शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत कृषी आयुक्तांसोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST

राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी उमरगा येथे झालेल्या शेतकरी बैठकीतून समोर आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत राज्याचे कृषी ...

राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी उमरगा येथे झालेल्या शेतकरी बैठकीतून समोर आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्याशी मंगळवारी पुणे येथे त्यांच्या कार्यालयात भेटून चर्चा केली.

यावेळी उमरगा व परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या, उत्पन्न वाढ, शेतीमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांसाठी शांतीदूत परिवाराच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाविषयी देखील चर्चा करण्यात आली.

शांतीदूत परिवाराच्या वतीने शाश्वत कृषि विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी यांच्या मार्गदर्शनाने लवकरच उमरगा व परिसरातील शेतकऱ्यांचे एकत्रित गट तयार करून शंभर एकर क्षेत्रात एकत्रित सेंद्रीय भाजीपाल्याची लागवड करण्यात येणार आहे. याची संपूर्ण विक्री व्यवस्था ‘शेतकरी-ते-ग्राहक’ या योजनेतून होणार असून, शेतकऱ्यांसाठी कृषी माल संकलन केंद्र देखील उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उमरगा परिसरात तर दुसऱ्या टप्प्यात लातूर, सोलापूर, उस्मानाबाद शहरात ही योजना राबविण्यात येणार आहे.

या अनुषंगाने २७ मार्च रोजी उमरगा येथे घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सातारा व पुणे येथील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या डॉ. विठ्ठलराव जाधव व शाश्वत कृषी विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक विजय ठुबे (पुणे) यांनी आयुक्तांसमोर मांडल्या. त्यावर

शेतकऱ्यांच्या सर्व समस्या शासन स्थरावर सोडविण्यात येणार असून, सदर प्रकल्पास महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्तांनी अनुमती दिली असल्याची माहिती विठ्ठल जाधव यांनी दिली.