शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निजामाला पळता भुई थोडी केलेले दत्तोबा भोसले दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात रझाकारांना पळता भुई थोडी करुन सोडणारे क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचा पराक्रम पुरेसा पटलावर आणला ...

उस्मानाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात रझाकारांना पळता भुई थोडी करुन सोडणारे क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचा पराक्रम पुरेसा पटलावर आणला गेला नाही. त्यांचा इतिहास शब्दबद्ध होण्यासाठी संशोधन व्हावे, त्यांचे कार्य जगासमोर यावे, यासाठी चर्चासत्र घ्यावे व त्यांचे स्मारक उभारावे, या मागणीसाठी उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील सुमारे ७० ग्रामपचायतींनी ठराव घेतले आहेत.

मराठवाड्यातून निजामाला पळवून लावण्यासाठी जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यवीरांनी सशस्त्र लढा उभारला होता. दुर्दैवाने त्यावेळचे अनेक ज्ञात, अज्ञात शूरवीर आजच्या तरूण पिढीला माहिती नाहीत. त्यांच्याबाबतची माहिती, त्यावेळच्या लढ्यांचे प्रसंग, लढ्याचे ठिकाण याचा संपूर्ण इतिहास उलगडून जागतिक पातळीवर पोहोचणे गरजेचे आहे. याच मुक्तिसंग्रामातील एक स्वातंत्र्यसेनानी म्हणजे मातोळा येथील क्रांतीवीर दत्तोबा भोसले. ज्यांची महती व कर्तबगारी १९४८ सालचे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी महंमद हैदर यांनी त्यांच्या ‘ऑक्टोबर कोअ्प’ पुस्तकातही मांडली आहे. दत्तोबा भोसले हे मुख्य सेनानी होते. जिल्ह्यातील सर्व कॅम्प त्यांनी स्थापन केले व धाडसाने चालवलेही. अशा दत्तोबा भोसले यांची प्रेरणादायी माहिती जगासमोर येणे गरजेचे आहे. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांनी निजामाच्या अन्याय, अत्याचाराविरोधात लढे उभारले. सशस्त्र छावण्या सुरू करून निजामाविरूध्द लढा दिला. त्या काळात देवताळा गावातील थरार, सेलू गावातील हप्ता लूट, नाईचाकूर पोलीस ठाण्यावरील हल्ला सर्वपरिचित आहे. या सर्व बाबी पटलावर आणणे आवश्यक आहे. यासाठी मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांची माहिती गोळा करून सरकार दफ्तरी नोंद व्हावी, सशस्त्र लढ्यांची माहिती पुस्तिका तयार करावी. तसेच शालेय अभ्यासक्रमात धड्यांचा समावेश करावा, क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचे उस्मानाबाद, लातूर येथे स्मारक उभारावे. शासकीय योजनांना त्यांचे नाव द्यावे, तसेच शासकीय पुरस्कार, क्रीडा संकुल, सभागृह व महामार्गांना त्यांचे नाव द्यावे, अशा विविध मागण्या लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींनी केल्या आहेत.