शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

पिकांचे अताेनात नुकसान, पंचनामे कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : भूम तालुक्यात सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग ही पिके वाया गेल्यात जमा ...

उस्मानाबाद : भूम तालुक्यात सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग ही पिके वाया गेल्यात जमा आहेत, तर साेयाबीनही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. असे असतानाही प्रशासनाकडून पंचनाम्यास गती देण्यात आलेली नाही. परिणामी, शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मागील काही वर्षांत भूमसह ईट परिसरातील शेतकरी साेयाबीनकडे वळले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साेयाबीनचा पेरा वाढला आहे. पेरणी व पेरणीनंतर अधून-मधून पाऊस झाला. साेयाबीनसह उडीद, मूग आदी पिके जाेमदार आली. दरम्यान, ही पिके फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने ओढ दिली आहे. जवळपास २० ते २१ दिवस लाेटूनही पाऊस न झाल्याने उडीद, मूग वाया गेल्यात जमा आहे, तर साेयाबीनही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याची गरज आहे, परंतु ईटसह परिसरात अद्याप ही प्रक्रिया गतिमान हाेताना दिसत नाही. अनेक शेतकरी गाव स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना फाेन करून पंचनामे करण्यासाठी विनंती करीत आहेत, परंतु त्याचाही फारसा परिणाम हाेताना दिसत नाहीत. प्रशासनाच्या या असहकार भूमिकेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

चाैकट...

भूम तालुक्यातील आंबी मंडळात आजवर केवळ १४३ मिमी पाऊस झाला आहे, तसेच माणकेश्वर १९०, भूम २३९.७०, वालवड १७५.८० तर ईट सर्कलमध्ये अवघा १५१.६० मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे ईटसह परिसरातील पिकांना अधिक फटका असला आहे. ही बाब लक्षात घेता, तातडीने पंचनामे करणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया...

तातडीने पंचनामे सुरू करा - प्रवीण देशमुख

ईटसह परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. माळरानावरील पिकांचा अक्षरश: पाचाेळा झाला आहे. असे असतानाही नुकसानीचे पंचनामे हाेताना दिसत नाहीत. प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याचे संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत, अशी मागणी ईट ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा सदस्य प्रवीण देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहेत. निवेदनावर महिंद्र लिमकर, आण्णा शिंदे, राहुल सूळ, मिटू डाेंबाळे, सचिन स्वामी, कुमार खारगे, बाळासाहेब आव्हाड, सतीश नलावडे, सयाजी नलावडे, रामहरी लिमकर, संताेष खारगे, सूरज खारगे, गाैरव वालेकर, विक्रम हुंबे आदींची नावेत आहेत.