शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधक बसविण्याची होतेय मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:13 IST

पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती भूम - तालुक्यातील रामकुंड येथे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला ताेंड द्यावे लागत असून, पाण्यासाठी भटकंती करावी ...

पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती

भूम - तालुक्यातील रामकुंड येथे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला ताेंड द्यावे लागत असून, पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कुंथलगिरी तलावातून या गावाला पाणी पुरवठा होतो. परंतु, पाणी पुरवठ्याचे विद्युत कनेन्शन बंद केल्याने पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी गैरसोय होत आहे.

वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीती

भूम - शहरातील एस. पी. कॉलेज परिसर ते शासकीय विश्रामगृह परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

तेर परिसरात थंडी वाढली

तेर - गेल्या दोन-तीन दिवसांपासून तेर परिसरातील गावांमध्ये थंडी वाढली आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थ पुन्हा गरम कपडे वापरत आहेत. अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांनी काळजी घेताना दिसून येते आहेत.

हरभरा काढणीस आला वेग

तेर - तेर परिसरातील काही गावांमधील शेतीशिवारात हरभरा काढणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शेतशिवारात शेतकरी हरभरा काढणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

कोण होणार सरपंच गावागावात चर्चा वाढली

तेर - नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. परंतु, सरपंच व उपसरपंच कोण होणार याबाबत परिसरातील गावांमध्ये पारावर चर्चा रंगली आहे.

(सिंगल फोटो - अजित चंदनशिवे ०३)

गार्गी कावरे हिचे यश

तुळजापूर - स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर आयोजित शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे विभागीय चित्रकला स्पर्धेत म. वि. रा. शिंदे प्रशालेची विद्यार्थिनी गार्गी महेंद्र कावरे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. तिला सेवानिवृत्त शिक्षक पद्माकर मोकाशी, सहशिक्षक सतीश हुंडेकर, सुप्रिया कावरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गार्गीच्या चित्राची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

गतिराेधक बसविण्याची मागणी

कसबे तडवळा - उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेलगतच्या लातूर - बार्शी राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रस्त्यालगतच शाळा, बसस्थानक असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.