शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अपुऱ्या पावसावर पेरणीचे धाडस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

उमरगा : पावसाळा सुरू होऊन काही दिवस लोटले असले तरी तालुक्यातील मुळज, नारंगवाडी, मुरूम, गुंजोटी, बलसुर, डिग्गी कसगी परिसरात ...

उमरगा : पावसाळा सुरू होऊन काही दिवस लोटले असले तरी तालुक्यातील मुळज, नारंगवाडी, मुरूम, गुंजोटी, बलसुर, डिग्गी कसगी परिसरात अद्याप एकही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून, काही शेतकऱ्यांनी मृगात पाऊस होईल, या अपेक्षेने अपुऱ्या पावसावर पेरणीचे धाडस करीत चाढ्यावर मूठ धरली आहे.

मागील वर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे पेरण्याही वेळेत झाल्या होत्या. मात्र, यंदा अद्याप एकही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी लांबणीवर पडेल की काय अशी भीती शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे. काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज कडून बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी करून ठेवली आहेत. मात्र, पाऊस नसल्याने डोळे आकाशाकडे लागले आहेत. काही दिवसांत पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सध्या आकाशात पावसाचे ढग जमा होत असले तरी पाऊस पडत नाही. काही ठिकाणी पावसाच्या धारा बरसत असल्या तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.

तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी धाडस करत जेमतेम पावसावर पेरणी सुरू केली आहे. आत्तापर्यंत तालुक्यात १३९० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून, यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक ६९० हेक्टर आहे. याशिवाय २८५ हेक्टरवर उडीद, २२० हेक्टरवर तूर, तर १९५ हेक्टरवर मुगाची पेरणी करण्यात आली आहे. सध्या दिवसभर कडक ऊन पडत असून, पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कोट.....

शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. पेरणी करताना बीजप्रक्रिया करून घ्यावी, खतांचा संतुलित वापर करावा. खताची बचत करावी व सोयाबीनची पेरणी करताना बीबीएफ म्हणजे रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी. बीबीएफद्वारे पेरणी केल्याने उत्पादनामध्ये वाढ होण्यासोबतच औषध फवारणीसाठी जागा मोकळी राहते. तसेच जास्तीचा पाऊस झाल्यास पाणी सरीवाटे निघून जाते. पाऊस कमी झाल्याने सरीचे पाणी पिकांना उपलब्ध होते.

- एस. एन. जाधव, तालुका कृषी अधिकारी, उमरगा