शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

एकत्रित प्रयत्नांमुळे बलसूर झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST

बलसूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील पहिला रुग्ण दहा ते बारा हजार लोकसंख्येच्या उमरगा तालुक्यातील बलसूर गावात आढळून आला ...

बलसूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील पहिला रुग्ण दहा ते बारा हजार लोकसंख्येच्या उमरगा तालुक्यातील बलसूर गावात आढळून आला होता. ही लाट ओसरते न ओसरते तोच दुसऱ्या लाटेतही गावात मोठ्या संख्येने रुग्ण आढळले होते. त्यामुळे गाव रेड झोनमध्ये गेले. परंतु, यानंतरच्या कालावधीत प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकमेकांत समन्वय ठेवत राबविलेल्या उपाययोजनांमुळे सध्या हे गाव कोरोनामुक्त झाले आहे.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत गावात ७५ रुग्ण आढळून आले. हे गाव रेड झोनमध्ये गेल्यामुळे प्रशासनाकडून तातडीने गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली होती. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत शिक्षक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांच्याकडून गावातील प्रत्येक कुटुंबाचा सर्वे तसेच वेळोवेळी जनजागृतीही करण्यात आली. विशेष म्हणजे गावातील कुठलीही लक्षणे नसलेल्या अनेक बाधित रुग्णांनी गृह विलगीकरणात राहून स्वतःची व कुटुंबाचीही काळजी घेत कोरोनावर मात केली. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना समज देण्यात आली. आरोग्य विभाग, पोलीस विभाग, ग्रामपंचायत यांनी ग्रामस्थांशी समन्वय साधून जनजागृती केली. त्याला ग्रामस्थांनीही चांगला प्रतिसाद मिळाल्याने काही दिवसांत कोरोनाला गावाबाहेर काढण्यात यश मिळाले आहे.

कोट................

ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामस्थांशी समन्वय राखत जनजागृती करण्यात आली. तसेच वेळोवेळी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन ग्रामस्थांनी काटेकोरपणे केले. त्यामुळेच आता गाव कोरोनामुक्त झाले आहे.

- राजश्री नांगरे, सरपंच

गाव मोठे असल्याने दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा सर्वे करुन गावात फवारणी करण्यात आली. तसेच दररोज प्रत्येक कुटुंबाची बारकाईने माहिती घेण्यात आली. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत झाली.

- सुरेश वाकडे, उपसरपंच

ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या सूचनांचे ग्रामस्थांनी काटेकोरपणे पालन केले. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतःची व कुटुंबाची काळजी घेतली. त्यामुळेच आज गाव कोरोनामुक्त झाले.

- एस. आर.पांढरे, ग्रामविकास अधिकारी.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी कुठलीही शंका, गैरसमज मनामध्ये न ठेवता प्रशासनाला चांगले सहकार्य केले. त्यामुळेच कोरोनावर मात करणे शक्य झाले.

- एस. बी. सगर, आरोग्यसेविका.

फोटो -

बलसूर येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यावेळी ग्रामपंचायतीने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कुठलीही दंडात्मक कारवाई न करता समज देत त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.