शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

शाळा सुरू होण्याबाबत मुलांमध्ये उत्सुकता, पालकांत भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:39 IST

कळंब : विद्यार्थ्यांना कधी एकदा शाळेला सुट्ट्या लागतात याचे वेध लागत असत. पण कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने जवळपास दीड-दोन वर्षे ...

कळंब : विद्यार्थ्यांना कधी एकदा शाळेला सुट्ट्या लागतात याचे वेध लागत असत. पण कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने जवळपास दीड-दोन वर्षे शाळाबाह्य राहिलेल्या मुलांना आता शाळा कधी सुरू होतील याचे वेध लागल्याचे चित्र आहे.

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत असताना शाळा सुरू करण्याचा हा बाळहट्ट सध्या तरी मान्य होण्याची शक्यता नाही. मास्क वापरू, हात धुवू, वर्गात अंतर ठेवूनही बसू.... तुमचं सगळं सगळं ऐकू पण सरांना शाळा सुरू करायला सांगा अशी आग्रही मागणी ग्रामीण भागातील चिमुकल्यांनी केल्याचा अनुभव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी सांगितला. गावागावात फिरताना ग्रामीण भागातील मुलांनी आवर्जून भेट घेऊन ही मागणी केल्याचे ते म्हणाले. जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी असताना संजय पाटील दुधगावकर यांनी कळंब तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांना नवीन इमारती तसेच दुरुस्तीसाठी निधी दिला होता. त्यामुळे राजकीय, वैयक्तिक दौऱ्यावर असताना ते त्या त्या गावातील शाळांना अवश्य भेट देतात. सध्या कळंब तालुक्यात पक्षीय गाठीभेटी घेताना शाळेच्या परिसरात गेले की तेथे खेळणारी मुले धावत येतात. शाळा कधी सुरू होणार? असा प्रश्न मुले विचारतात. कोरोनामुळे शाळा बंद आहे. तो गेल्यावर सुरू होईल, असे सांगितल्यावर कोरोनाचे सगळे नियम पाळू पण शाळा चालू करण्याचा आग्रह त्यांच्याकडून प्रत्येक ठिकाणी होतो असे दुधगावकर यांनी सांगितले. शासन, प्रशासन त्यांची जबाबदारी सांभाळत आहे. शाळा सुरू करणे आता धोक्याचे ठरू शकते. पण लहान मुलांना सांगणार कोण? हा प्रश्नही सध्या उभा राहतो आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १६० शाळेतील सातवीपर्यंतचे तब्बल २२ हजार विद्यार्थी सध्या कोरोनामुळे शाळाबाह्य आहेत. जेथे कोरोना रुग्णांची संख्या शून्य आहे तेथे ८ वी ते बारावीपर्यंतचे वर्ग चालू करण्यास परवानगी दिली आहे. ग्रामीण भागातील त्या शाळांमध्ये ६० टक्क्यांपर्यंत विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. शहरात अजून त्या शाळांना परवानगी दिली नाही.

चौकट-

कोरोनाने दोन शिक्षकांचा बळी

तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमधून १०९० शिक्षक कार्यरत आहेत. कोरोनाने तालुक्यातील २ शिक्षकांचा बळी घेतला. तालुक्यात किती शिक्षक कोरोना बाधित झाले याची नेमकी माहिती शिक्षण विभागाकडे नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका मुलांना आहे तसा शिक्षकांनाही असणार आहे.

शाळांना तूर्तास कुलूपच

शासन-प्रशासनाच्या सूचनांच्या अधीन राहूनच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यार्थी, शिक्षक यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. सध्या ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ८ वी ते बारावीपर्यंतचे वर्गही काही ठिकाणी चालू आहेत, अशी माहिती कळंबचे गटशिक्षणाधिकारी तोडकर यांनी दिली.

पाॅईंटर...

शाळा कधी भरते याबाबत मुलांमध्ये उत्सुकता असली तरी पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील ९२ पैकी केवळ १ ते २ गावातूनच शाळा चालू करण्याबाबत शिक्षण विभागाला विचारणा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोरोना झिरो होत नाही तोपर्यंत शाळा १०० टक्के भरणार नसल्याचे चित्र दिसत आहे.