शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

CoronaVirus : तत्पर प्रशासन ! जिल्हाधिकाऱ्यांना मेल केला अन् काही तासांत औषधी मुंबईहून ईटकुरात दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 17:59 IST

अवघड शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची औषधे लॉकडाऊनमुळे होत नव्हती उपलब्ध

ठळक मुद्देकिडनीच्या सर्जरीनंतर लागणार होती औषधीकेवळ २० एप्रिलपर्यंतची होती औषधी

- बालाजी आडसूळकळंब (जि. उस्मानाबाद) :एका अवघड शस्त्रक्रियेनंतर घ्याव्या लागणाऱ्या नियमित औषधीचा साठा संपत आला. यातच औषधी स्थानिक पातळीवर मिळत नसल्याने तो अधीकच चिंतेत होता. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हतबल झालेल्या त्या तरूणाने बसल्याजागी जिल्हाधिकाऱ्यांना मेल पाठवला. आपली विवंचना मांडल्यानंतर अवघ्या काही तासात जिल्हाधिकारी, तहसीलदार व औषधी प्रशासनाच्या सजगतेमुळे त्या तरूणाला हवी ती औषधी ‘मुंबई ते इटकूर’ असा प्रवास करत दाखल झाली.

महसूल विभागाचे नेटवर्क अगदी तळागाळात पोहचलेले आहे.जिल्हाधिकारी ते गावच्या कोतवालापर्यंत असे सर्वजण थेट जनतेची कनेक्ट असतात. यामुळेच अडलेनडले, समस्यांनी ग्रस्त लोक संकटकाळात धाव घेतात ती महसूल विभागाची. कारण तिथेच प्रश्नाची सोडवणूक व्हायची आशा असते. तेथेच मिळते अनेकांना समाधान. याचाच प्रत्यय कळंब तालुक्यातील इटकूर येथील आशुतोष विकास क्षिरसागर या तरूणाला आला आहे. मागच्या काही वर्षात आशुतोष यांचे किडणी ट्रान्सफन्ट झाले आहे. या अवघड शस्त्रक्रियेनंतर त्याला नियमित औषधी घ्यावी लागत आहे. आजवर शस्त्रक्रिया झालेल्या नवी मुंबई भागातील एका केमिस्टडून ही औषधी तो घेत होता. सद्या २० एप्रिलपर्यंत पुरेल एवढी त्याकडे औषधी होती.

परंतु,लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या व बाहेरही होम डिलिव्हरी करणारे उपलब्ध नसल्याने पुढील काळातील या अत्यंत गरजेच्या औषधीचे काय, असा प्रश्न त्यांना सतावत होता.  यावर त्यांनी स्थानिक पातळीवर औषधी मिळते का, याची चौकशी केली असता ती मिळत नव्हती. यामुळे हतबल झालेल्या आशुतोष यांनी थेट जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना मेल करून आपली कैफियत मांडली. जिल्हाधिकारी यांनीही यास गांभीर्याने घेत सर्व प्रमुख अधिका-यांना याविषयी अवगत केले. त्या तरूणास उलटटपाली मेल पाठवून संपर्क क्रमांक मागवून घेतला. 

तातडीने कळंबच्या तहसीलदार मंजूषा लटपटे यांना कळवले. तहसीलदार मंजूषा लटपटे यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा केली. कळंब येथे स्वत: त्या औषधींची उपलब्धता होते का याची पाहणी केली. मात्र औषधी मिळत नसल्याचे स्पष्ट होताच अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त  सीध यांच्याशी संपर्क साधला. यानंतर महसूल विभागाच्या सोबतीला अन्न व औषध प्रशासन ही धाऊन आले.त्यांनी थेट क्षिरसागर यांच्याशी संपर्क साधत औषधी, उपचार ठिकाण यांचे डिटेल्स जाणून घेतले. यानंतर सहाय्यक आयुक्त  सीध यांनी  औषध निरिक्षक विलास दुसाने यांना आशुतोष यांच्या समस्याची कल्पना दिली. दुसाने यांनी गांभीर्याने घेत औषधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. योगायोगाने ते नवी मुंबईत होते. त्यांनी औषध निर्मिती कंपनीच्या मार्केटिंग प्रतिनिधीशी संपर्क केला. स्टॉकीस्टचा पत्ता शोधला. अन् मुंबईतील सानपाडा येथून खिशातील सात हजार रूपये देत आशुतोष क्षिरसागर यांना आवश्यक असलेली औषधी उपलब्ध करून दिली. प्रशासनाच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अवघ्या काही तासांत औषधी मुंबई टू ईटकूर... गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे व तहसीलदार मंजूषा लटपटे यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला होता. यानंतर शोध घेत घेत शुक्रवारी सकाळी औषध निरिक्षक विलास दुसाने यांनी ती औषधी प्राप्त केली. रात्री तातडीने औषधी घेवून ते उस्मानाबादला पोहचले. यानंतर शनिवारी सकाळी कळंबच्या तहसलीदार मंजूषा लटपटे यांनी ती औषधी अव्वल कारकून नितेश काळे यांच्याकरवी कळंबला आणली. कळंबवरून कोतवाल सुनिल माळी यांना लागलीच १ वाजता औषधी घेवून इटकूरला पाठवले. आणि इटकूरचे कोतवाल सतीश राक्षे व सुनिल माळी यांनी ती आशुतोष क्षिरसागर यांच्याकडे १.३० वाजेच्या सुमारास सुपूर्द केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबाद