शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

न लढणाऱ्या शेतकऱ्यांचे पीकविमा कंपन्यांनी हजारो कोटी लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:32 IST

कळंब : शेतकरी संघटना विम्यासाठी कृषी आयुक्तालय, विमा कंपनीकडे लढत असते. यात विमा कंपनी आंदोलन करणाऱ्या, लढणाऱ्या शेतकऱ्यांनाच पूर्ण ...

कळंब

: शेतकरी संघटना विम्यासाठी कृषी आयुक्तालय, विमा कंपनीकडे लढत असते. यात विमा कंपनी आंदोलन करणाऱ्या, लढणाऱ्या शेतकऱ्यांनाच पूर्ण विमा भरपाई देेत असून, इतरांच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम जमा करते. यातून आवाज न उठविणाऱ्या शेतकऱ्यांचे हजारो कोटी रूपये लुटले जातात. यामुळे शेतकऱ्यांनी लढा दिला पाहिजे, असे आवाहन

शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी केले.

तालुक्यातील शेलगाव (जहागीर) येथे शेतकऱ्यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. याही वर्षी शेतकरी संघटनेने विविध राज्यस्तरीय आंदोलन केली. यानंतर शासन व कंपन्या खडबडून जाग्या झाल्या आणि राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यास सुरुवात केली. असे असले तरी १५ एप्रिलच्या आत काढणीपूर्व व काढणीपश्चात नुकसानीसाठी देय रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली नाही तर १६ एप्रिल रोजी पुन्हा मंत्रालय किंवा कृषी आयुक्तालय कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिला. याशिवाय ज्या शेतकऱ्यांना पात्र असतानाही यापूर्वी विमा नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यांनीही आपल्या‌शी संपर्क साधावा. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

सभेच्या अध्यक्षस्थानी बाबुराव तवले होते. शरद भालेकर, मुकिंदा पेजगुडे, किसनराव शिनगारे, उपसरपंच पांडुरंग सोनार, सर्जेराव तवले, केशवराव तवले, जगन्नाथ बांगर, नरहरी मोरे आदींसह शेतकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. सूत्रसंचालन नरेश तवले यांनी केले. दत्तात्रय तवले यांनी आभार मानले.