शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

मुबलक पाणी असतानाही टंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:01 IST

उमरगा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही शहरात पालिकेकडून मात्र नळाद्वारे दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात ...

उमरगा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही शहरात पालिकेकडून मात्र नळाद्वारे दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने शहरवासियांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच शहरातील शास्त्रीनगर भागातील बोअरही पालिकेने टाकी काढून बंद केल्यामुळे मागील महिनाभरापासून रहिवाशांचे हाल चालू असल्याचे सांगत या भागातील महिलांनी आज थेट नगर परिषद गाठून अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला.

शहराला माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प व कोरेगाव तलावातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा केला जातो. सध्या या दोन्ही तलावात भरपूर पाणीसाठा असतानाही सततची पाईपलाईन गळती व खंडित वीज पुरवठ्यामुळे शहराला दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीगळती मुळे पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी दरवर्षी पालिका ७० लाख रुपये खर्च करते. तरीही पाणी गळतीची समस्या कायम आहे. शहरातील बोअरलाही सध्या मुबलक पाणी आहे. परंतु, यातील बहुतांश बोअर देखील सातत्याने बंद पडत असून, याची वेळेवर दुरूस्ती होत नाही. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. शहरातील सार्वजनिक बोअर याची दुरुस्ती, देखभाल यासाठी एका कंत्राटदारांसोबत करार करण्यात आला असून, वर्षभरात शहरातील पालिकेच्या अधिकाराखालील सर्व बोअरची दुरुस्ती व देखभाल करण्याच्या बदल्यात वर्षाला नऊ लाख रुपये अदा केले जातात. परंतु, हा कंत्राटदार नादुरुस्त बोअर महिना महिना दुरुस्त करीत नसल्याच्या शहरवासियांच्या तक्रारी आहेत. शहरातील शास्त्रीनगर भागातही मागील महिनाभरापासून रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे या भागातील त्रस्त महिलांनी बुधवारी थेट नगर परिषद गाठून आपली कैफीयत मांडली. तेथील चालू असलेल्या सार्वजनिक बोअरवरील पाण्याची टाकी महिनाभरापूर्वी दोन दिवसात परत बसवितो म्हणून काढून नेली असून, अद्याप ती बसविली नसल्याची तक्रार त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे सभापती बालाजी पाटील यांच्याकडे केली. यावर सभापती बालाजी पाटील यांनीही पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी त्यांनी पाणीपुरवत्यावर वर्षभरात कशा कशावर किती खर्च होतो याची माहिती बैठकीत देण्यास सांगितले.

कोट....

शहरातील कोणतेही सार्वजनिक बोअर सलग आठ दिवस चालत नाहीत. दुरुस्तीच्या नावाखाली कंत्राटदार कोणतेही काम करीत नसताना त्याला वर्षाला नऊ लाख कशासाठी अदा केले जातात, असा प्रश्न आहे. त्यामुळे बोअर सतत बंद पडणे व कंत्राटदाराच्या कामाबाबत चौकशी करावी.

- अशोक बनसोडे,सामाजिक कार्यकर्ता

मी पाणीपुरवठा विभागाच्या सभापतीपदाचा पदभार नुकताच स्वीकारला आहे. शहरातील पाणी पुरवठ्याच्या बाबतीत अनेक तक्रारी ऐकण्यात येत आहेत. नेमका काय घोळ आहे, याच्या मुळाशी मी जाणार असून, शहरात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर सक्तीने कारवाई केली जाईल.

-बालाजी पाटील, पाणीपुरवठा सभापती

फोटो- सार्वजनिक बोअर व पाण्याची टाकी बसविण्याच्या मागणीसाठी शहरातील शास्त्री नगर परिसरातील महिलांनी बुधवारी पालिकेत जाऊन सभापतींची भेट घेतली.