शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

अपुऱ्या पावसावर पेरणीचे धाडस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

उमरगा : पावसाळा सुरू होऊन काही दिवस लोटले असले तरी तालुक्यातील मुळज, नारंगवाडी, मुरूम, गुंजोटी, बलसुर, डिग्गी कसगी परिसरात ...

उमरगा : पावसाळा सुरू होऊन काही दिवस लोटले असले तरी तालुक्यातील मुळज, नारंगवाडी, मुरूम, गुंजोटी, बलसुर, डिग्गी कसगी परिसरात अद्याप एकही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून, काही शेतकऱ्यांनी मृगात पाऊस होईल, या अपेक्षेने अपुऱ्या पावसावर पेरणीचे धाडस करीत चाढ्यावर मूठ धरली आहे.

मागील वर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे पेरण्याही वेळेत झाल्या होत्या. मात्र, यंदा अद्याप एकही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी लांबणीवर पडेल की काय अशी भीती शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे. काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज कडून बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी करून ठेवली आहेत. मात्र, पाऊस नसल्याने डोळे आकाशाकडे लागले आहेत. काही दिवसांत पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सध्या आकाशात पावसाचे ढग जमा होत असले तरी पाऊस पडत नाही. काही ठिकाणी पावसाच्या धारा बरसत असल्या तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.

तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी धाडस करत जेमतेम पावसावर पेरणी सुरू केली आहे. आत्तापर्यंत तालुक्यात १३९० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून, यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक ६९० हेक्टर आहे. याशिवाय २८५ हेक्टरवर उडीद, २२० हेक्टरवर तूर, तर १९५ हेक्टरवर मुगाची पेरणी करण्यात आली आहे. सध्या दिवसभर कडक ऊन पडत असून, पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कोट.....

शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. पेरणी करताना बीजप्रक्रिया करून घ्यावी, खतांचा संतुलित वापर करावा. खताची बचत करावी व सोयाबीनची पेरणी करताना बीबीएफ म्हणजे रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी. बीबीएफद्वारे पेरणी केल्याने उत्पादनामध्ये वाढ होण्यासोबतच औषध फवारणीसाठी जागा मोकळी राहते. तसेच जास्तीचा पाऊस झाल्यास पाणी सरीवाटे निघून जाते. पाऊस कमी झाल्याने सरीचे पाणी पिकांना उपलब्ध होते.

- एस. एन. जाधव, तालुका कृषी अधिकारी, उमरगा