शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
4
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
5
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
6
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
7
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
8
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
9
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
10
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
11
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
12
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
13
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
14
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
15
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
16
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
17
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
18
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
19
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
20
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट

मजुरी वाढूनही मजुरांची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:26 IST

पूर्वी गावगाड्यात शेती कसण्यासाठी आवश्यक तेवढे मजूर मिळत होते. छोटे शेतकरी स्वतः मशागत करण्यावर भर देत असत. मोठ्या शेतकऱ्यांकडे ...

पूर्वी गावगाड्यात शेती कसण्यासाठी आवश्यक तेवढे मजूर मिळत होते. छोटे शेतकरी स्वतः मशागत करण्यावर भर देत असत. मोठ्या शेतकऱ्यांकडे हमखास सालगडी असायचे तर मध्यम शेतकरी गरजेनुसार हंगामी मजूर लाऊन शेती कामे उरकून घेत असत. काळाच्या ओघात ग्रामीण भागात अनेक ‘स्थित्यंतरे’ झाली आहेत. यात बहुतांश मजूर वर्गांना शेती व्यतिरिक्त रोजगार उपलब्ध झाला आहे. यातून काही गावात स्थलांतरे ही नोंदली गेली आहेत. यामुळे निव्वळ शेती मशागतीवर उदरनिर्वाह भागवणाऱ्या कुटूंबातील संख्या गरजेच्या तुलनेत अत्यल्प राहिली आहे. यास्थितीत शेती क्षेत्र कात टाकत असताना पीक पद्धती बदलत असली तरी संकटाची मालिका काही संपुष्टात आलेली नाही. लहरी निसर्ग, वाढता उत्पादन खर्च, दरातील अस्थिरता यासोबतच शेती कसण्यासाठी मजुरांची कमतरता जाणवत असल्याने गावोगावी कोणी सालगडी देता का? मजूर देता का मजूर? अशी आर्त विनवणी करण्याची नौबत शेतकऱ्यांवर आली आहे.

चौकट...

पाच वर्षापूर्वी मजुरी दर

स्त्री १२५, पुरूष २००

सध्या

स्त्री २५०, पुरूष ३५०

यंत्राने होणारी कामे

नांगरणी, मोगडनी, पाळी, पेरणी, काढणी, फवारणी अशी कामे यंत्राणे करण्यावर सध्या भर दिला जात आहे. असे असले तरी मशागत, काढणी, छाटणी, मळणी आधी विविध पिकांच्या कामाला मजुरांची गरज असते.

गरज ही शोधाची जननी

मजुरांची उपलब्धता होत नसल्याने शेतकऱ्यांना गरज असलेल्या व मजुराकरवी करून घेत जात असलेल्या कामासाठी नवतंत्राने अनेक यंत्र, सामग्री उपलब्ध करून दिली आहे. ट्रक्टर्सचा व त्यावरील यांत्रिक साधनाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळेच बैलपेर आता नामशेष होत असल्याचे दिसत आहे. कापूस वेचनीसाठी यंत्राचा शोध लागत नसल्याने व मजूरही मिळत नसल्याने शेतकरी हे पीक घेण्याचे टाळत आहेत.

प्रतिक्रिया

शेती कामासाठी मजूर मिळतच नाहीत. यामुळे अडचणी येत आहेत. कापसाला वेचनीसाठी माणूस मिळत नाही, यात दरही वाढवला आहे. यामुळे यापुढे पिकच घ्यायचे टाळणार आहोत.

-राजाभाऊ गंभिरे

मजुराअभावी फवारणी, भाजीपाला काढणी, खुरपणी, खते देणे आदी कामे वेळेवर न झाल्याने उत्पादनात घट होते आणि सध्या मजूर गुत्ते पद्धतीमध्ये अव्वाच्या सव्वा मागत आहेत. परंतु, शेतकऱ्याला पर्याय नाही. ऊस लावणं ६ हजार रूपये एकर सोयाबीन काढणी ४ हजार रूपये बॅग घेत आहेत.

-विनोद तांबारे, आंदोरा

शेतीच्या दैनंदिन कामासाठी मजूर मिळत नाहीत. याशिवाय नियमित कामासाठी सालगडी ही मिळत नाहीत. यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात भटकंती करावी लागत आहे. सोयाबीन काढणीला बाहेरच्या जिल्हातील मजूर आणले होते.

-तानाजी वाघमारे, भाटशिरपुरा