शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : तत्पर प्रशासन ! जिल्हाधिकाऱ्यांना मेल केला अन् काही तासांत औषधी मुंबईहून ईटकुरात दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 17:59 IST

अवघड शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची औषधे लॉकडाऊनमुळे होत नव्हती उपलब्ध

ठळक मुद्देकिडनीच्या सर्जरीनंतर लागणार होती औषधीकेवळ २० एप्रिलपर्यंतची होती औषधी

- बालाजी आडसूळकळंब (जि. उस्मानाबाद) :एका अवघड शस्त्रक्रियेनंतर घ्याव्या लागणाऱ्या नियमित औषधीचा साठा संपत आला. यातच औषधी स्थानिक पातळीवर मिळत नसल्याने तो अधीकच चिंतेत होता. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हतबल झालेल्या त्या तरूणाने बसल्याजागी जिल्हाधिकाऱ्यांना मेल पाठवला. आपली विवंचना मांडल्यानंतर अवघ्या काही तासात जिल्हाधिकारी, तहसीलदार व औषधी प्रशासनाच्या सजगतेमुळे त्या तरूणाला हवी ती औषधी ‘मुंबई ते इटकूर’ असा प्रवास करत दाखल झाली.

महसूल विभागाचे नेटवर्क अगदी तळागाळात पोहचलेले आहे.जिल्हाधिकारी ते गावच्या कोतवालापर्यंत असे सर्वजण थेट जनतेची कनेक्ट असतात. यामुळेच अडलेनडले, समस्यांनी ग्रस्त लोक संकटकाळात धाव घेतात ती महसूल विभागाची. कारण तिथेच प्रश्नाची सोडवणूक व्हायची आशा असते. तेथेच मिळते अनेकांना समाधान. याचाच प्रत्यय कळंब तालुक्यातील इटकूर येथील आशुतोष विकास क्षिरसागर या तरूणाला आला आहे. मागच्या काही वर्षात आशुतोष यांचे किडणी ट्रान्सफन्ट झाले आहे. या अवघड शस्त्रक्रियेनंतर त्याला नियमित औषधी घ्यावी लागत आहे. आजवर शस्त्रक्रिया झालेल्या नवी मुंबई भागातील एका केमिस्टडून ही औषधी तो घेत होता. सद्या २० एप्रिलपर्यंत पुरेल एवढी त्याकडे औषधी होती.

परंतु,लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या व बाहेरही होम डिलिव्हरी करणारे उपलब्ध नसल्याने पुढील काळातील या अत्यंत गरजेच्या औषधीचे काय, असा प्रश्न त्यांना सतावत होता.  यावर त्यांनी स्थानिक पातळीवर औषधी मिळते का, याची चौकशी केली असता ती मिळत नव्हती. यामुळे हतबल झालेल्या आशुतोष यांनी थेट जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना मेल करून आपली कैफियत मांडली. जिल्हाधिकारी यांनीही यास गांभीर्याने घेत सर्व प्रमुख अधिका-यांना याविषयी अवगत केले. त्या तरूणास उलटटपाली मेल पाठवून संपर्क क्रमांक मागवून घेतला. 

तातडीने कळंबच्या तहसीलदार मंजूषा लटपटे यांना कळवले. तहसीलदार मंजूषा लटपटे यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा केली. कळंब येथे स्वत: त्या औषधींची उपलब्धता होते का याची पाहणी केली. मात्र औषधी मिळत नसल्याचे स्पष्ट होताच अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त  सीध यांच्याशी संपर्क साधला. यानंतर महसूल विभागाच्या सोबतीला अन्न व औषध प्रशासन ही धाऊन आले.त्यांनी थेट क्षिरसागर यांच्याशी संपर्क साधत औषधी, उपचार ठिकाण यांचे डिटेल्स जाणून घेतले. यानंतर सहाय्यक आयुक्त  सीध यांनी  औषध निरिक्षक विलास दुसाने यांना आशुतोष यांच्या समस्याची कल्पना दिली. दुसाने यांनी गांभीर्याने घेत औषधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. योगायोगाने ते नवी मुंबईत होते. त्यांनी औषध निर्मिती कंपनीच्या मार्केटिंग प्रतिनिधीशी संपर्क केला. स्टॉकीस्टचा पत्ता शोधला. अन् मुंबईतील सानपाडा येथून खिशातील सात हजार रूपये देत आशुतोष क्षिरसागर यांना आवश्यक असलेली औषधी उपलब्ध करून दिली. प्रशासनाच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अवघ्या काही तासांत औषधी मुंबई टू ईटकूर... गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे व तहसीलदार मंजूषा लटपटे यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला होता. यानंतर शोध घेत घेत शुक्रवारी सकाळी औषध निरिक्षक विलास दुसाने यांनी ती औषधी प्राप्त केली. रात्री तातडीने औषधी घेवून ते उस्मानाबादला पोहचले. यानंतर शनिवारी सकाळी कळंबच्या तहसलीदार मंजूषा लटपटे यांनी ती औषधी अव्वल कारकून नितेश काळे यांच्याकरवी कळंबला आणली. कळंबवरून कोतवाल सुनिल माळी यांना लागलीच १ वाजता औषधी घेवून इटकूरला पाठवले. आणि इटकूरचे कोतवाल सतीश राक्षे व सुनिल माळी यांनी ती आशुतोष क्षिरसागर यांच्याकडे १.३० वाजेच्या सुमारास सुपूर्द केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबाद