शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

पेट्रोल, डिझेलसह खत दरवाढीला लगाम घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : एकीकडे सर्वसामान्य जनता, शेतकरी कोरोना संकटाचा सामना करीत असताना दुसरीकडे केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल या इंधनांसह खतांच्या ...

उस्मानाबाद : एकीकडे सर्वसामान्य जनता, शेतकरी कोरोना संकटाचा सामना करीत असताना दुसरीकडे केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल या इंधनांसह खतांच्या किमतीतही भरमसाठ वाढ केली आहे. यामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शासनाने ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करीत प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले.

देशावर कोरोनासारखे महासंकट ओढवले असताना मोदी सरकारने खताच्या किमती दुपटीने वाढवून शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली आहे. डिझेलच्या किमती वाढल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, मोगडणी, कुळवणी इत्यादी मशागतीच्या कामाचे दरही वाढले आहेत. तसेच कृषी माल वाहतुकीच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पेट्रोलच्या किमतीनेही शंभरी पार केली आहे. त्यामुळे इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने खताच्या वाढीव किमती त्वरित रद्द कराव्यात व इंधन दरवाढीला लगाम घालावा, अन्यथा पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.