शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

अपुऱ्या पावसावर पेरणीचे धाडस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

उमरगा : पावसाळा सुरू होऊन काही दिवस लोटले असले तरी तालुक्यातील मुळज, नारंगवाडी, मुरूम, गुंजोटी, बलसुर, डिग्गी कसगी परिसरात ...

उमरगा : पावसाळा सुरू होऊन काही दिवस लोटले असले तरी तालुक्यातील मुळज, नारंगवाडी, मुरूम, गुंजोटी, बलसुर, डिग्गी कसगी परिसरात अद्याप एकही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून, काही शेतकऱ्यांनी मृगात पाऊस होईल, या अपेक्षेने अपुऱ्या पावसावर पेरणीचे धाडस करीत चाढ्यावर मूठ धरली आहे.

मागील वर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे पेरण्याही वेळेत झाल्या होत्या. मात्र, यंदा अद्याप एकही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी लांबणीवर पडेल की काय अशी भीती शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे. काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज कडून बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी करून ठेवली आहेत. मात्र, पाऊस नसल्याने डोळे आकाशाकडे लागले आहेत. काही दिवसांत पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सध्या आकाशात पावसाचे ढग जमा होत असले तरी पाऊस पडत नाही. काही ठिकाणी पावसाच्या धारा बरसत असल्या तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.

तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी धाडस करत जेमतेम पावसावर पेरणी सुरू केली आहे. आत्तापर्यंत तालुक्यात १३९० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून, यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक ६९० हेक्टर आहे. याशिवाय २८५ हेक्टरवर उडीद, २२० हेक्टरवर तूर, तर १९५ हेक्टरवर मुगाची पेरणी करण्यात आली आहे. सध्या दिवसभर कडक ऊन पडत असून, पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कोट.....

शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. पेरणी करताना बीजप्रक्रिया करून घ्यावी, खतांचा संतुलित वापर करावा. खताची बचत करावी व सोयाबीनची पेरणी करताना बीबीएफ म्हणजे रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी. बीबीएफद्वारे पेरणी केल्याने उत्पादनामध्ये वाढ होण्यासोबतच औषध फवारणीसाठी जागा मोकळी राहते. तसेच जास्तीचा पाऊस झाल्यास पाणी सरीवाटे निघून जाते. पाऊस कमी झाल्याने सरीचे पाणी पिकांना उपलब्ध होते.

- एस. एन. जाधव, तालुका कृषी अधिकारी, उमरगा