शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत कृषी आयुक्तांसोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST

राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी उमरगा येथे झालेल्या शेतकरी बैठकीतून समोर आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत राज्याचे कृषी ...

राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी उमरगा येथे झालेल्या शेतकरी बैठकीतून समोर आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्याशी मंगळवारी पुणे येथे त्यांच्या कार्यालयात भेटून चर्चा केली.

यावेळी उमरगा व परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या, उत्पन्न वाढ, शेतीमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांसाठी शांतीदूत परिवाराच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाविषयी देखील चर्चा करण्यात आली.

शांतीदूत परिवाराच्या वतीने शाश्वत कृषि विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी यांच्या मार्गदर्शनाने लवकरच उमरगा व परिसरातील शेतकऱ्यांचे एकत्रित गट तयार करून शंभर एकर क्षेत्रात एकत्रित सेंद्रीय भाजीपाल्याची लागवड करण्यात येणार आहे. याची संपूर्ण विक्री व्यवस्था ‘शेतकरी-ते-ग्राहक’ या योजनेतून होणार असून, शेतकऱ्यांसाठी कृषी माल संकलन केंद्र देखील उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उमरगा परिसरात तर दुसऱ्या टप्प्यात लातूर, सोलापूर, उस्मानाबाद शहरात ही योजना राबविण्यात येणार आहे.

या अनुषंगाने २७ मार्च रोजी उमरगा येथे घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सातारा व पुणे येथील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या डॉ. विठ्ठलराव जाधव व शाश्वत कृषी विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक विजय ठुबे (पुणे) यांनी आयुक्तांसमोर मांडल्या. त्यावर

शेतकऱ्यांच्या सर्व समस्या शासन स्थरावर सोडविण्यात येणार असून, सदर प्रकल्पास महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्तांनी अनुमती दिली असल्याची माहिती विठ्ठल जाधव यांनी दिली.