शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

गतिरोधक बसविण्याची होतेय मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:13 IST

पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती भूम - तालुक्यातील रामकुंड येथे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला ताेंड द्यावे लागत असून, पाण्यासाठी भटकंती करावी ...

पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती

भूम - तालुक्यातील रामकुंड येथे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला ताेंड द्यावे लागत असून, पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कुंथलगिरी तलावातून या गावाला पाणी पुरवठा होतो. परंतु, पाणी पुरवठ्याचे विद्युत कनेन्शन बंद केल्याने पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी गैरसोय होत आहे.

वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीती

भूम - शहरातील एस. पी. कॉलेज परिसर ते शासकीय विश्रामगृह परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

तेर परिसरात थंडी वाढली

तेर - गेल्या दोन-तीन दिवसांपासून तेर परिसरातील गावांमध्ये थंडी वाढली आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थ पुन्हा गरम कपडे वापरत आहेत. अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांनी काळजी घेताना दिसून येते आहेत.

हरभरा काढणीस आला वेग

तेर - तेर परिसरातील काही गावांमधील शेतीशिवारात हरभरा काढणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शेतशिवारात शेतकरी हरभरा काढणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

कोण होणार सरपंच गावागावात चर्चा वाढली

तेर - नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. परंतु, सरपंच व उपसरपंच कोण होणार याबाबत परिसरातील गावांमध्ये पारावर चर्चा रंगली आहे.

(सिंगल फोटो - अजित चंदनशिवे ०३)

गार्गी कावरे हिचे यश

तुळजापूर - स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर आयोजित शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे विभागीय चित्रकला स्पर्धेत म. वि. रा. शिंदे प्रशालेची विद्यार्थिनी गार्गी महेंद्र कावरे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. तिला सेवानिवृत्त शिक्षक पद्माकर मोकाशी, सहशिक्षक सतीश हुंडेकर, सुप्रिया कावरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गार्गीच्या चित्राची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

गतिराेधक बसविण्याची मागणी

कसबे तडवळा - उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेलगतच्या लातूर - बार्शी राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रस्त्यालगतच शाळा, बसस्थानक असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.