उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील हंगरगा पाटी येथे शेतातील बांध फाेडल्याच्या कारणावरून दाेन गट भिडले. ही घटना २३ एप्रिल राेजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी परस्परविराेधी तक्रारीवरून दाेन्ही गटांतील लाेकांविरुद्ध तुळजापूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील हंगरगा पाटील येथील नन्नवरे कुटुंबातील देविदास, छाया, अमर, शैला यांच्यासह शाेभा व संजय झाडपिडे यांच्या गटाचा गावातीलच हरिश्चंद्र नन्नवरे, शालन नन्नवरे, रवींद्र नन्नवरे, प्रिया नन्नवरे, रमेश देडे, बापू व अनिता यांच्या गटाशी २३ एप्रिल राेजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दाेन्ही गटांतील व्यक्तींनी एकमेकांना लाथाबुक्क्या, लाेखंडी गज, दगडाने बेदम मारहाण केली. यात काहीजण जखमी झाले. याप्रकरणी अमर नन्नवरे व हरिश्चंद्र नन्नवरे यांनी दिलेल्या परस्परविराेधी तक्रारीवरून तुळजापूर पाेलीस ठाण्यात दाेन स्वतंत्र गुन्हे नाेंद झाले आहेत. प्रकरणाचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.