळीवर एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर त्यास दवाखान्यात दाखल करण्यापासून ते संपर्कातील व्यक्तींचा शाेध घेऊन त्यांची चाचणी करून घेण्यापर्यंतच्या घेण्याबाबत सांगितले आहे.

-डाॅ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आराेग्याधिकारी.

०००

जिल्ह्यातील एकूण रुग्ण

०००

ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या

००००

गावांमध्ये हाेम आयसाेलेशनमध्ये असलेले रुग्ण