शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

कोरोना होऊन गेला, इतर आजारांवरील शस्त्रक्रिया कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:31 IST

उमरगा : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असला तरी कोरोना होऊन गेलेल्या रुग्णाला इतर आजाराबद्दल शस्त्रक्रिया करावयाची असल्यास किमान ...

उमरगा : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असला तरी कोरोना होऊन गेलेल्या रुग्णाला इतर आजाराबद्दल शस्त्रक्रिया करावयाची असल्यास किमान दीड महिना वाट पाहावी लागते; परंतु या कालावधीत संबंधित रुग्णाचा आजार गंभीर अथवा जास्तीचा बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या या कालावधीबाबत अनेक संभ्रम असून, कोरोना रुग्णाला याबाबत जास्तीची माहिती नसल्याने कोरोना होऊन गेल्यानंतरही दीड महिन्याचा कालावधी कशासाठी, असा प्रश्न पडला आहे.

उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णावर आजपर्यंत कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नसली तरी इमर्जन्सी शस्त्रक्रिया करण्याबाबत नियोजन आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्ण तयारी ठेवली गेली असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

इमर्जन्सी शस्त्रक्रिया

इमर्जन्सी शस्त्रक्रिया करावयाची असल्यास संबंधित कोरोना रुग्णासह शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरच्या पथकांना पीपीई किट, हँडग्लोज वापरणे सक्तीचे आहे. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर संबंधित रुग्णाला स्वतंत्र खोलीत ठेवणे, त्याच बरोबर शस्त्रक्रिया केलेली सर्व साहित्य नष्ट करणे व शस्त्रक्रिया कक्षाचे निर्जंतुकीकरण करून २४ तास तेथे प्रवेश निषिद्ध केला जातो.

प्लान शस्त्रक्रिया

कोरोना झालेल्या रुग्णावर इतर आजाराबद्दल शस्त्रक्रिया करावयाची असल्यास कोरोना होऊन गेल्यानंतर किमान दीड महिना थांबावे लागते. तसे त्यास सांगितले जाते. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी परत एकदा कोरोना चाचणी करूनच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला जातो.

शस्त्रक्रियेसाठी दीड महिना वाट पाहा

कोरोना झाल्यानंतर दीड महिना शस्त्रक्रिया करता येत नाही; परंतु कित्येकांना कोरोना झाल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी वाट पाहणे शक्य नाही. त्यातच शस्त्रक्रिया अत्यंत निकडीची असल्यास डॉक्टरांनी तपासल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जातो. कोरोना होऊन गेल्यानंतर किती कालावधीनंतर शस्त्रक्रिया करायची, हे बहुतांश जणांना माहिती नसते. त्यामुळे ते खाजगी डॉक्टरांना कोरोना झाल्याची माहितीही देत नाहीत. यातून कोरोना संसर्ग व इतर अपायकारक गोष्टी होऊ शकतात. यामुळे कोरोना झाल्यानंतर दीड महिन्यानंतर शस्त्रक्रिया न करण्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.

कोट.......

कोरोना होऊन गेल्यानंतर कोरोना विषाणू शरीरातून पूर्णतः नष्ट होण्याचा कालावधी किमान १२ आठवड्यांपर्यंतचा आहे. त्यानंतरच शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. इमर्जन्सी असेल तर सर्व खबरदारी घेऊनच शस्त्रक्रिया करतो. यात कोणताही हलगर्जीपणा केला जात नाही.

- डॉ. अशोक बडे, वैद्यकीय अधीक्षक, उमरगा

कोरोनाचे एकूण रुग्ण 6302

बरे झालेले रुग्ण ५८८५

एकूण कोरोना बळी ४०३

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण १३