शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

उस्मानाबादेत चारा छावण्यांच्या प्रस्तावांना मंजुरीचा ‘दुष्काळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 16:28 IST

आजघडीला हाडोंग्री येथे एकमेव छावणी सुरू आहे

ठळक मुद्दे जिल्ह्यात ८९ हजार पुशधन १८२ पैकी मंजुरीसाठी पाठविले ४५ प्रस्ताव

भूम (जि. उस्मानाबाद) : तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही प्रचंड गंभीर बनला आहे. चारा छावण्यांसाठी प्रशासन दरबारी धडकलेल्या १८२ प्रस्ताव चारा टंचाईची दाहकता दर्शविण्यास पुरेसी आहेत. अशा परिस्थिीत गरजेनुसार छावण्यांना मंजुरी देणे गरजेचे आहे. परंतु, आजघडीला हाडोंग्री येथे एकमेव छावणी सुरू आहे.त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये भर पडली आहे.

भूम तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगरी भाग आहे. त्यामुळे चांगले पर्जन्यमान झाले तर शेतीतून बऱ्यापैकी उत्पन्न हाती लागते व पशुधनाच्या चाऱ्याची सोय होते. परंतु, यंदा पावासळ्यात वार्षिक सरासरीच्या अल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे खरीप आणि रबी दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेले. परिणामी ८० हजारावर पशुधनाच्या चाऱ्या प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांकडून चारा छावण्यांची मागणी होत आहे. त्यानुसार तहसील कार्यालयाकउे सुमारे १८२ प्रस्ताव दाखल झाले आहेत. या सर्वच प्रस्तावांमध्ये प्रशासनस्तरावरून त्रुट्या काढण्यात आल्या होत्या.

संबंधित त्रुटींची पूर्तता केल्यानंतर १५१ प्रस्ताव पात्र ठरले आहेत. आजघडील यापैकी केवळ ४५ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. असे असले तरी अद्याप यापैकी एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सध्या केवळ हाडोंग्री येथे एकमेव छावणी सुरू आहे. या छावणीत सध्या सहा हजारावर पशुधनाची सोय करण्यात आली. प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल पशुपालक शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. 

दोन महिन्यानंतरही मंजुरी नाही जानेवारी महिन्यापासून चारा संपला आहे. त्यामुळे छावणीचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु, दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असल्याचे पशुपालक संजय गाढवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

चारा छावणीसाठी प्रशासनाकडे साधारपणे दोन महिन्यांपूर्वी प्रस्ताव दाखल केला आहे. प्रस्तावातील त्रुटींची दोनेवळा पूर्तता करून प्रस्ताव दाखल केला. परंतु, मंजुरी देण्यास संबंधित यंत्रणेकडून चालढकल केली जात आहे, असे उळूप येथील दत्ता काळे म्हणाले. दुष्काळ व नापिकीला कंटाळून आजवर गावातील दोन ते तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. गावाची आणेवारीही २५ टक्के आहे. असे असतानाही पशुधन जगविण्यासाठी प्रशासनाकडून छावणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जात नाही. त्यामुळे पशुधनाची उपासमार होत आहे, असे राजेंद्र गपाट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादUsmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबादdroughtदुष्काळ